Close Menu
Saimat Live
    Facebook X (Twitter) Instagram
    Saimat Live
    Button
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर
    Saimat Live
    Home»कृषी»पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा
    कृषी

    पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करा

    Sharad BhaleraoBy Sharad BhaleraoAugust 3, 2024No Comments2 Mins Read
    Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    शेतकरी नेते रवीकांत तुपकर यांनी दिला आंदोलनाचा इशारा

    साईमत/मलकापूर/प्रतिनिधी :

    पिकविमा, नुकसान भरपाई, कर्जमुक्ती, फसवणूक करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई व शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी शेतकरी नेते रविकांत तुपकर यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी, ३ ऑगस्ट रोजी शेतकऱ्यांनी मलकापूर उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. तातडीने शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने पिकविमा, नुकसान भरपाईची रक्कम जमा न केल्यास व शेतकऱ्यांच्या फसवणूक करणाऱ्या व्यापारी डॉ.प्रफुल्ल पाटील यांच्यावर कारवाई न झाल्यास राज्यव्यापी आक्रमक आंदोलन करण्याचा इशारा रवीकांत तुपकर यांनी दिला आहे.

    मलकापूर परिसरात डॉ.प्रफुल्ल पाटील नामक व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांची मोठी फसवणूक केली आहे. हा व्यापारी शेतकऱ्यांच्या मेहनतीचा सोयाबीन-कापूस पैसे न देता खरेदी करून फरार झाला आहे. या व्यापाऱ्याने जवळपास ९० कोटीपेक्षा रकमेचा शेतकऱ्यांना गंडा घातला आहे. या व्यापाऱ्यांची संपत्ती विकून शेतकऱ्यांची संपूर्ण वसूल करून द्यावी, अशी आक्रमक भूमिका रवीकांत तुपकरांनी घेतली आहे.

    शेतकऱ्यांनी घेतली आक्रमक भूमिका

    शेतकऱ्यांना गेल्यावर्षीचा १०० टक्के पिकविमा मिळावा. तसेच नुकसान भरपाई मिळावी, जंगली जनावरांपासून पिकांचे संरक्षण होण्यासाठी शेतीला कंपाऊंड मिळावे, वन्यप्राण्यांनी शेतपिकांच्या केलेल्या नुकसानीची दावे तातडीने निकाली काढून शेतकऱ्यांना भरीव नुकसान भरपाई मिळावी, गेल्यावर्षीचा सोयाबीन-कापसाला प्रति क्विंटल तीन हजार रुपये भाव फरक तातडीने मिळावा, तातडीने शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, अशा मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी आक्रमक भूमिका घेतली. यावेळी उपविभागीय अधिकारी संतोष शिंदे, तहसीलदार राहुल तायडे व मलकापूर शहरचे ठाणेदार गिरी यांच्याशी चर्चा करून निवेदन देण्यात आले.

    मोर्चात यांनी घेतला सहभाग

    मोर्चात दामोदर शर्मा, अमोल राऊत, गजानन भोपळे, सचिन शिंगोटे, निलेश नारखेडे, रणजित डोसे, दत्ता पाटील, भागवत धोरण, विजय बोराडे, उमेश राजपूत, समाधान भातुरकर, राहुल मोरखेडे, विवेक पाटील, ललित डव्हले, यांच्यासह कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी सहभाग घेतला होता.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Email
    Sharad Bhalerao

    Related Posts

    Malkapur : अभियंत्यांच्या आशीर्वादाने निकृष्ट कामे?

    December 20, 2025

    Malkapur : राष्ट्रीय विद्यालय पिंप्रीगवळीत कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर

    December 20, 2025

    Malkapur : शालेय राज्यस्तरीय चॉकबॉल स्पर्धेत यशोधाम पब्लिक स्कूलच्या

    December 16, 2025
    Leave A Reply Cancel Reply

    © 2025 Saimat Live. Designed by ContentOcean Infotech..
    • Home
    • क्राईम
    • जळगाव
      • अमळनेर
      • एरंडोल
      • कासोदा
      • चाळीसगाव
      • चोपडा
      • धरणगाव
      • जामनेर
      • धानोरा
      • पारोळा
      • फैजपूर
      • पाचोरा
      • मुक्ताईनगर
      • भुसावळ
      • बोदवड
      • यावल
      • रावेर
      • वरणगाव
      • शेंदुर्णी
    • राजकीय
    • राज्य
    • राष्ट्रीय
    • शैक्षणिक
    • ई -पेपर

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.