Author: saimat team

चाळीसगाव, प्रतिनिधी । भरतीसाठी आलेल्या 18 वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी सुमारास घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलीस स्थानकात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तालुक्यातील शिंदी येथील कैलास वासूदेव राठोड (वय-१८) हा तरूण एनसीसीच्या भरतीसाठी शहरातील चाळीसगाव एज्युकेशन सोसायटीचे कोतकर महाविद्यालयात आज आलेला होता. दरम्यान मैदानी चाचणी दरम्यान पळताना अचानक त्याला चक्कर आल्याने तो खाली पडला. त्यातच त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. मयताचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून कैलास वासूदेव राठोड याच्या मृतदेहाला शवविच्छेदनासाठी धुळे येथे नेण्यात आले आहे. दरम्यान या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी…

Read More

यावल प्रतिनिधी । ३० टन तांदूळ यावल पोलिसांनी पकडून ट्रक ताब्यात घेतल्याप्रकरणी यावल पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासनाचा शिधापत्रिकेवर वितरित होणारा तांदूळ काळ्याबाजारात जास्त दराने विक्री करणारा ट्रक चोपडा-यावल मार्गे गोंदिया येथे जात असल्याची गोपनीय माहिती यावल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहिती २३ ऑक्टोबर रोजी दुपारी मिळाली. त्यानुसार यावल पोलीस ठाण्याचे सहाय्यक फौजदार मुझफ्फर खान समशेर खान, पोलीस हेडकॉन्स्टेबल असलम खान, चालक रोहिल गणेश, पोलीस कॉन्स्टेबल सुशील घुगे यांच्यासह अन्य पथक हे यावल-चोपडा रोडवर असलेल्या हॉटेल केसर बागजवळ तपासणीसाठी थांबले. दुपारी तीन वाजेच्या सुमारास तांदुळाने भरलेला ट्रक क्रमांक (एमएच १८ एसी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय जनता युवा मोर्चातर्फे कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले.तसेच महामारीमध्ये कोरोना प्रतिबंधक मोफत लसीकरण आणि मोफत धान्य वाटप करण्यात आले आहे. तरी नागरिकांनी महामारीच्या या काळात केंद्रसरकारने घेतलेल्या जनहीतातल्या सर्व योजना (उज्वला गॅस,जनधन खात्याद्वारे महिलांना आर्थिक सहाय्य, मोफत लसीकरण,मोफत धान्य वाटप) या बद्दल मोदी साहेबाना पत्र पाठवून नागरिकांनी आभार मानले. यावेळी महानगर जिल्हाध्यक्ष युवा मोर्चा आनंद सपकाळे, सरचिटणीस मिलिंद चौधरी, अक्षय जेजुरकर, महेश पाटील, उपाध्यक्ष राहुल मिसतरी, स्वामी पोद्दार, सचीन बाविस्कर, चिटणीस सागर जाधव, प्रतीक शेठ, अबोली पाटील, काजल कोळी, मंडल अध्यक्ष, महेश लाठी, दिनेश पुरोहित, हर्षल चौधरी, पंकज सनस, निखिल सूर्यवंशी, मंडल चिटणीस आकाश चौधरी, भूषण…

Read More

भुसावळ प्रतिनिधी । चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी तीन जणांवर भुसावळ बाजार पेठ पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे राहणाऱ्या ठेकेदाराला तीन जणांनी धमकी व चाकूचा धाक दाखवून १५ लाखाची खंडणी मागितल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी भुसावळ बाजारपेठ पोलीसात तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भुसावळ येथील गुलमोहर कॉलनीतील योगेश अशोक नरोटे (वय-२९) हे गर्व्हमेंट कॉट्रॅक्टर आहेत. योगेश नरोटे यांचे शहरातील नवशक्ती आर्केड कॉम्प्लेक्स येथे त्यांचे ऑफीस आहे. २५ ऑक्टोबर नरोटे हे त्यांच्या ऑफीसमध्ये असतांना दिपक भास्कर राणे, पवन मेहरा (पुर्ण नाव माहित नाही) आणि एक अनोळखी व्यक्ती असे तिघेजण…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भारतीय क्रिकेट नियामक मंडळा तर्फे आयोजित सय्यद मुश्ताक अली T20 आंतर राज्य क्रिकेट स्पर्धे साठी महाराष्ट्र राज्याचा संघ आज पुणे येथे जाहीर करण्यात आला यात जळगांव चा जगदीश झोपे याची निवड झाली आहे.सदर स्पर्धा ०४ नोव्हेंबर २०२१ पासून विविध मैदानावर सुरू होत आहे महाराष्ट्र संघ खालील प्रमाणे; ऋतुराज गायकवाड (कर्णधार), नोशाद शेख (उप-कर्णधार), केदार जाधव, मुकेश चौधरी, जगदिश झोपे, अजीम काजी, शमशजमा काजी, मनोज इंगळे. सतेजित बच्छाव, यश नाहर, रणजित निकम, आशय पालकर, प्रदीप दाधे, स्वप्नील फुल्पगार, दिव्यांग हींगणेकर, सुनिल यादव, तरांजित सिंग धिल्लोन, धनराजसिंग परदेशी, स्वप्नील गुगळे, पवन शाह, महाराष्ट्र राज्य क्रिकेट संघात निवड झाल्याबद्दल जगदीश…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । येथील सौ. सु. ग. देवकर प्रायमरी स्कूलचे उपक्रमशील शिक्षक सागर पाटील यांना राजनंदिनी बहुउद्देशीय संस्था, राजपूत करणी सेना आणि गौरी उद्योग समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित २०२०-२१ च्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्काराने पुष्पगुच्छ, शाल व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मिनाक्षी चव्हाण तर प्रमुख पाहुणे म्हणून गणेश अमृतकर, संदीपा वाघ, विलाससिंग पाटील, बी. एच. खंडाळकर, सुमित पाटील, ज्ञानेश्वर वाघ यांची प्रमुख उपस्थिती होती. शाळेत विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाचे उद्दिष्ट लक्षात घेऊन त्यांनी विविध उपक्रम शालेय स्तरावर राबवले आहेत. सागर पाटील सर हे शिक्षक आघाडी राष्ट्रवादी काँग्रेस जळगाव महानगर या आघाडीत महानगर सरचिटणीस तर महाराष्ट्र राज्य…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । तांबापुरातील बिस्मिल्ला चौक येथे कोरोना लसीकरणाचे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमास प्रमुख मान्यवरांनी उपस्थिती होती. यावेळी महापौर जयश्री महाजन, शिवसेना जिल्हाध्यक्ष विष्णू भंगाळे, शिवसेना महानगर अध्यक्ष शरद तायडे, नगरसेवक प्रशांत नाईक, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया चे युवक महानगर अध्यक्ष मिलिंद सोनवणे, तांबापूर शाखाप्रमुख शाहरुख शेख, शिवसेनेचे प्रशांत सुरडकर, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अल्पसंख्याकचे रियाज काकर, जननायक फाऊंडेशनचे फरीदभाई, सामाजिक कार्यकर्ते वसीम खान, सामाजिक कार्यकर्ते असीफ शाह, सामाजिक कार्यकर्ते सलमान खाटीक, वाहतुक सेनेचे जब्बार भाई, सामाजीक कार्यकर्ते सोनूभाई, सलीम काकर, वसिम काकर, लतीफ भाई, लुकमान शेख आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

