साईमत लाईव्ह सोयगाव तालुका प्रतिनिधी
सोयगाव तालुक्यात अतिवृष्टीच्या नोंदीची प्रतीक्षा न करता सप्टेंबर महिन्यात झालेल्या पिकांची नुकसानीची माहिती संकलित करून तातडीने त्या नुकसानीचे पंचनामा करा असे निर्देश जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी सोयगावला दिले आहे यामुळे सोयगाव तालुक्यात सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीची चिंता आता मिटली असून तालुका प्रशासनाकडून नुकसानीची पंचनामाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत सोयगाव तालुक्यात सप्टेंबर महिन्यात चारही मंडळात सतत पावसाची नोंद झाली असून जरंडी मंडळात वादळी वाऱ्यात कपाशी बाजरी ज्वारी मका आडवे झाले होते परंतु शासन निकषानुसार अतिवृष्टीच्या नोंद न झाल्याने तालुका प्रशासनाने नुकसानाची पंचनामे आती घेतले नव्हते परंतु आता जिल्हाधिकारी औरंगाबाद यांनी अतिवृष्टीच्या नोंदीची प्रतीक्षा न करता सततच्या पावसाने झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करण्याबाबत थेट निर्देश दिले असून आता तालुका कृषी आणि महसूल विभाग नुकसानीची आकडेवारी संकलित करण्याच्या कामात गुंतणार आहेत कृषी आणि महसूल विभागात पंचनामांच्या हालचाली सुरू झाल्या आहेत जरंडी मंडळातील 13 गावांना वादळी वाऱ्याचा तडाका बसला असताना कृषी आणि महसूल कर्मचाऱ्यांनी केवळ नुकसानीची पाहणी करून शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली होती.
आता मात्र या नुकसानीची प्रत्यक्षात पंचनामे करावे लागणार असून अतिवृष्टीच्या नोंद व झालेल्या भागात पिकांच्या नुकसानीची तीव्रता 33% जास्त असल्याचा निकष सोयगाव तालुक्यासाठी ग्राह्य धरण्यात येऊन या निकषानुसार पंचनामे हत्ती घेण्याची निर्देश देण्यात आले आहे या निर्णयामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून तालुका प्रशासनाने कृषी महसूल आणि पंचायत समिती या त्रिसदस्यीय समितीच्या पथकांना गाव स्तरावर जाऊन थेट पंचनामे करण्याबाबत आदेश दिले आहेत.