Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राजकीय»मोदी सरकारच्या कामगिरीमुळे शरद पवारांचेही मतपरिवर्तन होईल – चंद्रशेखर बावनकुळेंंचा दावा
    राजकीय

    मोदी सरकारच्या कामगिरीमुळे शरद पवारांचेही मतपरिवर्तन होईल – चंद्रशेखर बावनकुळेंंचा दावा

    saimatBy saimatAugust 25, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    अमरावती :

    गेल्या नऊ वर्षांच्या भाजपा सरकारच्या कार्यकाळात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील कामगिरी पाहता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांचेही लवकरच मतपरिवर्तन होईल आणि ते खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह मोदींच्या नेतृत्वाला मदत करतील, असा दावा भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी येथे पत्रकारांशी बोलताना केला.

    बावनमुळे म्हणाले की, एकनाथ शिंदे यांनी हिंदुत्वाचा विचार घेऊन भाजपाला पाठिंबा दिला आहे. अजित पवार यांनीदेखील नरेद्र मोदी यांच्या नेतृत्वाचे समर्थन करून २१ व्या शतकातील समर्थ भारत निर्माण करण्याची क्षमता केवळ मोदींमध्येच आहे, असे स्पष्ट केले आहे.

    अनेक राजकीय पक्षातील नेते मोदींच्या नेतृत्वावर विश्वास प्रकट करीत आहेत. त्यामुळे शरद पवार यांचेही मतपरिवर्तन होणार आहे.

    इंडिया टुडे आणि सी-व्होटरने केलेल्या निवडणूकपूर्व सर्वेक्षणासंदर्भात विचारलेल्या प्रश्नावर बावनकुळे म्हणाले, या सर्वेक्षणात महाराष्ट्रात राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला आणि शिवसेनेच्या उद्धव ठाकरे गटाला लोकसभा निवडणुकीत १८ जागा मिळतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असला, तरी तो खोटा आहे. शरद पवार मोठे नेते आहेत, त्यांच्याविषयी मी बोलू इच्छित नाही. राष्ट्रवादीच्या केवळ ५ जागा आहेत,त्या १८ कशा होतील, त्यांच्याकडे तेवढे उमेदवार आहेत का, हेही माहिती नाही. कुठले सर्वेक्षण ग्राह्य धरायचे, याचाही विचार करावा लागेल.आम्ही जनतेत जाऊन सर्वेक्षण करतो. महायुतीला ४५ पेक्षा जास्त जागा मिळतील, असे बावनकुळे यांनी सांगितले.बावनकुळे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, संजय राऊत यांच्यावरही टीका केली.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    saimat

    Related Posts

    आसाममध्ये सुखोई-३० एमकेआय विमान कोसळले; नागपूरचे सुपुत्र फ्लाइट लेफ्टनंट पूर्वेश दुरगकर वीरमरण पावले

    March 6, 2026

    Devendra fadnavis : 78,215 मेगावॅट वीज निर्माणासाठी जलविद्युत प्रकल्पाला ग्रीन सिग्नल

    March 5, 2026

    VidhanBhavan : विधानभवनात आमदारांमध्ये शाब्दिक चकमक; भास्कर जाधव आणि सचिन कल्याणशेट्टी भिडले

    March 4, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.