जळगाव, प्रतिनिधी । येथील गांधीतीर्थ येथे दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर गांधी रिसर्च फाऊंडेशचे संचालक तथा जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन व जैन परिवारातील सदस्य, गांधीतीर्थचे सहकारी यांच्या उपस्थितीत सोविनियर शॉपचे उद्घाटन करण्यात आले. वातानुकुलीत व प्रशस्त अशा शॉपमध्ये ग्राहकांना विविध वस्तूंची खरेदी करणे शक्य व्हावे म्हणून ही सुविधा उपलब्ध करून दिली आहे. अस्सल खादीप्रेमींसाठी गांधीतीर्थ प्रथम पसंतीस उतरले असून सोविनियर शॉप खादीप्रेमींसाठी पर्वणीच ठरणार आहे. गांधीतीर्थचे निर्माते भवरलालजी जैन यांनी महात्मा गांधीजींना आपले आदर्श मानले आहे. महात्मा गांधीजींच्या विचारांचे, चारित्र्याचे पुढच्या पिढीत अनुसरण व्हावे या उद्देशाने जगातील अद्ययावत ऑडीओ, व्हीडीओ गाईडेड म्युझियमचे तत्कालीन महामहीम राष्ट्रपती सौ. प्रतिभाताई पाटील यांच्याहस्ते 25 मार्च 2012…
Author: saimat team
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । सरकारी तेल कंपन्यांनी आज पुन्हा एकदा पेट्रोल-डिझेल च्या (Petrol-Diesel Price) किमतींमध्ये वाढ केली आहे. पेट्रोल आणि डिझेल दोन्हींचे दर 35 पैशांनी महागले आहेत. गेल्या काही दिवसांपासून पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमध्ये वाढ करण्यात येत आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशननं दिलेल्या माहितीनुसार, आजच्या दरवाढीनंतर दिल्लीमध्ये पेट्रोल 105.84 रुपये प्रति लिटरवर पोहोचलं आहे. तर डिझेलची किंमत आता 94.57 रुपये प्रति लिटरवर पोहोचली आहे. सलग महाग होणाऱ्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमतींमुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागत आहे. एकीकडे पेट्रोल पंपावरच्या मीटरचे आकडे दररोज वाढत चालले आहेत आणि तेवढ्याच वेगानं तुमचा-आमचा खिसाही रिकामा होत चालला आहे. आज पेट्रोलच्या दरात प्रतिलिटर 35 पैसे तर…
जळगाव, प्रतिनिधी । वाघुर धरण क्षेत्रात संततधार पावसाने जलाशयाच्या पाणी पातळी मध्ये वाढ होत आहे. सद्यस्थितीत वाघूर धरणाचे 8 दरवाजे उघडण्यात आले आहे व त्याद्वारे 13377 कयुसेक विसर्ग सोडण्यात आलेला आहे, तरी कोणीही नदीपात्राजवळ जाऊ नये. ही विनंती कार्यकारी अभियंता जळगाव पाटबंधारे विभाग जळगाव यांनी कळविले आहे. काल शनिवारी सायंकाळी जिल्ह्यातील काही ठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. तर वाघूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाने धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे आज रविवारी धरणाचे ४ दरवाजे २० सें.मी. ने उघडण्यात आले आहे. धरणातून २७०० क्युसेस पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. तरी कोणीही नदीपात्रा जवळ जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले…
पुणे, वृत्तसंस्था । परतीच्या पावसामुळे नवीन कांदा लागवडीवर परिणाम झाला असून महाराष्ट्रातील शेतक ऱ्यांनी साठविलेल्या जुन्या कांद्याला परराज्यातून मागणी वाढत आहे. या मागणीमुळे बाजारात कांद्याचे दर वाढत चालले असून किरकोळ बाजारात प्रतवारीनुसार एक किलो कांद्याची विक्री ५० ते ६० रुपये किलो दराने केली जात आहे. नवीन कांद्याचे पीक हाती येण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे. त्यामुळे कांदा दरात यापुढील काळात वाढ होणार असल्याची माहिती कांदा व्यापाऱ्यांनी दिली. महाराष्ट्रासह कर्नाटकात झालेल्या परतीच्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले. आंध्र प्रदेश, तमिळनाडू, मध्य प्रदेश, गुजरातमध्ये परतीचा पाऊस झाला. नवीन हळवी कांद्याचे पीक साधारणपणे नोव्हेंबर महिन्याच्या आसपास येते. परतीच्या पावसामुळे नवीन कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला…
जळगाव, प्रतिनिधी । येथील धनाजी नाना चौधरी विद्या प्रबोधिनी संचालित शिरीष मधुकरराव चौधरी महाविद्यालयाच्या ग्रंथालय व राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने भारताचे दिवंगत राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जंयती निमित्त वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. डॉ. कलाम यांचे प्रतिमेस कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष पाटील याचे हस्ते माल्यापर्ण करण्यात आले सदर प्रसंगी प्रा डॉ. आर.एस. खडायते, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. आर.बी.वाघुळदे उपस्थित होते. डॉ. शिरीष पाटील यांनी डॉ. ए. पी. जे अब्दुल कलाम यांचा जीवन परिचय व त्यांचे प्रेरणादायी विचार मांडून विद्यार्थ्यांना प्रेरित केले. तसेच त्यांनी डॉ. कलाम लिखित ”अग्निपंख” या पुस्तकातील…
