नुकसानग्रस्त भागाचे तात्काळ पंचनामे करा – अनिल चौधरी

0
52

साईमत रावेर प्रतिनिधी

यावल तालुक्यासह जिल्हाभरात बेमोसमी हवामानामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने बळीराजा अडचणीत आला असून  वादळी – वाऱ्यामुळे शेतकऱ्यांचे झालेल्या नुकसानाचे तात्काळ पंचनामे कोणत्याही जाचक – अटी न घालता पंचनामे करावे अशा सूचना प्रहार पक्षाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी स्थानीक प्रशासनाला केल्या आहेत.

रावेर शहरात अतिशय जुनी व मोठी झाडे थेट घरावर कोसळल्याने घरे तुटून उध्वस्त झाली आहे. यामध्ये सुदैवाने कुठलीही जिवंत हानी झालेली नसली, तरी घर – संसार उघडल्यावर आले आहे. नुकसान ग्रस्त परिवाराला आधार म्हणुन शासनाकडून तात्काळ मदत देण्यात यावी. सर्वाधिक नुकसान केळी उत्पादक क्षेत्र असलेल्या रावेर – यावल तालुक्यातील खिरोदा, रसलपुर, मंगरूळ, पिंपरी, अहिरवाडी येथे बसला असून  केळी पिके भुईसपाट झाली आहे. यामध्ये शेतकऱ्यांना कोट्यवधी रुपयाचा फटका बसला आहे.

याबाबत शेतकऱ्यांचे नेते प्रहार पक्ष प्रमूख आ. बच्चु कडू यांच्याकडे शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानीची माहिती देण्यात आली असल्याचे प्रहार उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष अनिल चौधरी यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पाठपुरावा करून तात्काळ मदत जाहीर न करता थेट अर्थ सहाय्य करावे अशी मागणी करण्यात येणार आहे. यापूर्वी झालेल्या नुकसानाची भरपाई अद्याप पर्यंत शासनाकडून शेतकऱ्यांना मिळालेले नाही. यासोबतच शासनाने दिलेल्या पीक विम्याचे पैसे देखील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले नसल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. आसमानी व सुलतानी संकटामुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना कोणत्याही कागदपत्रां शिवाय जाचक अटीमध्ये न अडकवता थेट पंचनामे करण्यात यावे अशी मागणी अनिल चौधरी यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here