Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»राष्ट्रीय»प्रकाश राज यांनी उडवली चांद्रयान मोहिमेची खिल्ली
    राष्ट्रीय

    प्रकाश राज यांनी उडवली चांद्रयान मोहिमेची खिल्ली

    Milind KolheBy Milind KolheAugust 21, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    पाटणा ः

    अभिनेते प्रकाश राज यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीत जेवढं नाव कमावलं आहे तेवढंच नाव त्यांनी हिंदी सिनेसृष्टीतही कमावलं आहे. सिंघम मधल्या जयकांत शिक्रेमुळे तर ते घराघरात पोहचले. त्यांच्या नकारात्मक भूमिका विशेष गाजल्या आहेत. त्यांच्या भूमिका जशा चर्चेत असतात तसेच त्यांचे ट्विट्सही चर्चेत असतात. चांद्रयान ३ च्या लँडिंगपूर्वी प्रकाश राज यांनी इस्रोचे माजी प्रमुख के सिवन यांची खिल्ली उडवली आहे. त्यामुळे नेटकरी त्यांच्यावर चांगलेच संतापले आहेत.

    भारताची चांद्रयान मोहीम यशस्वी व्हावी म्हणून देशभरातले खगोलप्रेमी हे आस लावून बसले आहेत तसेच अनेक लोकांकडून प्रार्थनाही केली जाते आहे.अशात प्रकाश राज यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरुन इस्रोचे माजी प्रमुख के सिवन हे चहा ओतत असल्याचे व्यंगचित्र शेअर केले आहे. विक्रम लँडरकडून पहिला फोटो वॉव असे म्हणत त्यांनी या मोहिमेची खिल्ली उडवली आहे. ज्यानंतर त्यांच्यावर चांगलीच टीका होते आहे.

    अभिनेते प्रकाश राज यांना त्यांच्या ट्विटसाठी प्रचंड ट्रोल केले जात आहे. नेटकऱ्यांनी प्रकाश राज यांच्यावर शेलक्या शब्दात टीका केली आहे. राम नावाच्या एका युजरने इस्रो गौरवशाली भारताचे प्रतिनिधित्व करते.तुटपुंजे संसाधने आणि निराशावादी वातावरण असतानाही अनेक मोठी कामगिरी करून दाखवली आहे. काही मोजक्याच देशांनी साध्य केले ते इस्त्रोने मिळवून दाखवले आहे. आता जगातील काही मोजक्या संस्थांमध्ये इस्रोचाही समावेश होतो. हा माणूस भारतातील सर्वात वाईट गोष्टींचे प्रतिनिधित्व करतो.ज्या राष्ट्राने त्याला खूप काही दिले त्या राष्ट्राचा तिरस्कार करतो,असे म्हटले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Milind Kolhe

    Related Posts

    ‘Jain Irrigation’ Company From Jalgaon : जळगावातील ‘जैन इरिगेशन’ कंपनी निर्यातीबद्दल राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित

    September 9, 2025

    ‘mock drills’ : सर्व राज्यांत ‘मॉक ड्रिल’ घ्या, गृहमंत्रालयाचे निर्देश

    May 5, 2025

    Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील याचिका फेटाळली ; दुहेरी नागरिकत्त्वाच्या आरोपाबाबत दिलासा

    May 5, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.