Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»पक्षाने आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी
    जळगाव

    पक्षाने आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी

    SaimatBy SaimatSeptember 16, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत जळगाव प्रतिनिधी

    शिवसेना पक्ष प्रमुखांनी आदेश दिल्यास विधानसभेची निवडणूक लढविण्याची तयारी असल्याचे मावळत्या महापौर जयश्री महाजन यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत आपली सुप्त इच्छा बोलून दाखविली. महानगरपालिकेची मुदत १७ सप्टेबर रोजी संपत असल्याने शनिवारी महापौर दालनात महापौर जयश्री महाजन व उपमहापौर कुलभूषण पाटील यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेतली त्या वेळी त्या बोलत होत्या.

    यावेळी विरोधी पक्षनेते सुनील महाजन, नगरसेवक किशोर बाविस्कर, एमआयएमचे गटनेते रियाज बागवान उपस्थित होते. त्या म्हणाल्या की, शिवसेनेत प्रत्येक शिवसैनिक पदास लायक असतो, पक्षप्रमुख जो आदेश देतात तो सर्वांना मान्य करण्याची पध्दत आहे. तेच सूत्र आगामी विधानसभेसाठी लागू राहणार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख ज्यांना उमेदवारी देतील तो आमचा उमेदवार असेल. अडीच वर्षाच्या कार्यकाळात झालेली विकासकामे, आगामी काळात होऊ घातलेली कामे याबाबत त्यांनी माहिती दिली. महापालिकेने नाहरकत प्रमाणपत्र दिल्यानुसार बांधकाम विभागामार्फत शहरात १०० कोटी व ८५ कोटीचे कामे पावसाळ्यानंतर सुरु होणार आहेत. डिसेंबर अखेरपर्यंत शहरात रस्ते झालेले असतील. एक वेगळं चित्र तेव्हा असेल. महापालिकेत प्रथमच नगरसेवक निधीचा हेड तयार करुन अर्थसंकल्पात प्रत्येक नगरसेवकासाठी २५ लाखाच्या निधीची तरतूद करण्यात आली.

    त्या म्हणाल्या की, मध्यंतरी आपल्या निष्ठेबाबत शंका उपस्थित करण्यात आली. शरद पवार हे महाविकास आघाडीचे नेते आहेत. ते आमच्या भागातूनच जाणार असल्याने शहराच्या प्रथम नागरिक या नात्याने त्यांना घरी येण्याचे निमंत्रण दिले. ते त्यांनी स्विकारले. आम्ही त्यांचा सत्कार केला. आपल्या घरी कोणीही मोठी व्यक्ती आली तर आनंद होतोच. यात निष्ठेबाबत शंका घेण्याचे काहीच कारण नाही.

    मुख्यमंत्र्यांच्याच हस्ते अनावरण करावा नियम नाही

    राजशिष्टाचारानुसारच सरदार वल्लभभाई पटेल यांच्या पुतळ्याचे अनावरण केले आहे. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याच हस्ते अनावरण करावे, असा कोणताही नियम नाही. कोणाच्या हस्ते अनावरण करावे याचे पूर्ण अधिकार महापालिकेला आहेत. मनपा ही स्वायत्त संस्था आहे. राजशिष्टाचारानुसार जिल्ह्यातील तिन्ही मंत्री व शहराच्या आमदारांना निमंत्रण दिले होते. राजशिष्टाचार पाळला नाही असा आक्षेप घेणे चुकीचे नाही असेही महापौर म्हणाल्या.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Bhusawal : भुसावळ पोलिस उपअधीक्षकपदी केदार बारबोले

    December 23, 2025

    Neri, T.Jamner : देवप्रिंपी गावात कृषी दूतांचे आगमन

    December 23, 2025

    Sports Sector Is Important : युवकांच्या उज्वल भविष्यासाठी क्रीडा क्षेत्र महत्त्वाचे : केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे

    December 23, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.