Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»फैजपूर»Departure Of Ashadhi Foot Dindi : खानापुरहून आषाढी पायी दिंडीचे ६ जूनला प्रस्थान
    फैजपूर

    Departure Of Ashadhi Foot Dindi : खानापुरहून आषाढी पायी दिंडीचे ६ जूनला प्रस्थान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 31, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    फैजपुरातील बैठकीत दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांची माहिती

    साईमत/फैजपूर/प्रतिनिधी:

    यावल आणि रावेर तालुक्यातील वारकरी परंपरेत महत्त्वाचे स्थान असलेल्या वै. डिगंबर महाराज चिनावळकर यांच्या आषाढी पायी दिंडीचे येत्या ६ जून रोजी खानापूर येथून प्रस्थान होणार असल्याची माहिती दिंडी समितीचे अध्यक्ष नरेंद्र नारखेडे यांनी दिली. यासंदर्भात फैजपूर येथे नुकतीच बैठक घेण्यात आली. अध्यक्षस्थानी नरेंद्र नारखेडे होते. यावेळी दिंडी परंपरेचे अधिपती दुर्गादास महाराज नेहते होते. बैठकीत दिंडीच्या नियोजनावर सविस्तर चर्चा करण्यात आली. बैठकीला उपाध्यक्ष घनश्याम भंगाळे, सचिव विठ्ठल भंगाळे, खजिनदार किशोर बोरोले, विश्वस्त जयराम पाटील, शरद महाजन, धनंजय चौधरी, विजय महाजन, रमेश महाजन, टेनूदास फेगडे, भास्कर बांडे, अतुल तळेले, ललिता महाजन, आशाबाई तळले यांच्यासह समिती सदस्य उपस्थित होते.

    दिंडीत सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांच्या सोयी सुविधांवर बैठकीत विशेष लक्ष देण्यात आले. प्रवासादरम्यान आवश्यक वाहने सोबत असतील आणि मुक्कामाची व्यवस्था डिगंबर महाराज मठात करण्यात येणार असल्याचे ठरले. त्यामुळे वारकऱ्यांचा प्रवास सुकर होणार आहे. ही दिंडी खानापूर येथून निघून चिनावल येथील डिगंबर महाराज समाधी स्थळी अभिषेक व भजनाने प्रारंभ करेल. त्यानंतर रोझोदा, खिरोडा, कलमोडा, बोरखेडा, हंबर्डी, भुसावळ, खडका, जामनेर, सिल्लोड, भोकरदन, जालना, बीड, बार्शी अशा विविध ठिकाणी मुक्काम करत ५०० किलोमीटरचा पायी प्रवास करून २३ दिवसात पंढरपूरला पोहोचणार आहे.

    दिंडीची परंपरा कायम

    दिंडीची परंपरा वै. डिगंबर महाराज चिनावळकर यांनी सुरू केली होती.त्यानंतर विठ्ठल महाराज, हंबर्डीकर आणि वै. अरुण महाराज, बोरखेडेकर यांनी पुढे सुरु ठेवली आहे. विणेकरी भगवंत महाराज चौधरी (खानापूरकर) यांचे परंपरेच्या पुनर्स्थापनेत सहकार्य लाभले आहे. दिंडीत सहभागी होणाऱ्या सर्व वारकऱ्यांनी ५ जून रोजी सायंकाळपर्यंत खानापूर येथे उपस्थित रहावे, असे आवाहन दिंडी प्रमुख दुर्गादास महाराज नेहते, विणेकरी भगवंत महाराज चौधरी यांनी केले आहे. यशस्वीतेसाठी अनिल नारखेडे, सुनील नारखेडे, एन.पी.चौधरी, राजेंद्र मानेकर, राजू मिस्त्री, शेखर चौधरी, भूषण नारखेडे, युवराज चोपडे, किरण चौधरी आदींनी परिश्रम घेतले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Faizpur : राष्ट्रीय गणित महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार

    December 27, 2025

    Faizpur : फैजपूर येथे श्रीमद् भागवत गीता पठण परीक्षेत चार महिला उत्तीर्ण

    December 24, 2025

    Breaking : बेपत्ता तरुणाचा मृतदेह नदीत आढळला; ‘घातपात’चा संशय, रावेर तालुक्यात खळबळ

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.