Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»धुळे»स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात कुटुंबभेट अभियान
    धुळे

    स्वच्छ भारत मिशनअंतर्गत जिल्ह्यात कुटुंबभेट अभियान

    SaimatBy SaimatSeptember 12, 2023No Comments1 Min Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत : धुळे : प्रतिनिधी

    स्‍वच्‍छ भारत मिशन ग्रामीण टप्‍पा-२ अंतर्गत केंद्र व राज्‍य शासनातर्फे देशभर शाश्‍वत स्‍वच्‍छतेसाठी गावे हागणदारीमुक्‍त अधिक मॉडेल केली जात आहेत.जी गावे मॉडेल झाली आहेत अशा गावांमध्ये १ ते ३० सप्टेंबर २०२३ या कालावधीत दृश्यमान स्वच्छतेसाठी कुटुंबभेटी अभियान राबविण्यात येत आहे.

    स्वच्छ भारत मिशन ग्रामीण टप्पा दोनअंतर्गत हागणदारीमुक्त अधिक जिल्ह्यासाठी व शाश्वत स्वच्छतेसाठी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अश्विनी पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी शुभम गुप्ता, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष देवेंद्र पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक बाळासाहेब बोटे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.
    त्याचाच एक भाग म्हणून ३१ ऑगस्ट २०२३ पर्यंत जिल्ह्यातील हागणदारी मुक्त अधिक (मॉडेल) झालेल्या गावांमधून हे अभियान राबविण्‍यात येत आहे. ग्रामपंचायत स्तरावरील सर्व शासकीय कर्मचारी, ग्रामसेवक, अंगणवाडीसेविका, आशावर्कर, जलसुरक्षक, ग्रामरोजगार सेवक, सीआरसी यांच्यामार्फत भेटी देण्यात येत आहेत.गृहभेटीदरम्यान कुटुंबांना विचारण्याची प्रश्नावली तयार करण्‍यात आली आहे.

    यामध्‍ये वैयक्तिक व सार्वजनिक शौचालय, सांडपाणी व घनकचरा व्‍यवस्‍थापन, प्लॅस्टिक व्‍यवस्‍थापन, मैला गाळ व्‍यवस्‍थापन, पाणी स्‍वच्‍छता समिती आदी विषयांबाबत ५० प्रश्‍न विचारले आहेत.याची पडताळणी कुटुंबभेटी अभियानातून करावयाची आहे. हे अभियान प्रभावीपणे राबवावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुप्ता, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पवार यांनी केले आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Saimat

    Related Posts

    Taloda:क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त तळोदा महाविद्यालयात अभिवादन

    January 3, 2026

    Navapur:“नवापूर नगराध्यक्षांचे दालन नागरिकांसाठी सदैव खुले; नवापूरमध्ये लोकशाही संवादाला नवे बळ”

    January 3, 2026

    Dhule:भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण फुंकणार रविवारी प्रचाराचे रणशिंग

    January 3, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.