Author: saimat team

जळगाव, प्रतिनिधी । जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवार, 15 नोव्हेंबर, 2021 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे ऑनलाइन आयोजन करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पीडीत महिलांना प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे, त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा, शासकीय यंत्रणांकडून सोडवणुकीसाठी समाजातील पीडित महिलांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होवून प्रभावी उपाययोजना म्हणून महिला लोकशाही दिन जिल्हास्तरावर दर महिन्याचा तिसऱ्या सोमवारी व तालुकास्तरावर प्रत्येक महिन्याच्या चौथ्या सोमवारी राबविण्यात येतो. त्यानुसार महिला लोकशाही दिन ऑनलाइन आयोजीत करण्यात आलेला आहे. या लोकशाही दिनी ज्या महिलांना अर्ज करायचा असेल त्यांनी आपला अर्ज आपल्या तालुक्यातील तहसील कार्यालयाच्या ई- मेलवर पाठवावा. तसेच अर्जामध्ये आपला…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । जळगाव जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यात 22 नोव्हेंबर, 2021 पर्यंत मुंबई पोलिस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोटकलम (1) व (3) जारी करण्यात आले आहे. या कालावधीत पाच किंवा पाचपेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास संबंधित स्थानिक पोलिस ठाण्याच्या पूर्व परवानगीशिवाय सभा घेण्यास किंवा मिरवणुका काढण्यास बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश शासकीय कार्यक्रम, प्रेतयात्रा यांना लागू राहणार नाही. असे अपर जिल्हादंडाधिकारी राहुल पाटील यांनी प्रसिध्दीस दिलेल्या शासकीय पत्रकान्वये कळविले आहे.

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शहरातील दादावाडी परिसरातील श्रीराम नगररातील भक्तवत्सल श्रीराम मंदिर येथील मंदिराचा आज वर्धापन दिन असल्याने श्रीराम भक्तांनी व परिसरातील नागरिकांनी श्रीरामांच्या प्रतिकृतीत 1 हजार 100 दिवे लावून भक्तीमय वातावरणात वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा केला आहे. यावेळी 6 हजार फुटाची श्रीरामांची प्रतिमा साकारून 1 हजार 100 शेणमातीचे दिवे, 17 किलो तेल व 21 जणांनी या प्रतिमा साकारण्यासाठी परिश्रम घेतले. ही प्रतिमा सकारण्यासाठी तब्बल 5 तास लागले. या टीमचे नेतृत्व सचिन कुलकर्णी केले तर या प्रतिमा आशिष सोनवणे व हिमांशू सोनवणे यांनी साकारली. शहरातील नागरिकांनी या दोन दिवसीय कार्यक्रम व दर्शनाचा लाभ घेण्याचे आवाहन मंडळाचे अध्यक्ष कुंदन सुर्यवंशी यांनी…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । शिवशंभु संघटनेचे अमळनेर तालुका सरचिटणीसपदी विशाल कदम यांची व शिवशंभू संगटना जळगाव तालुका संपर्क प्रमुखपदी निवड करण्यात आली. संस्थापक अध्यक्ष महादेव पवार, शिवशंभु संघटना उपाध्यक्ष जळगाव जिल्हा सोपान मानकर, शिवशंभु संघटना अध्यक्ष नितीन पाटील, शिवशंभु संघटनेचा संघटकपदी आनंद आनंद घुगे व जळगाव जिल्ह्याचे संपर्क प्रमुख अध्यक्ष किरण ताडे यांनी नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. एकच निर्धार अन्याय विरुद्ध येल्गार या ब्रीदवाक्य प्रमाणे संघटनेचे कार्य व बहुजन समाजाच्या न्याय हक्कासाठी तसेच गाव तिथे शाखा आणि घर तिथे मावळा हे अभियान राबवून जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आवाज उठवणार असल्याचे यांनी निवडी प्रसंगी सांगितले.

Read More

यावल, प्रतिनिधी । जळगाव येथील उच्चभ्रू वस्तीत असलेल्या अजिंठा शासकीय विश्रामगृहात रगेंल लीला आणि मागासवर्गीय मुलीवर लैंगिक अत्याचार ? झाल्याची घटना चर्चिली जात असल्याने या घटनेची चौकशी करून जो कोणी असेल त्याला कायद्याच्या चौकटीत आणून कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी जनसामान्यांची मागणी असल्याचे निवेदन जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी जिल्हाध्यक्षा सौ वंदना अशोक चौधरी यांनी जिल्हाधिकारी जळगाव पोलीस अधीक्षक जळगाव यांच्याकडे लेखी निवेदनाद्वारे केली आहे. जळगाव शहरात पुन्हा 1994 मधील वासना कांदाच्या घटनेला उजाळा मिळत आहे का यासंदर्भात संपूर्ण जळगाव जिल्ह्यातील राजकारणात समाजात चर्चेला उधाण आले आहे. जिल्हाधिकारी जळगाव, पोलीस अधीक्षक जळगाव यांना दिलेल्या निवेदनात जळगाव जिल्हा राष्ट्रवादी महिला…

