Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»शिवसेना ठाकरे गटातील खासदाराचा तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप
    राजकीय

    शिवसेना ठाकरे गटातील खासदाराचा तानाजी सावंत यांच्यावर गंभीर आरोप

    Milind KolheBy Milind KolheAugust 20, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    परभणी ः

    परभणीचे शिवसेना ( ठाकरे गट ) खासदार संजय जाधव यांनी आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री तानाजी सावंत यांच्यावर टीका केली आहे. निधीबाबत तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाही. पैसे दिल्यावरच निधी दिला जातो, असा गंभीर आरोप संजय जाधव यांनी केला आहे. ते एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलत होते.

    संजय जाधव पुढे म्हणाले की, “परभणी जिल्ह्याच्या निधीबाबत पालकमंत्री तानाजी सावंत कोणालाही विश्वासात घेत नाहीत. गेल्यावर्षीचा एक दमडीही निधी मिळाला नाही. कररुपातून उभा राहिलेला तो निधी आहे. स्थानिक स्वराज्य संस्था अस्तित्वात नसल्याने निधीचे मालक पालकमंत्री झाले आहेत.ते कोणालाच मोजायला तयार नाहीत.पैसे दिले, तरच निधी दिला जातो, अशी परिस्थिती जिल्ह्यात सुरु आहे.

    “जे शिंदे गटात गेले तर निधी मिळतो. त्यांच्याकडे न जाणाऱ्यांना निधी दिला जात नाही. ज्या पक्षाने आमची जडणघडण केली, त्याच्याशी प्रामाणिक राहणे ही आमची संस्कृती आहे. विरोधी पक्षात असताना १० वर्षे आमदार म्हणून काम केले पण, यापूर्वी कधीही अशाप्रकारचा त्रास झाला नाही,अशी खंत संजय जाधव यांनी व्यक्त केली.

    एकनाथ शिंदेंनी वेळकाढूपणा केला

    उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नटराज रंगमंदिराचे नुतनीकरण करण्यासाठी ७ कोटी रुपयांचा निधी मागितला होता. उद्धव ठाकरे यांनी निधी देण्याचे कबुल केले पण, एकनाथ शिंदे यांनी नगरविकास मंत्री असताना वेळकाढूपणा करण्याचे काम केले. मुख्यमंत्री झाल्यानंतर एकनाथ शिंदेंना निधीबाबत पत्र लिहिले पण अद्यापही निधी मिळाला नाही.पर्यटन विभागाने ३० कोटींचा निधी दिला होता. त्यालाही स्थगिती लावली आहे,असेही संजय जाधव यांनी सांगितले.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    Jamner : जामनेर नगरपरिषदेत भाजपची सत्ता कायम

    December 21, 2025

    Manikrao Kokate Resign : कोकाटेंच्या राजीनाम्याने मंत्रिमंडळात फेरबदल; अजित पवार नवे क्रीडामंत्री

    December 17, 2025

    Indefinite Strike Warning : महसूल कर्मचाऱ्यांचा १९ डिसेंबरपासून बेमुदत कामबंद आंदोलनाचा इशारा

    December 17, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.