Agricultural Cell : कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना

0
11

कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्षाची स्थापना

जळगाव (प्रतिनिधी)-

खरीप हंगामामध्ये शेतकऱ्यांना बियाणे, खते आणि कीटकनाशकांची उपलब्धता व गुणवत्तेबाबत येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी जिल्हा परिषदेने कृषी निविष्ठा तक्रार निवारण कक्ष स्थापन केला आहे.

या कक्षात शेतकऱ्यांच्या तक्रारींची नोंदणी करून त्यांच्या समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला जाईल. शेतकऱ्यांना त्यांच्या गावातील कृषीविषयक समस्यांसाठी संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधणे सुलभ होणार आहे.
तालुका कृषी अधिकारी, विस्तार अधिकारी (कृषी), सहाय्यक कृषी अधिकाऱ्यांची नावे, पद आणि संपर्क क्रमांक देण्यात आले आहेत. जळगाव जिल्हा परिषदेत विजय पवार (मोहीम अधिकारी- ९४२३४८२२७४), राहुल महाजन (कृषी अधिकारी- ९६०४८४९४४४) आणि अभिमान माळी (जिल्हा कृषी अधिकारी (सा.)- ९४२२२३५८१३) हे अधिकारी कार्यरत आहेत.

जिल्ह्यातील प्रत्येक पंचायत समिती स्तरावर कृषी अधिकाऱ्यांची आणि विस्तार अधिकाऱ्यांची नावे व संपर्क क्रमांक उपलब्ध करून देण्यात आले आहेत. जळगाव, भुसावळ, यावल, रावेर, मुक्ताईनगर, बोदवड, पाचोरा, भडगाव, चाळीसगाव, जामनेर, अमळनेर, चोपडा, पारोळा, एरंडोल आणि धरणगाव येथील पंचायत समित्यांमध्ये कार्यरत अधिकाऱ्यांची संपर्क व माहिती या यादीत आहे.

शेतकऱ्यांना विविध योजनांची माहिती मिळवणे, कृषी मार्गदर्शन घेणे, पिकांवरील रोग व किडींच्या नियंत्रणासाठी सल्ला मिळवणे शक्य होणार आहे. हा तक्रार निवारण कक्ष खरीप हंगामासाठी १५ मे ते १५ ऑगस्ट आणि रब्बी हंगामासाठी १५ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर या कालावधीत सकाळी १० ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत कार्यरत राहणार आहे. संपर्क यादी जिल्हा परिषद कार्यालय आणि संबंधित पंचायत समिती कार्यालयात उपलब्ध आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here