साईमत, पहुर, ता.जामनेर : वार्ताहर
पंतप्रधान नरेंद्र मोदी, राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांच्या आदेशानुसार तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे ग्रामविकास व पर्यटन मंत्री गिरीष महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या जळगाव पूर्व जिल्हा चिटणीसपदी नांद्रा प्र.लो.चे कांतीलाल दौलत पाटील यांची नुकतीच निवड करण्यात आली. या निवडीत गावातील काही नागरिकांनाही पदे देण्यात आली.
भाजपाचे संघटन वाढवून पक्षाला बळकट करायचे काम तळागाळातील शेतकऱ्यांपर्यंत जाऊन शेतकऱ्यांच्या समस्या आपल्या नेत्यामार्फत किंवा सरकारच्यावतीने सोडवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचे काम मनापासून करणार असल्याचे मत कांतीलाल पाटील यांनी निवडीवेळी व्यक्त केले.
त्यांच्या निवडीबद्दल मंत्री गिरीष महाजन, प्रदेश महामंत्री विजय चौधरी, किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष गणेश भेगडे, खा.रक्षा खडसे, प्रदेश मंत्री सुरेश धनके, किसान मोर्चाचे जळगाव पूर्व जिल्हाध्यक्ष नारायण चौधरी, प्रदेश सदस्य नितीन राणे, भाजपाचे जिल्हाध्यक्ष अमोल जावळे यांच्यासह भाजपाच्या पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांनी कौतुक केले आहे.