Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»लोकसहभागातून मातीचा बंधारा टाकल्याने नदीला वाहतेय पाणी
    कृषी

    लोकसहभागातून मातीचा बंधारा टाकल्याने नदीला वाहतेय पाणी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoSeptember 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    माजी नगराध्यक्ष ॲड. हरीश रावळ यांचे होतेय सर्वत्र कौतुक

    साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

    शहरातून नळगंगा नदी जाते. या नदीवर गेल्या पाच सहा वर्षांपासून उन्हाळ्यात मातीचा बंधारा टाकून पाणी थांबविण्याचे कार्य लोकसहभागातून नगराध्यक्ष हरीश रावळ करतात. त्यामुळे आज ४५ फूट खोल व एक किलोमीटर लांब व नदीच्या दोन्ही पात्र भरलेला बंधारा तयार झाला आहे. त्यामुळे शहराला गोड पाण्याचा भरपूर फायदा होत आहे. अशा लोकसहभागाच्या कार्यामुळे हरीश रावळ यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

    गेल्या पाच-सात वर्षापासून नळगंगा नदीमध्ये माता महाकाली प्रभागाजवळ रोहिदास नगरच्या बाजूला नळगंगा नदीपात्रात लोकसहभागातून मातीचा जवळ-जवळ ५० फूट उंचीचा बंधारा नगराध्यक्ष हरीश रावळ यांनी बांधला.दरवर्षी बंधाऱ्याची दुरुस्ती करून त्यात पोकलेन लावून नदीतील गाळ व मुरूम टाकून पाणी थांबविण्यात येते. आज परिसरात ४५ फूट खोल व नदीचे दोन्ही पात्र तुडूंब भरलेले पाणी जवळपास एक किलोमीटर दूरपर्यंत थांबलेले आहे. त्यामुळे लाखो-करोडो लिटर पाणी जमिनीत मुरत आहे.

    शहरवासियांची भागतेय तहान

    या भागातील खारे पाणी गोड होऊन हातपंप आणि विहिरींना भरपूर पाणी लागले आहे. वरून दिसेल असे पाणी पोहोचले आहे. नदीच्या त्या पलीकडे ज्या लोकांच्या शेती आहे. त्यांनाही बंधाऱ्यामुळे भरपूर फायदा होत आहे. गेल्या एक महिन्यांपासून मलकापूर शहराला बंधाऱ्यातून जुन्या जॅकवेलवरून पाणीपुरवठा करण्यात येतो. पूर्णा नदीला नेहमी पूर येत असल्याने धोपेश्वर येथून नगरपालिकेचा पाणीपुरवठा आहे तो बरेचवेळा खंडित होतो. परंतु हा पाणीपुरवठा अखंडितपणे सुरु आहे. त्यामुळे मलकापूर शहरवासियांची तहान भागवत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur : अभियंत्यांच्या आशीर्वादाने निकृष्ट कामे?

    December 20, 2025

    Malkapur : राष्ट्रीय विद्यालय पिंप्रीगवळीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

    December 20, 2025

    Malkapur : शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूलच्या

    December 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.