Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे लेवा सखी घे भरारी यांच्यावतीने भव्य दिपावली उत्सवाचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे १६ व १७ ऑक्टोंबर सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य दीपावली उत्सवाचे ( प्रदर्शन व विक्री) आयोजन करण्यात आले असून यात 48 स्टॉल व खाद्यपदार्थ 6 स्टॉल असणार आहेत. या उत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अरुण बोरोले उपस्थित होते. या उत्सवाला अध्यक्ष ऍड. भारती ढाके, सचिव निलम किनगे, उपाध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, कोषाध्यक्ष भारती…

Read More

फैजपूर: प्रतिनिधी । गेल्या सहा वर्षापासून नियमित नवरात्रोत्सवात सुमारे १०० कन्यांचे पूजन श्री सतपंथ चारीटेबल ट्रस्ट संचलित श्री निष्कलंक धाम वढोदा प्र सावदा या ठिकाणी आयोजित करण्यात येत असून यावर्षी मी महान आहे… या अलौकिक मंत्रासह असंख्य कन्यांचे पूजन सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा या संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्‍वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. खेड्यापाड्यातील नटून थटून आलेल्या या बालिकांचे शिस्तीत प्रथम पाय धुऊन, पुसून स्वच्छ करण्यात आले. प्रत्येकीचे पूजन, औक्षण करून त्यांना स्टील जेवणाचा डबा, नेलपेंट, मेहंदी कोन, कानातील टॉप्स, चॉकलेट, मोबाईल स्टॅन्ड, चुंदडी, हात रुमाल, लिपस्टिक, टाल्कम पावडर, हेअर पिन यासह प्रत्येकीला मास्क व अकरा रुपये दक्षिणा देऊन पोटभर…

Read More

वाकडी.ता.जामनेर, प्रतिनिधी । वाकडी येथे आज दसऱ्याचे मूहूर्त साधून पहूर येथील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, वाकडी येथे अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात चालू असून कुठे तरी हे बंद होवावे, यासाठी गावातील अनेक नागरिकांची इच्छा होती, कारण गावात बसस्थानकावरच खुले पध्दतीने गावठी,दारू आणि इंग्लिश दारू विक्री होते, सकाळी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जातात. यावेळी अनेक तरुण बसस्थानकावरच दारू पिऊन पडले असतात, यामुळे गावातील अनेक महिला व विद्यार्थी बसस्थानकावर येत नाही, यांना कुठे तरी पोलीस प्रशासनाकडून तंबी असावी, यासाठी गावात पोलीस चौकीचे प्रारंभ केला, यावेळी वाकडी येथील ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी दारू बंदीच्या ठराव देऊन ही दारू ही सरच…

Read More

जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषी माता नगर जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठकहीत नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे निर्गुणा महाजन विकास लहासे प्रवीण लहासे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी आत्मा समितीचे सदस्य शिवसेनेचे गटप्रमुख रमण शिरसागर यांच्याशी व्यक्त पत्नी विद्याबाई रमण शिरसागर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी उमेश दुधकर तर सदस्य म्हणून गजानन खाटीक लक्ष्‍मीबाई वानखेडे फिरोज तडवी वंदना जाधव लक्ष्मीबाई भडांगे विनोद चौधरी कविता साळवे दीपक पाटील…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । महाबळमधील अनुराग स्टेट बँक काॅलनीतील वैशाली ज्ञानेश्वर बडगुजर यांनी आपल्या छंदाला आकार देत नवरात्राेत्सवानिमित्त घरातच ६ बाय ४ आकारात पाेट्रेट रांगाेळीतून दुर्गामाता रेखाटली आहे. ही रांगाेळी त्यांनी दरराेज ३ तास वेळ काढून ६ दिवसांत म्हणजे १८ तासात पूर्ण केली आहे. यासाठी ७ किलाे रांगाेळी लागली आहे. रांगाेळीत याेग्य रंग छटा दाखवण्यासाठी त्यांनी पांढऱ्या रांगाेळीत लेक रंगांचा वापर केला आहे. या कार्यासाठी त्यांना पती ज्ञानेश्वर बडगुजर व मुले विपुल व निखिल बडगुजर यांनी मदत केली आहे. पहिल्या प्रयत्नात रेखाटलेली आकर्षक रांगाेळी पाहण्यासाठी परिसरातील नागरिक येत आहे. वैशाली बडगुजर यांना चित्रकलेची आवड असून त्या घरकाम सांभाळून प्रत्येक सणांनुसार घरात…

