साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी
येथील नगरपालिकेच्या मंगल कार्यालयामागे गटारी, नाल्या, घाण पाणीने व नालीत कचरा अडकून दुर्गंधी पसरली आहे. त्यामुळे येथील रहिवाश्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सफाई कामगार आणि त्यांचे मुकडदम सफाई निरीक्षक याकडे लक्ष देऊन या भागातील नाल्या, गटारी व परिसर स्वच्छ करतील का? असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे नगरपालिका आता याकडे लक्ष देऊन स्वच्छतेचा निर्णय घेतील का, याकडे नागरिकांचे लक्ष लागून आहे.
या भागातील लहान बालके आजारी पडत आहे. नगरपरिषदेमध्ये अनेक तक्रारी करूनही सफाई कामगार इकडे फिरकण्यास तयार नाही. या भागातील काही माजी नगरसेवक यांच्या घराच्या आजूबाजूला असलेली नाली व परिसर मात्र स्वच्छ हे कर्मचारी करतात. मात्र या भागातील रहिवाशी यांचे हे सफाई कामगार महिन्या दोन महिन्यात सफाई करतात. सकाळी झाडणारे पण येत नाही,अशी तक्रार नागरिकांनी प्रस्तुत प्रतिनिधीकडे केली आहे.