Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा शासन आपली दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार
    कृषी

    शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा शासन आपली दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार

    SaimatBy SaimatJuly 31, 2023No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्या अन्यथा शासन आपली दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत मुक्ताईनगर प्रतिनिधी

    मुक्ताईनगर (Muktainagar) सह जिल्ह्यात पूरग्रस्त शेतकऱ्यांना आठवडा उलटूनही सानुग्रह अनुदान मिळाले नसल्यामुळे शेतकऱ्यांना तात्काळ मदत न मिळाल्यास शासन आपले दारी कार्यक्रमात घुसून जाब विचारणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष मा. खासदार राजू शेट्टी यांनी शिंदे सरकारला दिला. मुक्ताईनगर सह जिल्ह्यात ढगफुटी,पुरामुळे शेतकऱ्यांची पूर्णता वाहतात झालेली असून शेतकऱ्यांच्या विहिरी खचल्या आहे, शेती वाहून गेलेली आहे पिकं पूर्णतः उध्वस्त झालेली आहे तसेच नदीपात्रालगत गावातही पुरामुळे मुक्ताईनगर सह जिल्ह्यातील हजारो शेतकरी बेघर झालेले असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी अधिवेशनात सानुग्रह अनुदान तात्काळ देण्याची घोषणा केली परंतु आठवडा उलटूनही शेतकऱ्यांना अद्याप पर्यंत कोणतीही मदत मिळाली नाही, त्यामुळे शिंदे सरकार हे फक्त घोषणा सरकार आहे की काय असा प्रश्न राजू शेट्टी यांनी उपस्थित केला.

    तसेच जिल्ह्यामध्ये मागील तीन वर्षांपासून शेतकऱ्यांचे पीक विम्याचे पैसे प्रलंबित आहे, तसेच केळी उत्पादक शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी घोषणा करूनही सीएमव्ही चे पैसे अजूनही मिळालेले नाहीत मधुकर सहकारी साखर कारखान्यामध्ये शेवटच्या गाळाप हंगामातील ऊस पुरवठा करणाऱ्या हजारो शेतकऱ्यांना त्यांच्या उसाचा मोबदला तसेच बिनव्याजी मुदत ठेवी चार वर्षापासून मिळालेली नाही, तसेच जळगाव जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्या हा चिंतेचा विषय असून शासन शेतकऱ्यांच्या बाबतीत फार गंभीर असल्याचे दिसून येत नसून सत्ताधाऱ्यांना फोडाफोडीच्या राजकारणातच जास्त रस असून विरोधकांनाही कोणत्या प्रश्नांवर सरकारशी भांडायचे याचे भान राहिले नसल्यामुळे शेतकऱ्यांचे प्रश्न तीन मंत्री असलेल्या जिल्ह्यात प्रलंबितच आहे.

    असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी (Raju Shetty) यांनी जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पत्रकार परिषदेत सरकारवर टीकास्त्र सोडले तसेच शेतकऱ्यांच्या यासह अनेक विविध प्रलंबित मागण्या तात्काळ पूर्ण न केल्यास शासन आपल्या दारी कार्यक्रमात घुसून सरकारला जाब विचारण्याचा इशारा स्वाभिमानीचे संस्थापक अध्यक्ष राजू शेट्टी यांनी सरकारला दिला यावेळी काँग्रेसचे ओबीसी सेलचे उपाध्यक्ष डॉ. जगदीश पाटील, बहुजन मुक्ती पार्टीचे राज्य संघटक प्रमोद सौंदळे, जिल्हा समन्वयक प्रमोद पोहेकर, पत्रकार अमोल वैद्य, एडवोकेट तुषार पटेल, पत्रकार हेमंत पाटिल, पंडित पाटिल, रामलाल पाटिल, सुरेश पाटिल, मनोज पाटिल, मयूर पाटिल, किरण पाटिल, समाधान पाटिल, जगदीश पाटील आदी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Muktainagar : मुक्ताईनगरात मानवाधिकार दिन साजरा

    December 13, 2025

    Muktainagar : जळगावमध्ये पशूवैद्यकीय महाविद्यालय सुरू करा

    December 12, 2025

    Muktainagar : मुक्ताईनगरमध्ये पीएम आवास योजनेंतर्गत अनियमिततेची चर्चा

    December 11, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.