Farmers In Karanwadi Got Rohit करणवाडीतील शेतकऱ्यांना शिवसेना उबाठाच्या आंदोलनाच्या धास्तीने बदलवून मिळाले रोहित्र

0
5

शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांनी मानले आभार

साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

शेतकऱ्यांच्या शेतात विहिरीत पाणी उपलब्ध असतांना डीपी अर्थात रोहित्रावरील ट्रान्सफॉर्मर ६३ केव्हीचा असल्याने दाब म्हणजेच लोड कमी-जास्त होऊन वारंवार वीज पुरवठा झाल्याने जळगाव जामोद तालुक्यातील करणवाडीतील तायडे डीपी परिसरातील शेतातील उभी पिके डोळ्यासमोर सुकून जात होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी यासंदर्भात शिवसेना उबाठाचे शहरप्रमुख गजानन ठोसर यांना माहिती दिली होती. शिवसेना उबाठाने दिलेल्या आंदोलन इशाऱ्याच्या धास्तीने शेतकऱ्यांना डीपी बदलवून मिळाली आहे. याबद्दल परिसरातील शेतकऱ्यांनी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

तायडे डीपीवरील सर्व शेतकऱ्यांना घेवून शिवसेना शहरप्रमुख गजानन ठोसर, उपशहरप्रमुख बाळू पोलाखरे, कामगार सेना शहरप्रमुख हरीदास गणबास, किसान सेना शहरप्रमुख सै.वसीम, वाहतूक सेना शहरप्रमुख इम्रान लकी आदी पदाधिकाऱ्यांनी कार्यकारी अभियंता राजेश मिश्रा, आर.जी.तायडे यांना आठ दिवसात ६३ चा ट्रान्सफॉर्मर बदलवून १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर न दिल्यास शिवसेना स्टाईलने आंदोलनाचा इशारा दिला होता.

डीपीवर १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविला

शिवसेनेच्या आंदोलनाच्या धास्तीने शनिवारी, ३१ मे रोजी पिंपळगाव सबस्टेशन अंतर्गत करणवाडी येथील तायडे डीपीवर १०० केव्हीचा ट्रान्सफार्मर बसविण्यात आला. डीपीवरील प्रमोद वाघमारे, रमेश बोदडे, सुनील ससाने, वामन तितुर, अवी खिरोडकर, रमेश तितुर, अंबादास देवगुंदे, पुंडलिक धनके, परमेश्वर वाघमारे, समाधान वाघमारे, रामकृष्ण तितुर, सुनील तायडे, रामकृष्ण झाल्टे, शिवा खिरोडकर, पांडुरंग खिरोडकर, शिवा घुळे, ज्योतीराम देवगुंडे, गजानन खिरोडकर, नामदेव खिरोडकर, गणेश कवळे,महादेव कोथदकर, शिवा पाटील यांच्यासह शेतकऱ्यांनी शिवसेना उबाठाच्या पदाधिकाऱ्यांचे आभार मानले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here