Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»क्राईम»मुलीने लव्ह मॅरेज केले, वडिलांनी तीन वर्षांनी घेतला बदला , दिड वर्षांच्या नातीसह तिघांना संपवले
    क्राईम

    मुलीने लव्ह मॅरेज केले, वडिलांनी तीन वर्षांनी घेतला बदला , दिड वर्षांच्या नातीसह तिघांना संपवले

    Milind KolheBy Milind KolheJanuary 12, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    भागलपूर :

    एखाद्याचा द्व्‌ेष कुठल्या थराला जाऊ शकतो याचे एक अत्यंत भयंकर उदाहरण भागलपूरमध्ये पाहायला मिळाले. जिथे मुलीने प्रेमविवाह केल्याने तिच्या घरच्यांनी दिड वर्षांच्या चिमुकलीसह जोडप्याला संपवले. ही घटना नवगचिया पोलिसांच्या हद्दीतील गोपालपूरच्या नवतोलिया गावातील आहे.

    नवतोलिया येथील रहिवासी चंदन कुमार (४०), त्यांची पत्नी चांदनी कुमारी उर्फ चंदा कुमारी आणि त्यांची दीड वर्षांची मुलगी रोशनी कुमारी यांची हत्या करण्यात आली आहे. या तिघांची हत्या दुसरं कोणी नाही तर त्यांच्याच नातेवाईकांनी केली. प्रेमविवाह केल्याच्या रागातून पिता-पुत्राने मिळून ही हत्या केल्याची माहिती आहे. चंदा कुमारीचे वडील प्रमोद सिंग उर्फ पप्पू सिंग आणि त्यांचा मुलगा धीरज सिंग यांनी या तिघांचा अत्यंत निर्दयीपणे खून केला.

    पप्पू सिंगने मुलगी चंदा आणि जावई चंदन यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला केला, तर मुलाने गोळीबार केला. मृत चंदन कुमार आणि चंदा देवी पळून गेले होते आणि २०२१ मध्ये त्यांनी प्रेमविवाह केला होता. यानंतर त्यांना एक मुलगीही झाली. काही दिवसांपूर्वीच हे जोडपं आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह घरी परतले होते.

    मुलगी आणि जावई आई-वडिलांना भेटून त्यांच्या नवीन घरी जात असताना चंदाचे वडील पप्पू सिंग आणि भाऊ धीरज कुमार यांनी तिघांचीही गोळ्या झाडून हत्या केली. याप्रकरणी मृताच्या भावाचे सांगितले की, आम्ही घरीच होतो. गोळीचा आवाज ऐकून आम्ही बाहेर आलो तर चंदाचा भाऊ धीरज कुमार गोळीबार करत होता आणि तिघांनाही गोळ्या लागल्या होत्या. आम्ही काही करणार तोपर्यंत तिघांचाही मृत्यू झाला होता.

    घटनेनंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला. एसपींनी दिलेल्या माहितीनुसार, मुलीला तिच्या वडिलांनी आधी रॉडने मारले आणि नंतर भावाने गोळीबार केला. यात तिघांचा मृत्यू झाला. सध्या याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला असून आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार करून छापे टाकण्यात येत आहेत.

    नवतोलिया येथील पप्पू सिंग यांची मुलगी चंदा कुमारी हिचा याच गावातील सेवानिवृत्त शिक्षक गणेश प्रसाद सिंग यांचा मुलगा चंदन कुमार याच्यासोबत प्रेमविवाह झाला होता. दोघेही एकाच जातीचे असूनही चंदाचे वडील पप्पू सिंग यांनी हा प्रतिष्ठेचा मुद्दा बनवून ही घटना घडवून आणली. तिन्ही मृतांच्या डोक्यात, पोटात आणि डोळ्यावर अगदी जवळून गोळ्या झाडल्या होत्या. दीड वर्षाची मुलगी रोशनीच्या डोळ्यात गोळी लागली होती. या तिघांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमधून हळहळ व्यक्त केली जात आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    Entrepreneur Attacked Brutally : उद्योजकावर जीवघेणा हल्ला ; एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल

    December 18, 2025

    Jalgaon : विषारी औषध सेवन केल्याने तरूणाचा उपचारावेळी मृत्यू

    December 18, 2025

    Jalgaon : एका लाखासाठी विवाहितेचा छळ

    December 18, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.