Read More

जम्मू, वृत्तसंस्था । पाच दिवसांपासून पूँछ जिल्ह्यात अतिरेक्यांशी चकमक सुरू असून, त्यांना ठार मारण्यासाठी पॅरा कमांडो व लढाऊ हेलिकाॅप्टर्सची मदत घेतली जात आहे. भारतीय लष्कराने केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी मारले गेले आहेत. घनदाट जंगलात अतिरेकी लपल्यामुळे त्यांच्यापर्यंत पोहोचण्यात सैनिकांना असंख्य अडचणींचा सामना करावा लागत आहे. अतिरेक्यांवर उखळी तोफांचा मारा व रॉकेटस् डागले जात आहेत. पाच दिवसांत लष्कराचे ७ जवान शहीद झाले आहेत, तर गुरुवारी रात्री रायफलमॅन विक्रमसिंह नेगी (२६) आणि रायफलमॅन योगंबर सिंह (२७, दोघेही रा. उत्तराखंड) या दोघांना वीरमरण आले. सूत्रांनुसार जंगलांत अतिरेक्यांना शोधण्यासाठी लष्कराने आपले विशेष कमांडो व पॅरा कमांडो तैनात केले आहेत. अतिरेक्यांचे अस्तित्व पाहून लष्कराने राजौरी-पूँछ…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । ऑक्टोबर महिन्याच्या अगदी पहिल्या तारखेपासून सुरु झालेली पेट्रोल आणि डिझेलच्या दरवाढीची मालिका काही केल्या थांबायला तयार नाही. देशभरात शनिवारी पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार पेट्रोल आणि डिझेलच्या प्रतिलीटर दरात 35 पैशांची वाढ झाली आहे. गेल्या आठवडाभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे सामान्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी शनिवारी जाहीर केलेल्या दरांनुसार मुंबईत पेट्रोलचा प्रतिलीटर दर 111.44 रुपये इतका आहे. तर एका लीटर डिझेलसाठी 102.13 रुपये मोजावे लागत आहेत. तर पॉवर पेट्रोलचा प्रतिलीटर दर 115.38 रुपये इतका आहे. तर दिल्लीत पेट्रोल आणि डिझेलचा दर…

Read More

उत्तरप्रदेश, वृत्तसंस्था । येथील १७ वर्षांच्या अल्पवयीन तरुणीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. गेल्या पाच वर्षांपासून मुलीवर लैंगिक अत्याचार होत होते. पोलिसांनी याप्रकरणी सात आरोपींना अटक केली आहे. यामध्ये पीडित मुलीच्या वडिलांसहित समाजवादी आणि बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश आहे. अकरावीत शिकणाऱ्या या पीडित विद्यार्थिनीने आपल्यावर एकूण २८ जणांनी बलात्कार केल्याचा आरोप आहे. आरोपींमध्ये वडील, राजकीय नेत्यासोबत नातेवाईक आणि काही स्थानिक नागरिकांचा समावेश आहे. पोलिसांनी मुलीची वैद्यकीय चाचणी केली आहे. तसंच दंडाधिकाऱ्यांसमोर तिचा जबाब नोंदवण्यात आला आहे. “आम्ही आतापर्यंत सात लोकांना अटक केली असून यामध्ये मुलीचे वडील आणि समाजवादी पक्ष तसंच बहुजन समाज पक्षाच्या जिल्हा प्रमुखांचा समावेश…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जिल्ह्यातील रूग्णांना चांगल्या आरोग्य सेवेबरोबरच यंत्रणेच्या बळकटीकरणासाठी रूग्णवाहिका महत्वपूर्ण असून जिल्ह्यास अजून रूग्णवाहिका उपलब्ध होण्यासाठी आपण प्रयत्नशील आहे. कोविडचा प्रतिकार करण्यासाठी रूग्णवाहिका हा सर्वात महत्वाचा घटक असल्याचे आपण सर्वानी अनुभवले आहेत. आरोग्य सेवेच्या बळकटीकरणासाठी जिल्ह्यास यापूर्वी पहिल्या टप्प्यात १३ तर दुसर्‍या टप्प्यात १२ रूग्णवाहिका मिळाल्या आहेत. यांच्या मदतीने आपण कोरोनाच्या तिसर्‍या लाटेच्या प्रतिकारासाठी सज्ज आहोत. असे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. जिल्हा रूग्णालयाच्या आवारात आरोग्य यंत्रणेच्या बळकटीकरणातंर्गत प्राप्त झालेल्या १२ रूग्णवाहिकांच्या लोकार्पणाप्रसंगी ते आज बोलत होते. याप्रसंगी पालकमंत्र्यांच्या हस्ते रूग्णवाहिकांना चालकांना चावी देऊन या रूग्णवाहिका हस्तांतरीत करण्यात आल्यात. यावेळी पालकमंत्र्यांनी रूग्णवाहिका चालकांना किलोमीटरऐवजी फेरीनुसार वेतन देण्याची…

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । राज्य शासनाने राज्यातील हजारो पोलीस हवालदारांसाठी एक महत्वाचा क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज यासंदर्भातील प्रस्तावास मान्यता दिली असून यामुळे राज्यातील अंमलदारांचे पोलीस उपनिरीक्षक होण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. वर्षानुवर्षे सेवेनंतरही त्यांना पोलीस उपनिरीक्षक या अधिकारी पदावर पोहचता येत नव्हते पण पदोन्नतीच्या या निर्णयाचा थेट फायदा येत्या काही महिन्यात सुमारे 45 हजार हवालदार, सहायक पोलिस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांना होणार असून विजयादशमीच्या मुहूर्तावर या बातमीमुळे हजारो अंमलदारांच्या घरात आनंददायी वातावरण निर्माण होणार आहे. या निर्णयामुळे पोलीस शिपाई संवर्गातील अंमलदारास कमी कालावधीत पदोन्नतीच्या 3 संधी कमी मिळून अधिकारी पदावरून सेवानिवृत्त होता येईल. पोलीस उपनिरीक्षक…

Read More