बालकवींचे स्मारक लवकर न उभारल्यास आंदोलन

0
11

साईमत, धरणगाव : प्रतिनिधी

ब्राह्मण तलावा शेजारील शेतात औदुंबराच्या झाडाखाली निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या काव्य प्रतिभेला जन्म देत बालकवी कविता लिहित होते. त्याच जागेवर उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिवसेना तालुका प्रमुख लेखक, कवी जयदीप पाटील यांच्या हस्ते बालकवींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात येवून बालकवींची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली. याप्रसंगी शिवसेनेचे जळगाव लोकसभा सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ यांनी कविवर्य बालकवी तसेच त्यांच्या साहित्य क्षेत्रात केलेली माहिती विषद केली. भविष्यात बालकवींचे स्मारक लवकरात लवकर न उभारले गेल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

शासन तसेच लोकप्रतिनिधींकडून बालकवींचे स्मारक पूर्ण होऊ शकत नाही. याबाबत गुलाबराव वाघ यांनी खंत व्यक्त केली. मतदारसंघात आजपर्यंत जे जे लोकप्रतिनिधी झाले त्यांनी बालकवींच्या स्मारकाबाबत अक्षम्य दुर्लक्ष केलेले आहे. बालकवींच्या स्मारकाविषयी हेळसांड सुरू आहे. याबाबत नगराध्यक्ष निलेश चौधरी यांनी नाराजी व्यक्त केली.

यांची होती उपस्थिती

याप्रसंगी जिल्हा संघटक राजेंद्र ठाकरे, तालुकाप्रमुख जयदीप पाटील, शेतकरी तालुकाप्रमुख विजय पाटील, उपतालुका प्रमुख कृपाराम महाजन, तालुका समन्वयक संतोष सोनवणे, शहर प्रमुख भागवत चौधरी, मा.नगरसेवक किरण मराठे, नगरसेवक जितेंद्र धनगर, महेश चौधरी, रवींद्र आहिरे, गजानन महाजन, हेमंत महाजन, संजय धामोळे, गोपाल महाजन, बापू महाजन, गोविंद पाटील, संजय पटूने, बंटी पवार, सतीश बोरसे, किरण अग्निहोत्री, रणजीतसिंग शिकरवार, जगदीश पाटील, रवि जाधव, जिभाऊ पाटील, सुभाष महाजन, पंकज महाजन, प्रसिद्धी प्रमुख गजानन महाजन, मंगेश पाटील, गोपाल पाटील, विनोद रोकडे तसेच शिवसेना युवा सेनेचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here