Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»बोहर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान
    कृषी

    बोहर्डी शिवारातील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे नुकसान

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoJuly 7, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    साईमत/ न्यूज नेटवर्क/वरणगाव :

    भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ सार्वजनिक बांधकाम विभागाने चुकीच्या पद्धतीने पूल बांधल्याने येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे पावसाच्या पाण्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, बोहर्डीचे सरपंच विशाल सोनवणे यांनी पूल बांधतांना पाईपांच्या पुलाप्रमाणे तिरपा बांधा, असे सांगितले होते. परंतु, याकडे ठेकेदाराने दुर्लक्ष केले आहे.

    सार्वजनिक बांधकाम विभागाने खिरोदा – वाकोद राज्य मार्ग क्रमांक ४६ वर भुसावळ तालुक्यातील बोहर्डी गावाजवळ उन्हाळ्यात पुलाचे बांधकाम केले आहे. मात्र, हा पूल पूर्वी असलेल्या नाल्याच्या प्रवाहाच्या वेगळ्या पद्धतीने बांधला आहे. नाल्याचे पाणी थेट तीन ते चार शेतकऱ्यांच्या शेतामध्ये नाल्याचे पाणी जात असल्याने पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. तसेच पूल बांधताना एका शेतकऱ्याच्या शेतात ठेकेदाराने बांधकामांचे मटेरियल टाकून व रस्ता बनवून त्याचे नुकसान केले आहे.

    नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये पसरला असंतोष

    वेळोवेळी शेतकऱ्यांनी सांगूनही पुलाला उंच संरक्षक भिंत बांधण्यात आलेली नसल्याने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला आहे . पूल बांधकामावेळी ठेकेदार १५ फुट उंच संरक्षक भिंत बांधून देणार असल्याचे सांगितले होते. मात्र, शेतकऱ्यांचे आठ महिने शेत वापरूनही त्याचा काहीही मोबदला मिळाला नाही . याउलट शेतकऱ्यांच्या शेतात नाल्याचे पाणी जाऊन पिकांचे नुकसान होत आहे.

    शेतकऱ्यांच्या निवेदनाकडे दुर्लक्ष

    संबंधित शेतकऱ्यांनी जिल्हाधिकारी, पाटबंधारे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग व वरिष्ठांपर्यत निवेदन देऊनही अद्यापपर्यंत त्यांना न्याय मिळाला नाही. त्यामुळे दिनेश सपकाळ, मोहनसिंग पाटील, निलेश पाटील आदी शेतकऱ्यांनी संबंधित विभागाने याबाबत त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी केली आहे.अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिला आहे.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    ‘Sudden Drinking Water Reservation’ : जिल्ह्यातील ३७१ गावांना ‘आकस्मित पिण्याचे पाणी आरक्षण’ मंजूर

    December 6, 2025

    Government Extends : ज्वारी–मका खरेदी नोंदणीस शासनाची मुदतवाढ

    December 1, 2025

    Agricultural produce market ; यावल कृषी उत्पन्न बाजार समितीने केळी व्यापाऱ्यांना दिल्या दप्तर तपासणीच्या नोटीस

    November 12, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.