स्वच्छतेचा संदेश देत महात्मा गांधी, लालबहादूर शास्त्री यांना अभिवादन

0
32

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

शहर महिला काँग्रेस, तेजस्विनी फाउंडेशन आणि आ.प्रणिती शिंदे विचार मंच, चाळीसगावतर्फे स्वच्छतेचा संदेश देत महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांची जयंती शांतीनगरातील श्री संत नामदेव नगर, पवारवाडीत चाळीसगाव शहर महिला काँग्रेस कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी चाळीसगाव शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा अर्चना पोळ, गायत्री देवरे, मोनिका परदेशी यांनी महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेस माल्यार्पण करून त्यांना अभिवादन केले.

यावेळी अर्चना पोळ यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधीजी आणि ‘जय जवान जय किसान’चा नारा देणारे देशाचे माजी पंतप्रधान तथा गृहमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्याविषयी मनोगत व्यक्त केले. श्री संत नामदेव नगर, शांतीनगर, पवारवाडी, चाळीसगाव परिसरात सर्व महिलांनी स्वच्छतेचा संदेश देत ‘एक तास स्वच्छतेचा’ उपक्रम गांधी जयंतीनिमित्त राबविला. यावेळी अर्चना पोळ, गायत्री देवरे, सविता पाटील, मनीषा पाटील, शीतल सरोदे, प्रियंका देवरे, रंजना भोई, रेखा राणा, मोनाली परदेशी, अमृता परदेशी, कविता रोकडे, शिरोडेताई, भूमिका वाघरी, रिता वेळीस, नीता वेलीस, ज्योती सुरवाडकर, तेजस्विनी पोळ यांच्यासह परिसरातील महिला कार्यकर्त्यांनी उस्फूर्तपणे स्वच्छता मोहिमेत सहभाग घेत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here