साईमत, पाचोरा : प्रतिनिधी
शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये महाराष्ट्रभर सुरू असलेल्या ‘होऊ द्या चर्चा’ अभियानांतर्गत पाचोरा तालुक्यातील तारखेडा येथे शिवसेनेच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी, उपजिल्हाप्रमुख उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हाप्रमुख अरुण पाटील, तालुकाप्रमुख शरद पाटील, युवासेनेचे जिल्हा उपप्रमुख संदीप जैन, युवा सेनेचे तालुकाप्रमुख शशिकांत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत ‘होऊ द्या चर्चा’ कार्यक्रम नुकताच घेण्यात आला. कार्यक्रमात वैशाली सूर्यवंशी यांनी सरकारच्या नाकर्तेपणाचा खरपूस समाचार घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी खोटी आश्वासने देऊन जनतेची दिशाभूल केली आहे. तसेच माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या कामांचा लेखाजोखा जनतेसमोर मांडला.
कार्यक्रमाला नरेंद्रसिंग सूर्यवंशी, ज्ञानेश्वर पाटील, गोपाल परदेशी, विलास पाटील, गोपाल पाटील, दत्तू कुमावत, प्रवीण पाटील, रमेश पाटील, भारत पाटील, योगेश पाटील, दीपकसिंग परदेशी, ज्ञानेश्वर पाटील, जितेंद्र महाजन, दगडू शिंदे, दादाभाऊ राजपूत, किशोर जाधव, जमेल कहाकर, भीमसिंह राजपूत, आनंदा पाटील, अरुण तांबे, प्रितेश जैन, नाना आप्पा, अरुण पाटील, धनंजय पाटील, दिलीप साहेबराव, अभिमान पाटील, विश्वनाथ पाटील, सुपडू महाजन, श्रीराम पाटील, सुभाष महाजन, शिवाजी पाटील, शांताराम पाटील, शिवदास पाटील, पिंटू पाटील, सुनील पाटील, ज्ञानेश्वर पाटील, दशरथ पाटील, नाना पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत पाटील, प्रवीण पाटील, दगडू शिंदे, रोहित पाटील यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक उद्धव मराठे तर सूत्रसंचालन धनंजय पाटील यांनी केले.