Read More

मुंबई, वृत्तसंस्था । अफगाणिस्तानातील सत्तापालटानंतर आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत सुकामेव्याचे दर वाढले होते. मात्र, ऐन दिवाळीच्या तोंडावर भारतीयांसाठी एक दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. देशातील घाऊक बाजारपेठेत काजू, बदाम, मनुक्यासह सुकामेव्याच्या दरात लक्षणीय घट झाली आहे. दिवाळीच्या सणाला सुकामेव्याला प्रचंड मागणी असते. मात्र, गेल्या काही महिन्यांत सुकामेव्याचे दर प्रचंड वाढले होते. बदामाचा प्रतिकिलो भाव 1200 रुपयांपर्यंत जाऊन पोहोचला होता. परंतु, घाऊक बाजारपेठेत आता हा दर 600 रुपयांपर्यंत खाली उतरला आहे. सुकामेव्याचा नवा दर बदामाचा भाव 1100 रुपयांवरून 680 रुपये किलोवर आला आहे. त्याचबरोबर कॅलिफोर्निया बदामाचा भाव 1120 रुपयांवरून 660 रुपयांवर घसरला आहे.त्याचप्रमाणे ऑस्ट्रेलियन बदामाचे भाव 1140 रुपयांवरून 680 रुपये किलोपर्यंत घसरले…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । पूर्वी गरोदरपणाचे २० आठवडे उलटून गेल्यावर गर्भात व्यंग असेल, बलात्कार पीडित असतील तर गर्भपाताच्या परवानगी घेण्यासाठी न्यायालयात जावे लागायचे. मात्र आता केंद्र शासनाकडून आलेल्या नवीन नियमानुसार तसेच संशोधनानुसार २० ते २४ आठवड्यांच्या गर्भपाताचे निर्णय डॉक्टरांना घेता येणार आहे. तसेच, २४ आठवड्यावरील व्यंग असलेली गर्भपाताची प्रकरणे मात्र मेडिकल बोर्डासमोर ठेऊन आठवड्याच्या आत निर्णय घेता येणार आहे. यामुळे सुरक्षित गर्भपाताला प्रोत्साहन मिळेल, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे स्त्रीरोग व प्रसूतिशास्त्र विभाग प्रमुख डॉ. संजय बनसोडे यांनी दिली आहे. पूर्वी भारतात सुरक्षित गर्भपात कायदा (एमटीपी ऍक्ट १९७१) लागू होता. यानंतर २००३ साली कायद्यावर नवीन संशोधन झाले. आता पुन्हा…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । मा. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ‘कोविड 19’ या साथरोगामुळे मृत्यू पावलेल्यांच्या वारसांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर तक्रार निवारणासाठी जिल्हास्तरीय समिती गठित करण्यात आली आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी अभिजित राऊत हे या समितीचे अध्यक्ष आहेत. ‘कोविड 19’मुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीतून प्रती मृत व्यक्तीसाठी रक्कम रुपये 50 हजार अर्थसहाय्य देणेबाबत निर्देश देण्यात आले आहेत. सदरचे अर्थसाहाय्य वितरणासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने त्यांच्याकडील 4 ऑक्टोबर, 2021 रोजीच्या निकालपत्रात ‘कोविड 19’ मुळे होणाऱ्या मृत्यूचा विचार करण्याचे निकष ठरविले आहेत. मा. सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे की,…

Read More