Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»रानभाजी ; कटूले चक्क ३२० रुपये किलो !
    जळगाव

    रानभाजी ; कटूले चक्क ३२० रुपये किलो !

    SaimatBy SaimatJuly 26, 2022No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत लाईव्ह जळगाव प्रतिनिधी

    बदलती जीवनशैली आणि जंकफूडच्या आहारी गेलेल्या लोकांमध्ये पौष्टिक पदार्थ खाण्याचे प्रमाण अतिशय कमी झाले आहे. हिरव्या भाज्या नेहमीच आरोग्यासाठी गुणकारी असतात. त्यांचे  नियमित सेवन केल्याने त्या आपल्याला अनेक आजारांपासून दूर ठेवते. हिरव्या भाज्यांमध्ये काही भाज्या कमी वेळेत अधिक परिणामकारक ठरतात. काटवल ही शरीरावर वेगाने परिणाम करणारी भाजी आहे. कटूले सर्वांत  ताकदवान भाजी मानले जाते. ही भाजी अनेकदा औषध स्वरूपातही वापरली जाते.

    शहरांमध्ये पावसाळ्यात रानभाज्या विकायला येतात. याच काळात शेतशिवारात काटवल ही वेलवर्गीय फळभाजी येते. ती भाजी फक्त पावसाळ्यात खायला मिळत असल्यामुळे त्या भाजीला खूप लोकांची पसंती असते. काटवलाचा बाजारभाव आता वाढला आहे. ८० ते ९० रुपये पाव, म्हणजेच ३२० रुपये किलो या किमतीत कटुल्याची (spiny gourds) विक्री होते. किंमत ऐकून धक्का बसेल एवढ्या दरात कटूले विकले जात आहेत.

    पूर्वीपासून पावसाळ्यात कटूले हे फळभाजी म्हणून खाण्याची परंपरा आहे. ते चविष्ट नसले तरी अनेक आजारांवर लाभदायक आहे. या फळाची भाजी खाल्ल्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. पूर्वी या फळभाजीला जास्त मागणी नव्हती. पण आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर आता नागरिकांची ओढ नैसर्गिक वनस्पती आणि भाज्यांकडे वाढला आहे.

    डोकेदुखीत काटवलाच्या पानांचा रस, मिरे, रक्तचंदन आणि नारळाचा रस एकत्र करून चोळतात. ही भाजी पोट साफ होण्यासाठी उपयुक्त आहे. मधुमेहाच्या रुग्णांनी या भाजीचे नियमित सेवन केल्यास रक्तातील साखर कमी करण्यास मदत होते.  त्याचबरोबर लघवीतील शर्करा नियंत्रित होते. मात्र काटवलाचे दर वाढल्याने ते  घ्यावे की  नाही, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Savda : सावदा सहकारी दुध संस्थेत विदेशी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा

    March 26, 2026

    Bhusawal : सुनसगावातील कुत्र्यांच्या हल्ल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

    March 26, 2026

    Kerosene Distribution : गॅसटंचाईवर उपाय! राज्य सरकारकडून घरगुती ग्राहकांसाठी रॉकेल वाटप सुरू

    March 26, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.