Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»जलसमृध्दी: अभोरा, मंगरुळ सुकी अन्‌ बोरी धरण शंभर टक्के भरले
    कृषी

    जलसमृध्दी: अभोरा, मंगरुळ सुकी अन्‌ बोरी धरण शंभर टक्के भरले

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 31, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    गिरणा धरणातही ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा

    साईमत/जळगाव/विशेष प्रतिनिधी :

    गेल्या महिन्याभरात सर्वत्र दमदार पाऊस झाल्याने जिल्ह्यातील मोठे आणि मध्यम सिंचन प्रकल्पात लक्षणिय पाणीसाठा झाला आहे. विशेषत: मध्यम प्रकल्पांपैकी बोरी, सुकी, मंगरुळ आणि अभोरा या धरणात शंभर टक्के पाणीसाठा झाला आहे. तसेच जिल्ह्याच्या निम्मे भागाची तहान भागविणाऱ्या गिरणा धरणात ९२ टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्याने काही प्रमाणात गिरणा नदीही प्रवाहीत झाली आहे.

    यंदाच्या पावसाळ्यात जून, जुलै आणि ऑगस्ट या तीन महिन्यांमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यात आतापर्यंतच्या एकूण सरासरीपैकी ९५ टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील धरणे, पाझर तलाव पाण्याने भरले आहेत. हतनूर धरणात पाण्याची आवक कायम असून बुधवारपर्यंत धरणाचे आठ दरवाजे पूर्णपणे खुले केले होते तर आज शुक्रवारी चार दरवाजांमधून पाण्याचा विसर्ग सुरु होता. त्यामुळे तापी नदी वाहत आहे. वाघूर धरणाच्या पाणी पातळीत लक्षणीय वाढ झाली असून धरण ८२.७५ टक्के पाण्याने भरले आहे.

    म्हसवे, भोकर बारी अन्‌ अंजनी धरणात साठा कमीच

    अंजनी, भोकर बारी आणि म्हसवे धरणात अपेक्षित जलसाठा झालेला नाही. अंजनी धरण आतापर्यंत २७ टक्केच भरले आहे. त्यामुळे गिरणा नदीतून वाहून जाणारे पाणी जामदा डाव्या कालव्याद्वारे अंजनी, भोकरबारी आणि म्हसवे धरणात सोडले जात आहे. यंदा बहुळा धरणात अपेक्षित पाणीसाठी झालेला नाही. फक्त ७.५६ टक्केच पाणीसाठा झालेला आहे.

    मोठे सिंचन प्रकल्प आणि त्यातील पाणीसाठी (दशलक्ष घनमीटरमध्ये)
    हतनूर – ८१.००, गिरणा-४८३.४०, वाघूर-२०५.६८

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Jalgaon:जळगाव प्रभाग ७ मध्ये भटक्या कुत्र्यांची वाढती भीती, नगरसेविकांची महापौरांकडे तातडीची मागणी

    March 2, 2026

    Jalgaon:महापालिकेत नवीन जेसीबी व अग्निशमन वाहनांचा समावेश

    March 2, 2026

    Amalner:शेतकरी गौरवासाठी अमळनेरमध्ये उभा होणार अजित पवारांचा पुतळा

    March 2, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.