Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»जिल्ह्यात २६९७ शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई
    कृषी

    जिल्ह्यात २६९७ शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई

    Vikas PatilBy Vikas PatilMarch 26, 2025No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

     

    जिल्ह्यात २६९७ शेतकऱ्यांना ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई

    जळगाव (प्रतिनिधी)-

    नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे बाधित झालेल्या धुळे व जळगाव जिल्ह्यातील २६९७ शेतकऱ्यांसाठी भरपाईची रक्कम प्राप्त झाली आहे. त्यामुळे या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच ३ कोटी २२ लाख ३ हजारांची रक्कम जमा करण्यात येणार आहे.

    नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे यावल व रावेर तालुक्यातील पिकांना फटका बसला होता. केळी उत्पादक भागातील केळीच्या बागा पाऊस आणि गारांच्या माऱ्याने कोलमडून पडल्या होत्या. रब्बीच्या पिकांचेही नुकसान झाले होते. हरभरा, गहू, तूर, पपईचेही नुकसान झाले होते. अनेक ठिकाणी सीसीआय केंद्रावर शेतकऱ्यांनी बैलगाड्यांमध्ये आणलेला कापूसदेखील ओला झाल्याने त्यांना नुकसान सहन करावे लागले होते.

    यावल तालुक्यातील भालोद, बामणोद, आमोदा, म्हैसवाडी, राजोरा, बोरावल तर रावेर तालुक्यातील सावद, चिनावल, वाघोड कोंद यासह अनेक गावांना पावसाचा फटका बसला होता.

    रावेर व यावल तालुक्यात ११०८ हेक्टर्सवरील पिकांचे नुकसान झाले होते. दोन्ही तालुक्यांतील २९ गावातील १४०७ शेतकरी बाधित झाल्याचा अहवाल कृषी विभागाने सादर केला होता. यात सर्वाधिक ५८८ हेक्टरवरील हरभऱ्याचे तर ३८४ हेक्टरवरील केळीचे नुकसान झाले होते. तूर, गहू व मक्याच्या पिकांचे काहीअंशी नुकसान झाले होते. जिल्हा प्रशासनाने अहवाल सादर केल्यानंतर १९ मार्चरोजी ३ कोटी २२ लाख ३ हजारांची भरपाई मंजूर करण्यात आली आहे. भरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार अाहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Vikas Patil
    • Website

    Related Posts

    Chalisgaon : चाळीसगाव शहरात भरवस्तीत घरफोडी; सव्वादोन लाखांचा ऐवज लंपास

    February 26, 2026

    Jalgaon:जळगाव शहरात भरदिवसा ८ लाखांची रोकड लंपास; दुचाकी डिक्की फोडून चोरटा फरार

    February 26, 2026

    Chopra:१० हजारांच्या कर्जासाठी २ लाख व्याज भरूनही तरुणाची आत्महत्या

    February 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.