विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना आता संताप दाखविण्याची वेळ

0
28

साईमत, अमळनेर : प्रतिनिधी

जिल्ह्यात जुलै महिन्यात शेवटच्या आठवड्यात ऑगस्ट महिन्यात पाऊस नसल्यामुळे अमळनेर तालुक्यातील परिसरात आठही मंडळात कापूस, मका, सोयाबीन, बाजरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. कृषी अधिकाऱ्यांनी शेतकऱ्याची व्यथा नुकसानीची माहिती सादर करूनही त्यांना अद्यापपर्यंत भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे आता विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांवर संताप व्यक्त होत आहे. दरम्यान नुकसान भरपाईसाठी शेतकऱ्यांचा अंत पाहू नका, असा गर्भित इशारा तालुक्यातील शेतकऱ्यांनी विमा कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिला आहे. विमा कंपन्यांनी तातडीने नुकसान भरपाई द्यावी, शासन स्तरावर जळगाव जिल्ह्यातील मंत्र्यांनी शेतकऱ्यांसाठी पाठपुरावा करावा, अशी परिसरातील शेतकऱ्यांकडून मागणी होत आहे.

जिल्ह्यातील कापूस, मका, सोयाबीन, बाजरी उत्पादक शेतकरी नुकसानीमुळे हवालदिल झालेला आहे. अस्मानी संकटासह सुलतानी संकटांचाही शेतकऱ्यांना सामना करावा लागत आहे. नैसर्गिक आपत्तीमुळे कोरडवाहू शेतकरी व बागायतदार शेतकरी कापूस, मका, सोयाबीन, बाजरी उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक अडचणीत सापडला आहे. शेतकऱ्याला दिलासा देण्यासाठी शासनाच्या आदेशानुसार पंचनामे पूर्ण करण्याची प्रक्रिया झाली आहे. तालुक्यात विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी प्रत्यक्ष येऊन पिकांची पाहणी करूनही ते न पाहिल्याचा देखावा करत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here