Read More

जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . आता या पक्षाचे सर्व २४ उमेदवार माघार घेतली आहे. आमदार गिरीश महाजन यांनी आताच या बहिष्काराची घोषणा केली आहे यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते . महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात सत्ताधारी आहेत . या आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते . आताच्या निवडणुकीसाठीती अशाच प्रयत्नांमध्ये आम्ही म्हणजे भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होतो . जागावाटपापर्यंत…

Read More

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील तारखेडा येथीलसुखदेव हिलाल पाटील (वय ४८) या शेतकऱ्याचा विहिरीत पडून पाण्यात बुडाल्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी उघडकीस आली. याप्रकरणी पाचोरा पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. सुखदेव पाटील हे सकाळी ८:३० वाजताच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. दुपारी ते पाणी घ्यायला जवळच्या शेतातील विहिर असलेल्या ठिकाणी गेले. मात्र विहीरीतून पाणी काढत असतांना त्यांचा तोल जावुन ते विहीरीत पडले. त्यातच पाण्यात बुडून त्यांचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी उघडकीला आली आहे. दरम्यान ते पाणी घेऊन परतले नसल्याने घरच्यांनी त्यांचा सर्वत्र शोध घेत असतांनाच धना अहिरे यांच्या शेतातील विहीरी जवळ सुखदेव पाटील यांचे बुट दिसून आले.…

Read More

जळगाव, प्रतिनिधी । भडगाव शहरातील अज्ञात व्यक्तींनी एकाला मारहाण केल्याप्रकरणी तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याप्रकरणी भडगाव पोलीस स्थानकात संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भडगाव शहरातील युवकाला अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण करून ठार मारल्याची धक्कादायक घटना उघडकीला आली. सद्दाम अली फतरू अली (वय-२४ , रा. यशवंत नगर, वरची बर्डी भडगाव ) असे मयत युवकाचे नाव असून संतप्त नातेवाईकांनी मृतदेह भडगाव पोलीस ठाण्याच्या आवारात आणून संशयितांवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी केली आहे. सद्दाम अली हे पत्नी यास्मीन व तीन मुलांसह राहत होते. बांधकामावरील सेटींगचे काम करून उदरनिर्वाह करत होते . शनिवारी रात्री सद्दाम अली नवीन पारोळा रोडवर ताडीच्या दुकानावर…

Read More

चाळीसगाव, प्रतिनिधी । शहरातील एका बंद घरातील चोरट्याने सोने चांदींसह रोकड लांबविल्याची घटना घडली. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिवाळी निमित्ताने बाहेरगावी गेलेल्या दाम्पत्याच्या बंद घरातील लाकडी कपाटातून सोने चांदी व रोकड असे ३ लाख ६४ हजार रुपये अज्ञाताने चोरून नेल्याची धक्कादायक घटना शहरातील छायादीग्राम भागात उघडकीला आली आहे. याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आले आहे. चाळीसगाव शहरातील छायादीग्राम भागात राहणारे अविनाश फकिरराव चव्हाण (वय-४०) हे दिवाळी निमित्ताने शनिवार, ६ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता घराला कुलूप लावून आपल्या परिवारासह नातेवाईकांकडे गेले. मात्र रविवार रोजी सायंकाळी ५ वाजता ते आपल्या घरी परतल्यावर स्वयंपाक गृहाच्या…

Read More

चाळीसगाव प्रतिनिधी । येथील बहाळ गावाजवळ अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत तालुक्यातील भऊर येथील मामा-भाच्याचा मृत्यू झाला असून तिसरा तरूण गंभीर जखमी झाला आहे. तालुक्यातील भऊर येथील आकाश भिवसन मोरे (वय १८), अनिल संजय गायकवाड (वय १९) व विनोद विक्रम मोरे (वय १९) हे तिघेही तरुण दुचाकी (एमएच- १९, डिएच- ०१३५)ने रविवारी दुपारी चाळीसगाव येथे गेले होते. यानंतर ते तिघेही रविवारी सायंकाळी पाचच्या सुमारास भऊर गावाकडे निघाले. दरम्यान बहाळ गावापासून जवळच असलेल्या वळण रस्त्यावर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिली. या अपघातात आकाश मोरे व अनिल गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर विनोद मोरे हा तरुण गंभीर जखमी झाला असून रुग्णालयात…

Read More