Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»अमळनेर»नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभागांसह अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय
    अमळनेर

    नेपाळ दुर्घटनेत मदतीसाठी सर्व विभागांसह अधिकाऱ्यांनी साधला योग्य समन्वय

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 26, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांची माहिती

    साईमत/अमळनेर/प्रतिनिधी :

    नेपाळ दुर्घटनेत जळगाव जिल्ह्यातील भाविकांचा समावेश असताना त्यांना मदतीसाठी व त्यांचे मृतदेह जळगाव येथे आणण्यासाठी शासन स्तरावरील सर्व विभागांसह अधिकाऱ्यांनी योग्य समन्वय साधून मदतकार्य केल्याने मृतदेह वेळीच आणण्यात यश मिळाल्याची माहिती मदत व पुनर्वसन आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री अनिल पाटील यांनी दिली.

    जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील देवदर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या बसला उत्तर काठमांडू (नेपाळ) कडे जाताना भीषण अपघात झाला होता. उत्तर प्रदेशातील ही खासगी बस खोल नदीत कोसळून बसमधील २६ भाविकांचा मृत्यू झाला तर १६ जण गंभीर जखमी झाल्याची माहिती हाती आली. दुथडी भरुन वाहणाऱ्या नेपाळमधील नदीत काही भाविक वाहून गेले असल्याने त्यांचा शोध लागलेला नव्हता. हे सर्व भाविक भुसावळ तालुक्यातील वरणगाव- तळवेल व परिसरातील आहे. नेपाळची राजधानी काठमांडूपासून १२० किलोमीटरवर पश्चिमेकडे अबुखैरेनी गावाजवळ हा अपघात घडला. नेपाळमधील जवानांचे मदत पथक घटनास्थळी तत्काळ दाखल झाल्यामुळे काही भाविकांना वाचविण्यात यश मिळाले तर बेपत्ता भाविकांसाठी शोधकार्य सुरुच होते.

    प्रशासकीय बाबींची संपर्कामुळे वेळेवर पूर्तता

    उर्वरित पर्यटकांना गोरखपूर रेल्वे स्थानक उत्तर प्रदेश येथून गोरखपूर भुसावळ रेल्वेच्या माध्यमातून जळगाव, महाराष्ट्र येथे येण्याकरिता विशेष बोगीची व्यवस्था केली आहे. सर्व मृतदेह जळगाव याठिकाणी आणण्याकरिता मंत्रालय नियंत्रण कक्ष हे नेपाळमधील भारतीय दूतावास, राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण नवी दिल्ली, उत्तर प्रदेश सरकार व भारतीय वायु सेना यांच्या सातत्याच्या संपर्कामुळे प्रशासकीय बाबींची वेळेवर पूर्तता करता आली. त्यासाठी वरील विभाग २४ तास तत्पर असल्याचे मंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. दरम्यान, घटनेबाबत मंत्री अनिल पाटील यांनी वरणगाव येथे जाऊन मृतकांच्या नातेवाईकांचे सांत्वन करत झालेल्या घटनेबाबत दुःखही व्यक्त केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Amalner : अमळनेर गावात विवाहितेचा विनयभंग

    January 14, 2026

    Amalner : अमळनेरमध्ये दुचाकीवर जाताना मांजाने गळा कापला

    January 14, 2026

    Amalner:दहिवद ग्रामपंचायतीच्या वृक्षलागवडीची शास्त्रज्ञांकडून पाहणी

    December 29, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.