चाळीसगांव/प्रतिनिधी
ब्राम्हणशेवगे येथे सेवा सहयोग फाऊंडेशनचे गुणवंंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून व सामाजिक कार्यकर्ते सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून व लोकसहभागातून शिवरस्ता तयार करण्यात येत आहे.
ब्राम्हणशेवगे व शेवरी शिवाराला जोडणारा दोन ते अडीच किमीचा निसर्ग टेकडी कडे जाणारा शिवरस्ता आहे.या पैकी एक किमी रस्ता हा सन 2013-14 साली एम.आर.जी.एस.मधून खडीकरण झालेला आहे.परंतु उर्वरित रस्त्याची अतिशय। दयनिय अवस्था आहे. म्हसोबा जवळ असलेल्या नाल्याजवळ पावसाळ्यात तर पुर्णपणे बिकट परिस्थितीत होत असते.आपल्या शेतातील माल ने आण करणे तर दुरच पायीही जाता येता येत नाही.शंभर फुट परिसरात अक्षरशः दलदल निर्माण होऊन दोन फुटापर्यत चिखल असतो.
या रस्त्याचे काम व्हावे यासाठी ग्रामस्थांनी सोमनाथ माळी यांचे नेतृत्वाखाली निसर्ग टेकडी वर उपोषणही केले होते. लेखी अश्वासनानंतरही या रस्त्याचे काम न झाल्यामुळें शेतकऱ्याचे हाल थांबवावेत यासाठी सेवा सहयोग फाऊंडेशनच्या मदतीने गुणवंतदादा सोनवणे यांचे संकल्पनेतून सोमनाथ माळी यांचे प्रयत्नातून या रस्त्यावरील शेतकरी बांधवांनी लोकसहभाग करून दगड टाकून घेत आपले काम आपणच करायचे या भावनेतून काम करुन घेत आहेत.यासाठी नानासाहेब राठोड, ज्ञानेश्वर राठोड, मदन राठोड,नानाभाऊ राठोड,धर्मा पाटील, गोकुळ चव्हाण, दादा राठोड,विष्णू राठोड,आप्पा चव्हाण,कमलेश राठोड व शिवारातील शेतकरी प्रयत्नशिल आहेत.