साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
पालकमंत्री ना.गुलाबराव पाटील यांच्या शिफारशीने तसेच ग्रामविकास मंत्री ना.गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली आ.मंगेश चव्हाण यांच्या पाठपुराव्याने चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समिती नुकतीच जाहीर केली आहे. समितीच्या अध्यक्षपदी हिरापूरचे भाजपाचे कार्यकर्ते भैय्यासाहेब आनंदराव पाटील यांची नियुक्ती केली आहे. इतर सदस्यपदी विविध समाजघटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे. विधवा, दिव्यांग, अनाथ व वृद्ध गोरगरीबांसाठी महत्त्वाची असणाऱ्या शासनाच्या समितीवर गेल्या वर्षभरापासून अशासकीय पदे रिक्त होती. आ.मंगेश चव्हाण यांच्या सुचनेने पदावर १० अशासकीय सदस्यांची नियुक्ती केल्याने पुन्हा एकदा निराधारांच्या मानधन प्रकरणांना गती मिळणार आहे. समितीवर नियुक्त झालेल्या सर्व सदस्यांचे आ.मंगेश चव्हाण यांनी कौतुक केले आहे.
चाळीसगाव तालुका संजय गांधी निराधार समितीत अध्यक्षपदी भैय्यासाहेब आनंदराव पाटील (हिरापूर), मागासवर्गीय प्रतिनिधी अभिषेक प्रभाकर मोरे (वडाळा वडाळी), महिला प्रतिनिधी मनीषा रवींद्र मराठे (तरवाडे), विमुक्त जाती भटक्या जमाती प्रवर्ग प्रतिनिधी दिनकर धनसिंग राठोड (चैतन्य तांडा), ओबीसी प्रतिनिधी प्रभाकर पांडुरंग चौधरी (चाळीसगाव), सर्वसाधारण प्रवर्ग प्रतिनिधी प्रवीण शिवाजीराव मराठे (चाळीसगाव), अपंग प्रवर्ग प्रतिनिधी सचिन लहू पाटील (टेकवाडे), स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी किशोर प्रल्हाद रणधीर (टाकळी प्रचा), सामाजिक क्षेत्र प्रतिनिधी शांताराम (पिंटू) गायकवाड (पातोंडा), ज्येष्ठ नागरिक प्रतिनिधी देविदास हरी बच्छे (सायगाव) आदींचा समावेश आहे.