संत सेना महाराजांचे विचार अन्‌ शिकवण समाजाला दिशादर्शक : पालकमंत्री गुलाबराव पाटील

0
51

पाळधीत संत सेना महाराज पुण्यतिथी साजरी

साईमत/पाळधी, ता.धरणगाव/प्रतिनिधी :

संत सेना महाराजांनी आपल्या जीवनात भक्तीला सर्वोच्च स्थान दिले आहे. त्यांच्या अभंगातून त्यांनी भक्तिरसाची उपासना केली. सेना महाराजांचे विचार आणि शिकवण आजही आपल्याला दिशादर्शक आहे. त्यांच्या विचार व शिकवणीतून आपल्याला जीवनात शांती, समाधान आणि आनंद मिळण्याचा मार्ग सापडतो, असे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. ते पाळधीत आयोजित कार्यक्रमाप्रसंगी बोलत होते. अध्यक्षस्थानी अ.भा.जीवा सेनाचे प्रदेशाध्यक्ष देविदास फुलपगार होते. सुरुवातीला संत शिरोमणी सेना महाराज पुण्यतिथी निमित्त श्री सत्यनारायण पूजन व संत सेना महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी पाळधी बु.चे लोकनियुक्त सरपंच विजय पाटील, पाळधी खुर्दचे सरपंचपती शरद कोळी, उद्योजक दिलीप पाटील, चांदसरचे माजी सरपंच सचिन पवार, सेवानिवृत्त पी.एस.आय. नारायण सोनवणे, नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे, रवींद्र बोरणारे, कुमार श्रीरामे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता झाली.

यशस्वीतेसाठी पाळधी येथील सलून दुकानदार संघटना, अखिल भारतीय जिवा सेनाचे पदाधिकारी तसेच समाज बांधवांनी परिश्रम घेतले. प्रास्ताविक गोपाल सोनवणे, सूत्रसंचालन गणेश फुलपगार तर आभार संदीप फुलपगार यांनी मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here