Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»Shirpur Taluka : शिरपूर तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात
    कृषी

    Shirpur Taluka : शिरपूर तालुक्यात नुकसानीच्या पंचनाम्यांना सुरुवात

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoMay 7, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    तहसीलदार महेंद्र माळी यांची माहिती

    साईमत/धुळे/प्रतिनिधी :

    तालुक्यात मंगळवारी सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊस, गारपीटमुळे अनेक गावात झालेल्या नुकसानाची प्राथमिक पाहणी करून पंचनामे करण्याचे काम तलाठी व मंडळ अधिकारी यांच्यामार्फत सुरू केल्याची माहिती शिरपुरचे तहसीलदार महेंद्र माळी यांनी दिली.

    जिल्ह्यात मंगळवारी अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस पडला. त्यामुळे अनेक ठिकाणी शेतपिके, घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे निर्देश पालकमंत्री जयकुमार रावल यांनी जिल्हा प्रशासनास दिले होते. त्याचबरोबर आ.अमरिशभाई पटेल, आ.काशिराम पावरा यांनीही पंचनामे करण्याबाबत सूचित केले होते. त्यानुसार जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्ह्यातील तहसिलदारांना नुकसानीचे पंचनामे त्वरित करुन अहवाल सादर करण्याबाबत कळविले होते. त्यानुसार शिरपूर तालुक्यातील करवंद, बाळदे, जातोडे, उंटावद, भोरखेडा, भावेर, खरदे, आढे, सावळदे, पिंपरी, आमोदे, दहीवद, असली, कळमसरे, अजंदे, वाघाडी, अर्थे, लौकी, टेंभे बु., तरडी या गावात अवकाळीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे सुरु केले आहे. तसेच करवंद आणि वाघाडी या भागात तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केळी व पपईच्या नुकसान झालेल्या फळबागेची स्वत: पाहणी केली.

    शेतकऱ्यांनी नुकसानीबाबत माहिती देण्याचे आवाहन

    ज्या शेतकऱ्यांनी केळी व पपई फळपिकांचा पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा काढला असेल अशा शेतकऱ्यांनी ७२ तासाच्या आत क्रॉप इन्श्युरन्स ॲप किंवा १४४४७ या टोल फ्री क्रमांकावर आपल्या नुकसानीबाबत (सूचना) द्यावी, असे आवाहनही तहसीलदार महेंद्र माळी, तालुका कृषी अधिकारी संजय पवार यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026

    Dhule:भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फुंकणार रविवारी प्रचाराचे रणशिंग

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.