Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २४ उमेदवारांनी घेतली माघार
    जळगाव

    जिल्हा बँकेच्या निवडणुकीत २४ उमेदवारांनी घेतली माघार

    saimat teamBy saimat teamNovember 8, 2021No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    जळगाव प्रतिनिधी । जळगाव जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीवरच भाजपने बहिष्कार टाकला आहे . आता या पक्षाचे सर्व २४ उमेदवार माघार घेतली आहे.

    आमदार गिरीश महाजन यांनी आताच या बहिष्काराची घोषणा केली आहे यावेळी खासदार रक्षा खडसे , खासदार उन्मेष पाटील , आमदार राजूमामा भोळे , आमदार संजय सावकारे , आमदार मंगेश चव्हाण , पारोळ्याचे नगराध्यक्ष करण पवार , भाजपचे महानगराध्यक्ष दीपक सूर्यवंशी आदी उपस्थित होते .

    महाविकास आघाडीचे घटकपक्ष राज्यात सत्ताधारी आहेत . या आधी जिल्हा बँकेवर सर्वपक्षीय पॅनल तयार करून उमेदवार निवडून दिले होते . आताच्या निवडणुकीसाठीती अशाच प्रयत्नांमध्ये आम्ही म्हणजे भाजप सर्व पक्षांसोबत सुरुवातीपासून होतो . जागावाटपापर्यंत सर्व चर्चा झाली होती मात्र ऐनवेळी भाजपचा अन्य पक्षांनी विश्वासघात केला आणि निवडणुकीला भाग पाडले गेले . आमची पहिल्या दिवसापासून सहकार्याचीच भूमिका होती . मात्र आम्हाला गाफील ठेऊन बाकीच्यांनी ऐनवेळी भूमिका बदलल्या . खरे तर हे विश्वासघाती आणि सत्तेच्या लालसेने राजकारण होते . जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणारे सत्तेसाठीच असे बदलले . जिल्हा बँकेत ज्यांची सत्ता आहे त्यांचेच सहकारी कारखाने , सहकारी सूतगिरण्या , शैक्षणिक संस्था , उदयॊग आहेत . त्यांनीच जिल्हा बँकेकडून आपल्या अशा संस्थांसाठी कर्ज मिळवून घेतले आहे . ही सगळी त्यांची सुरुवातीपासून स्वतःच्या विकासाची खेळी आहे . शेतकऱ्यांना नुसते ‘बनवले’ गेले आहे . त्यासाठीच या निवडणुकीतसुद्धा त्यांना जिल्हा बँकेवर आपले वर्चस्व कायम हवे होते . जिल्हा बँक शेतकऱ्यांची बँक आहे असे म्हणणाऱ्यांनी जिल्हा बँकेकडून किती शेतकऱ्यांचा व अन्य उद्योगांचा विकास आतापर्यंत केला ? , या प्रश्नाचे उत्तर त्यांना जनतेपुढे द्यावेच लागणार आहे त्यासाठी भाजपचे जिल्ह्यातील ग्रामपंचायतींपासून , पंचायत समित्या , नगरपरिषद , महापालिका , जिल्हा परिषद , आमदार , खासदार असे सर्वच लोकप्रतिनिधी त्यांना पुढच्या काळात जाब विचारात रहाणार आहेत.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat team
    • Website
    • X (Twitter)

    Related Posts

    Jalgaon : बसस्थानक आवारातून दोन तरूणांचे मोबाईल लांबविले

    December 25, 2025

    Jalgaon : एकाच दिवसात ११०० वाहनांवर कारवाई

    December 25, 2025

    Jalgaon : रायपुरला ग्रामस्थ त्रस्त, ग्रामपंचायत मस्त

    December 25, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.