Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचा वापर करा
    कृषी

    प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक कागदी पिशव्यांचा वापर करा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 12, 2024No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क/चाळीसगाव :

    प्लास्टिक बॅग्समध्ये असलेल्या रसायनांमुळे विविध प्रकारच्या आरोग्य समस्या उद्भवू शकतात. अशा रसायनांचा दीर्घकाळ संपर्क आल्यास कर्करोग, हार्मोनल विकार आणि इतर गंभीर आजार होण्याचा धोका वाढतो. यासाठी प्लास्टिकऐवजी पर्यावरणपूरक आणि स्वस्त अशा कागदी पिशव्यांचा वापर करण्याचे आवाहन उपप्राचार्य प्रा. डी.एल.वसईकर यांनी केले.

    येथील बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स महाविद्यालयात ४८ एनसीसी महाराष्ट्र बटालियन, धुळेच्या आदेशानुसार महाविद्यालयाचा एनसीसी विभागामार्फत आयोजित ‘पेपर बॅग्स डे’ कार्यक्रमानिमित्त ते बोलत होते. प्लास्टिक बॅग्सच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्यविषयक धोक्यांविषयी त्यांनी सखोल माहिती दिली. कागदी पिशव्या नैसर्गिकरित्या विघटनशील असल्याने त्यांचा पर्यावरणावर कोणताही दुष्परिणाम होत नसल्याचेही त्यांनी सांगितले.

    कागदी पिशव्या वापरचा केला संकल्प

    कार्यक्रमात विद्यार्थ्यांसह उपस्थित नागरिक, व्यापारी यांनी प्लास्टिक बॅग्स टाळण्याचा आणि कागदी बॅग्सचा अधिकाधिक वापर करण्याचा संकल्प केला.
    बी. पी. आर्ट्स, एस. एम. ए. सायन्स आणि के. के. सी. कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी विविध प्रकल्प आणि प्रदर्शनांच्या माध्यमातून कागदी पिशव्यांच्या वापराचे महत्त्व स्पष्ट केले. पर्यावरणपूरक उपाययोजनांची माहिती देताना, आपल्या लहानशा बदलाने भविष्यातील पिढ्यांसाठी एक स्वच्छ आणि सुरक्षित पर्यावरण देण्यास मदत होईल, असे सांगून कागदी पिशव्यांच्या वापरावर भर दिला.

    याप्रसंगी एन.सी.सी.विभागाचे प्रमुख मेजर डॉ. राजेश चंदनशिव, डॉ. पी.एस. नन्नवरे, प्रा. पंकज वाघमारे, डॉ. एस. वाय. पवार, एनसीसीचे सर्व विद्यार्थी, नागरिक, व्यापारी उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Chalisgaon : गिरणा नदीत बुडून ४५ वर्षीय प्रौढाचा दुर्दैवी अंत

    February 4, 2026

    Jalgaon : फुले कृषी महोत्सव 2026 : केळीच्या ८० वाणांचे थेट प्रात्यक्षिक

    February 3, 2026

    Chalisgaon : भोरस फाट्याजवळ पिकअप वाहनाला दुचाकीची धडक

    January 9, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.