‘क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी !’ चित्रा वाघ यांचा सवाल

0
2

मुंबई : प्रतिनिधी

राज्य सरकारने चंद्रपूरची दारूबंदी (liquor-ban-lifting) उठवली आहे. त्यावरून राज्य सरकारवर टीका होत असतानाच आता भाजपच्या नेत्या चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील (Jayant Patil) यांच्यावर टीकास्त्र सोडले. यासोबतच वाघ यांनी पाटील यांचा जुना व्हिडीओ पोस्ट केला आहे. यवतमाळमधील दारूबंदीचं काय झालं? क्या हुआ तेरा वादा…जयंतरावजी ! असा खोचक सवाल चित्रा वाघ यांनी पाटील यांना केला आहे. वाघ यांनी ट्विट करून जयंत पाटील यांना त्यांच्या आश्वासनाची आठवण करून दिली आहे. सोबत त्यांनी विधानसभेतील जयंत पाटलांच्या भाषणाचा व्हिडीओही पोस्ट केला आहे.

क्या हुवा तेरा वादा… जयंतरावजी! सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटला यवतमाळमध्ये दारूबंदी करणार…..इस आश्वासन का, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. यवतमाळ राहिले दूर. चंद्रपूरची दारूबंदी उठवली तुमच्या सरकारने. महिलांना कमी समजू नका. अजूनही आमच्या भावनांशी असंच खेळत राहिलात तर तुम्हाला घरी बसून चूल फुंकायची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here