Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»जळगाव»राज्यासह खान्देशात पावसाचे ‌‘कम बॅक‌’
    जळगाव

    राज्यासह खान्देशात पावसाचे ‌‘कम बॅक‌’

    SaimatBy SaimatSeptember 7, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत, जळगाव : प्रतिनिधी

    अनेक दिवसांच्या प्रतिक्षेनंतर राज्यात पावसाचे कमबॅक झाले आहे. हवामान खात्याने राज्यात पावसाचा अंदाज वर्तविला होता. त्यानुसार गेल्या दोन दिवसापासून राज्यभरात पाऊस सुरू झाला आहे. खान्देशातील जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात देखील पावसाने हजेरी लावली आहे. यामुळे खरीप हंगामातील पिकांना जीवनदान मिळणार आहे.
    देशात मान्सूनवर यंदा अल निनोचा प्रभाव दिसून आला. यामुळे यावर्षी जून आणि ऑगस्ट महिन्यात समाधानकारक पाऊस झाला नाही. जुलै महिन्यात चांगला पाऊस झाला. ऑगस्ट महिन्यात पावसाचा मोठा खंड पडला. सप्टेंबर महिन्यात चांगल्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. कृष्ण जन्माष्टमीला राज्यात पाऊस सुरु झाला आहे. दरम्यान, पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा पट्टा हळू हळू वायव्येकडे सरकत आहे. राज्यातील मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‌‘यलो अलर्ट‌’ देण्यात आला आहे. मराठवाड्यातील औरंगाबाद, बीड उस्मानाबाद, लातूर, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे. संपूर्ण विदर्भासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार, धुळे, जळगाव जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला आहे. यामुळे खरिपाच्या पिकांना दिलासा मिळाला. आगामी दोन दिवस जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे.

    नंदुरबारात नाचले शेतकरी कुटूंब
    नंदुरबार ः नंदुरबार जिल्ह्यातही तब्बल २७ दिवसानंतर पावसाने हजेरी लावली आहे. पावसाच्या आगमनानंतर एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात नाचून आनंद व्यक्त केला आहे. नंदुरबार जिल्ह्यात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे शेतकरी चिंतेत होता. कारण खरीपाची पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली होती. पिकांसाठी पाण्याची मोठी गरज होती. त्यामुळे शेतकरी चांगल्या पावसाच्या प्रतिक्षेत होते. अखेर पावसाने हजेरी लावल्यामुळे बळीराजा आनंदी झाला आहे. पावसासाठी शेतकऱ्यांकडून देवाकडे साकडे घालण्यात आलं होतं. यातच गुरूवारी पावसाने जोरदार हजेरी लावल्यामुळे एका शेतकरी कुटुंबाने ढोल ताशांच्या गजरात नाचून आपला आनंद व्यक्त केला आहे. हा आनंद साजरा करण्याऱ्या शेतकरी कुटुंबाचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Parola : शहरातील थकीतदारांविरोधात नगरपरिषदेची धडक कारवाई

    March 13, 2026

    Varangaon:वरणगावात वृद्धावर लोखंडी रॉडने धोकादायक हल्ला

    March 13, 2026

    चिंचखेडे बु शाळेत सांस्कृतिक रंगत; इतिहास आणि देशभक्तीने भारलेले गुणदर्शन कार्यक्रम

    March 13, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.