चाळीसगाव तालुक्याला कोरडा दुष्काळ जाहीर करावा

0
23

साईमत, चाळीसगाव : प्रतिनिधी

पावसाळा सुरू होऊन तीन महिने पूर्ण झाले आहेत. पावसाने दडी मारली आहे. त्यामुळे चाळीसगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे कपाशी, ज्वारी, बाजरी, मका, तूरडाळ आदी पीक वाया गेले आहे. महसूल प्रशासनाने शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून लवकरात लवकर चाळीसगाव तालुक्याला कोरडा दुष्काळ जाहीर करावा, अशा आशयाचे निवेदन मनसेतर्फे तहसिलदारांना देण्यात आले आहे.

निवेदन देतेवेळी मनसेचे तालुकाध्यक्ष भालचंद्र पाटील यांच्यासह जिल्हा संघटक भाईदास बोरसे, तालुका संघटक श्याम पाटील, उत्तम काळे, पप्पु निकम, आदेश पवार, चिंचगव्हाण शाखाध्यक्ष राहुल राठोड , गणेश राठोड, हर्षल शेरे, दिलीप राठोड, ईश्वर राठोड, गोपाल राठोड, रतीलाल राठोड, राज राठोड, पवन राठोड, कल्पेश सुतार यांच्यासह मनसेचे कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here