Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»‘Severely Drought-Affected’ : जळगाव जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ जाहीर करा : महाविकास आघाडीची मागणी
    कृषी

    ‘Severely Drought-Affected’ : जळगाव जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ जाहीर करा : महाविकास आघाडीची मागणी

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoOctober 11, 2025No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शासन निकष न लावता तातडीने मदत जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकु देणार नसल्याचा इशारा

    साईमत/जळगाव/प्रतिनिधी : 

    महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक, पशुधन आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने अशा गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत केवळ निकष लावून मदत देण्याचे नाटक सुरू केले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तीव्र दखल घेत संपूर्ण जळगाव जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकु देणार नाही, असा तीव्र इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास भेट देऊन “संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त जाहीर करावा” अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले.

    अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. मात्र शासनाने निकषांचा अडथळा निर्माण करून मदतीपासून शेतकऱ्यांना वंचित ठेवण्याचे काम सुरू केले आहे. हे शेतकऱ्यांच्या दु:खावर मीठ चोळण्यासारखे आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व १५ तालुक्यांना ओला दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ आर्थिक मदत द्यावी, असेही मविआच्या नेत्यांनी म्हटले आहे.

    निवेदन देतेवेळी शिवसेना उबाठाचे उपनेते गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस एसपी गटाचे निरीक्षक भास्कर काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, रा.काँ.चे जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र पाटील, महानगरप्रमुख शरद तायडे, महानगराध्यक्ष एजाज मलिक, विकास पवार, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, जगतराव पाटील, ॲड. सचिन पाटील, भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, प्रशांत सुरळकर, मजहर पठाण, रमेश पाटील, विश्वनाथ पाटील, वाय. एस. महाजन, लक्ष्मण पाटील, भिका पाटील, संजय पाटील, एन. डी. पाटील, राजेंद्र पाटील, विश्वजित पाटील आदींसह अनेक पदाधिकारी उपस्थित होते. उपस्थित नेत्यांनी जर शासनाने लवकरात लवकर निर्णय घेतला नाही तर मंत्र्यांना जळगाव जिल्ह्यात फिरू देणार नाही, असा जिल्हाधिकाऱ्यांना इशारा दिला आहे.

    शेतकऱ्यांमध्ये संतापाचा उद्रेक

    नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे खरीप हंगामातील कपाशी, सोयाबीन, मका, भात यांसह इतर पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. बहुतांश ठिकाणी जनावरांचे मृत्यू, शेतकऱ्यांच्या घरांचे पडझडही झाली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. त्यामुळे शासनाने तातडीने मदतीचा निर्णय घ्यावा, अशी मागणी होत आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Muktainagar : प्रसादेश्वर शिवमंदिरातील चोरीप्रकरणी पोलिस निष्काळजीपणाने ग्रामस्थांमध्ये रोष

    February 1, 2026

    Jalgaon : जळगावमध्ये दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

    February 1, 2026

    Yaval : पाच महिलांच्या मंगळसूत्रांवर चोरट्याचा डल्ला अट्रावल यात्रेत गर्दीचा गैरफायदा

    February 1, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.