District Collector : धुळ्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते गौरव

0
5

संघर्षयात्रींमध्ये आणीबाणीत कारावास भोगलेल्यांचा समावेश

साईमत/धुळे/प्रतिनिधी :

देशात आणीबाणी लागू झालेल्या घटनेस आज ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त आणीबाणीत कारावास भोगलेल्या धुळ्यातील संघर्षयात्रींचा जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांच्या हस्ते जिल्हा प्रशासनाच्यावतीने सन्मानपत्रासह गुलाबपुष्प देऊन सत्कार केला. हा कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात बुधवारी, २५ जून रोजी सकाळी झाला. जिल्हाधिकारी श्रीमती विसपुते यांच्यासह अपर जिल्हाधिकारी सुभाष बोरकर, उपजिल्हाधिकारी महादेव खेडकर, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके, नायब तहसीलदार श्रीकांत देसले, यांच्यासह आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्ती, त्यांचे कुटूंबिय आणि वारस उपस्थित होते. जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वाक्षरीचे गौरवपत्र, गुलाबपुष्प देवून कारावास भोगलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला. यानिमित्त जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून भरविण्यात आलेल्या प्रदर्शनाची पाहणी जिल्हाधिकाऱ्यांसह मान्यवरांनी केली. यावेळी मदनलाल मिश्रा, रवींद्र बेलपाठक आदींनी मनोगत व्यक्त केले. तसेच शासनस्तरावर त्यांच्या संघर्षांची दखल घेवून सन्मान केल्याबाबत त्यांनी राज्य शासनाचे आभार मानले.

प्रास्ताविकात उपजिल्हाधिकारी श्री. खेडकर यांनी देशात आणीबाणी लागू झाल्याच्या घटनेस आज ५० वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त जिल्हा प्रशासनातर्फे आणीबाणीत कारावास भोगलेल्या व्यक्तींसह त्यांच्या वारसांचा सत्कार करण्यात येत आहे. यावेळी केंद्र शासनामार्फत आणीबाणीवर आधारित चित्रफित दाखविण्यात आली. याठिकाणी जिल्हा माहिती कार्यालयाच्या माध्यमातून देशात १९७५ ते १९७७ मध्ये लावलेल्या आणीबाणीतील घडामोडींवर आधारित सचित्र प्रदर्शन भरविण्यात आले. हे प्रदर्शन गुरुवारपासून माहिती व जनसंपर्क भवन, जिल्हाधिकारी कार्यालय आवार, धुळे येथे नागरिकांना बघण्यासाठी उपलब्ध असणार आहे. प्रदर्शनाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी केले आहे.

जिल्हा माहिती कार्यालयामार्फत भरविण्यात आलेल्या प्रदर्शनास सन्मानार्थ्यांनी भेट देवून प्रदर्शनाबाबत कौतुक केले. यशस्वीतेसाठी जिल्हा माहिती कार्यालयातील संदीप गावित, बंडू चौरे, चैतन्य मोरे, इस्माईल मनियार, ऋषिकेश येवले यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

जिल्हाधिकाऱ्यांची संवेदनशीलता

आजच्या सत्कार सोहळ्यास अनेक वयोवृद्ध व्यक्ती उपस्थित होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी जागेवर जाऊन त्यांचा सन्मान केला. सुत्रसंचालन जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी जितेंद्र सोनवणे तर आभार जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांनी मानले.

सन्मानार्थींमध्ये यांचा होता समावेश

सन्मानार्थींमध्ये मदनलाल जमनालाल मिश्रा, भीमसिंग रायसिंग राजपूत, माधव जनार्दन बापट, मधुसूदन उर्फे विजय शांताराम पाच्छापुरकर, यादवराव शामराव पाटील (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक कुलकर्णी, गोपालदास जमनालाल मिश्रा (प्रतिनिधी), हरसिंग गोरखसिंग जमादार (गिरासे), शशिकांत रनाळकर (प्रतिनिधी), रवींद्र बेलपाठक, रेणुका बेलपाठक, शेखर वसंत चंद्रात्रे (प्रतिनिधी), भास्कर बापट, प्रभाकर भावसार, डॉ.भुपेंद्र शहा, शीला सत्यानारायण अग्रवाल, मंजुळा श्रीपत पाटील, मालती नवनीतलाल शाह, पुष्पा सुभाष शर्मा, प्रवीण कृष्णदास शहा, श्रीराम पुरुषोत्तम कुलकर्णी, शशिकला सोमनाथ जोशी (प्रतिनिधी), प्रकाश त्र्यंबक मराठे, शशीकला देविदास शार्दुल, रवींद्र वामन सोनवणे, भिकुबाई शामराव मराठे, डोंगर कन्हैया बागुल, शकुंतला जुगलकिशोर अग्रवाल यांचा जिल्हाधिकारी विसपुते यांच्या हस्ते सन्मानपत्रासह गुलाबपुष्प देवून सन्मान करण्यात आला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here