रावेर तालुक्यात गारपिटीमुळे शेतकरी हवालदिल
रावेर (प्रतिनिधी)-
आज तालुक्यातील काही भागात वाऱ्यासह गारा पडून पावसाने हजेरी लावल्याने केळी बागांच मोठं नुकसान झालंय. उटखेडा, भाटखेडा तसेच मधल्या टप्प्यात गारांचा वर्षाव होऊन पाऊस झाला. शेतकरी हवालदिल झाले आहेत.
तापी नदीच्या किनारी भागांत वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने गारांमुळे केळी बागांचे नुकसान झाले आहे. आदिवासी भागांतही पावसाने हजेरी दिली आहे.
पारशा नालालगत रोडवर झाड कोसळल्याने दोन्ही बाजुंची वाहातुक ठप्प झाली होती. काही गावांना विजपुरवठा खंडीत झाला होता. उन्हाच्या तडाख्यानंतर पाऊस आल्याने वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.
बेमोसमी वादळी पावसामुळे केळी बागांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याची भिती व्यक्त केली जात आहे. तहसिलदार बंडु कापसे यांनी सांगितले की, वादळ, पाऊस व गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचा आढावा घेण्याचे काम सुरू आहे. नुकसानीचे पंचनामे लवकरच होतील.