जळगाव, प्रतिनिधी । अवैध गावठी बनावटीचे पिस्टलसह धारदार चाकूने दहशत माजविणाऱ्या एका इसमास स्थानिक गुन्हे शाखा जळगावने अटक केली आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किरणकुमार बकाले यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, इसम गावठी बनावटीचा कटटा व धारदार चाकू बाळगून नशिराबाद गावात दहशत माजवित असलेला आरोपी मो. हाशीम मो. सलीन खान (वय ४१, रा.प्रल्हाद नगर, रिंग रोड, १५ बंगला जवळ, भुसावळ ता. भुसावळ जि.जळगांव) याला अटक केले आहे. पोलीस अधिकारी, अंमलदार, पोलीस उपनिरीक्षक, अमोल देवढे, संदिप रमेश पाटील, प्रविण जनार्दन मांडोळे, परेश प्रकाश महाजन, रविद्र रमेश पाटील यांच्या पथकाने नशिराबाद गावातील बस स्थानकाजवळ आरोपी मो. हाशीम मो. सलीन खान याला…
जळगाव, प्रतिनिधी । शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे लेवा सखी घे भरारी यांच्यावतीने भव्य दिपावली उत्सवाचे महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. जळगाव शहरातील सरदार वल्लभभाई पटेल हॉल (लेवा भवन) येथे १६ व १७ ऑक्टोंबर सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत भव्य दीपावली उत्सवाचे ( प्रदर्शन व विक्री) आयोजन करण्यात आले असून यात 48 स्टॉल व खाद्यपदार्थ 6 स्टॉल असणार आहेत. या उत्सवाचे उद्घाटन महापौर जयश्री महाजन यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक अरुण बोरोले उपस्थित होते. या उत्सवाला अध्यक्ष ऍड. भारती ढाके, सचिव निलम किनगे, उपाध्यक्ष डॉ. स्मिता पाटील, कोषाध्यक्ष भारती…
फैजपूर: प्रतिनिधी । गेल्या सहा वर्षापासून नियमित नवरात्रोत्सवात सुमारे १०० कन्यांचे पूजन श्री सतपंथ चारीटेबल ट्रस्ट संचलित श्री निष्कलंक धाम वढोदा प्र सावदा या ठिकाणी आयोजित करण्यात येत असून यावर्षी मी महान आहे… या अलौकिक मंत्रासह असंख्य कन्यांचे पूजन सतपंथ मंदिर संस्थानचे गादीपती तथा या संस्थेचे अध्यक्ष महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज यांनी केले. खेड्यापाड्यातील नटून थटून आलेल्या या बालिकांचे शिस्तीत प्रथम पाय धुऊन, पुसून स्वच्छ करण्यात आले. प्रत्येकीचे पूजन, औक्षण करून त्यांना स्टील जेवणाचा डबा, नेलपेंट, मेहंदी कोन, कानातील टॉप्स, चॉकलेट, मोबाईल स्टॅन्ड, चुंदडी, हात रुमाल, लिपस्टिक, टाल्कम पावडर, हेअर पिन यासह प्रत्येकीला मास्क व अकरा रुपये दक्षिणा देऊन पोटभर…
वाकडी.ता.जामनेर, प्रतिनिधी । वाकडी येथे आज दसऱ्याचे मूहूर्त साधून पहूर येथील पोलिस निरीक्षक अरुण धनवडे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले, वाकडी येथे अवैध धंदे हे मोठ्या प्रमाणात चालू असून कुठे तरी हे बंद होवावे, यासाठी गावातील अनेक नागरिकांची इच्छा होती, कारण गावात बसस्थानकावरच खुले पध्दतीने गावठी,दारू आणि इंग्लिश दारू विक्री होते, सकाळी अनेक विद्यार्थ्यांनी शाळेत जातात. यावेळी अनेक तरुण बसस्थानकावरच दारू पिऊन पडले असतात, यामुळे गावातील अनेक महिला व विद्यार्थी बसस्थानकावर येत नाही, यांना कुठे तरी पोलीस प्रशासनाकडून तंबी असावी, यासाठी गावात पोलीस चौकीचे प्रारंभ केला, यावेळी वाकडी येथील ग्रामपंचायत यांनी वेळोवेळी दारू बंदीच्या ठराव देऊन ही दारू ही सरच…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर पेठ येथील संतोषी माता नगर जिल्हा परिषद शाळेत शालेय व्यवस्थापन समितीची बैठकहीत नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समिती गठित करण्यात आली. या बैठकीसाठी माजी जिल्हा परिषद सदस्य राजधर पांढरे धनगर समाज उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्वर पाटील उपसरपंच श्याम सावळे निर्गुणा महाजन विकास लहासे प्रवीण लहासे आदी मान्यवरांची उपस्थिती होती या बैठकीत शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्षपदी आत्मा समितीचे सदस्य शिवसेनेचे गटप्रमुख रमण शिरसागर यांच्याशी व्यक्त पत्नी विद्याबाई रमण शिरसागर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली तर उपाध्यक्षपदी उमेश दुधकर तर सदस्य म्हणून गजानन खाटीक लक्ष्मीबाई वानखेडे फिरोज तडवी वंदना जाधव लक्ष्मीबाई भडांगे विनोद चौधरी कविता साळवे दीपक पाटील…