साईमत, मलकापूर : प्रतिनिधी
अमळनेर येथे पुढील महिन्यात होणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझल कट्ट्यासाठी मलकापूर येथील गझलकार सुरेश तायडे ह्यांच्या गझलची निवड झाली असल्याचे साहित्य महामंडळाकडून कळविण्यात आले आहे. येत्या ४ फेब्रुवारीला अमळनेर येथे त्यांच्या गझलेचे सादरीकरण होणार आहे.
ह्यापूर्वी त्यांनी नाशिक, उस्मानाबाद येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात गझलेचे आणि कवितेचे सादरीकरण केलेले आहे. त्यांचा ‘भाकरी कवितेतली’ हा काव्यसंग्रह प्रसिद्ध आहे. सामाजिक आशय असलेल्या त्यांच्या कविता आणि गझल विशेष प्रसिद्ध आहेत. त्यांच्या निवडीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.