Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»भुसावळ»भुसावळात दहा दिवसात पिण्याचे मुबलक पाणी देणार
    भुसावळ

    भुसावळात दहा दिवसात पिण्याचे मुबलक पाणी देणार

    SaimatBy SaimatSeptember 25, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत भुसावळ प्रतिनिधी

    शहरात विविध समस्यांमुळे नागरीकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. याकडे भुसावळ नगरपरिषदेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. या अनुषंगान शिवसेनेच्या (उबाठा) वतीने आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला होता.दरम्यान, आंदोलनाची दखल घेत प्रांताधिकाऱ्यांनी न.पा.मुख्याधिकारी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत शहरातील समस्येवर तोडगा काढण्यासाठी बैठक लावण्यात आली होती. यावेळी येत्या १० दिवसात सर्व समस्या सोडवण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

    यावेळी प्रांताधिकारी जितेंद्र पाटील, न.पा. मुख्याधिकारी महेश वाघमोडे, शिवसेना शहर प्रमुख दीपक धांडे , बबलू बर्हाटे, माजी नगरसेवक पप्पू बारसे, स्वप्निल सावळे, माजी नगरसेवक दिलीप सुरवाडे, पिंटू भोई, अमजद शेख, नबी पटेल, मनोज पवार, महमूद शेख, राकेश खरारे, अरुण साळुंके आदि पदाधिकारी, शिवसैनिक उपस्थित होते.

    बैठकीत शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख दीपक धांडे यांनी सांगितले की, शहरात शुद्ध स्वच्छ पाणी पुरवठा होत नसल्याने नागरिकांना आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होत आहे. १०-१५ दिवसांनी पाणी मिळते. त्यामुळे सामान्य गरीब नागरिकांना सतत पाणी टंचाई ला सामोरे जावे लागते. गरीब जनतेला एवढे दिवस पाणी साठवण्यासाठी कोणतीही सुविधा नसते. तसेच झोपडपट्टी परिसरात जनतेला राहण्यासाठी पुरेशी जागा नसते त्यातच १० दिवसांनी होणाऱ्या पाणी पुरवठ्यामुळे या गरीब जनतेने जगावं कसं असा प्रश्न निर्माण झालेला आहे असेही ते म्हणाले.

    महत्त्वाच्या पाणी समस्ये बाबत गांभीर्याने लक्ष घालून ८ दिवसात स्वच्छव नियमित पाणी पुरवठा कसा होईल असे नियोजन करण्या बाबत, तसेत शहरातील खड्डे, लाईट, साफसफाई होण्या बाबतीतच्या समस्या येत्या १० दिवसांमध्ये सोडवण्याचे अधिकाऱ्यांनी आश्वासन दिले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : साकेगाव येथील नवोदय विद्यालयाच्या सुविधांचा जिल्हाधिकाऱ्यांकडून सखोल आढावा

    February 5, 2026

    Bhusawal : १० लाखांची आर्थिक फसवणूक आणि धमक्या

    February 4, 2026

    Bhusawal : संतोषी माता सभागृहाचा ताबा भुसावळ नगरपालिकेकडे

    February 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.