साईमत, धुळे । प्रतिनिधी राज्यातील बोगस रासायनिक खते, बी-बियाण्यांच्या प्रकरणाची ईडी, सीबीआय चौकशी करावी, नाडले गेलेल्या शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी भारत राष्ट्र समितीचे जिल्हा समन्वयक ईश्वर पाटील यांनी केली. दरम्यान, तेलंगणातील केसीआर सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीप्रमाणे भविष्यात महाराष्ट्रात पक्षाचे सरकार आल्यास राज्यातील शेतकऱ्यांनाही संपूर्ण कर्जमाफी देऊ, अशी आश्वासक भूमिकाही त्यांनी पत्रकार परिषदेत मांडली. भारत राष्ट्र समितीतर्फे पत्रकार भवनात पत्रकार परिषद झाली. यावेळी समितीचे जिल्हा समन्वयक पाटील, अशोक कद्रे, नाना पाटील, संदीप पवार, सुनीता गोपाळ उपस्थित होते. ईश्वर पाटील म्हणाले की, मोठ्या प्रमाणावर बोगस रासायनिक खते व बी-बियाण्यांची विक्री सुरू आहे. मात्र, शासकीय यंत्रणा सुप्तावस्थेत आहेत. शासकीय अधिकाऱ्यांनी अशा कंपन्यांकडून…
Author: Sharad Bhalerao
साईमत, धुळे । प्रतिनिधी तालुक्यातील बोरकुंड परिसरातील बोरी नदीवर चार कोटींतून तीन साखळी बंधारे बांधण्यात आले. तिन्ही बंधाऱ्यांचे जलपूजन करण्यात आले. बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे यांच्या प्रयत्नातून बंधारे आकारास आले आहेत. बंधाऱ्यांचे जलपूजन जिल्हा परिषद सदस्या शालिनी भदाणे यांच्या हस्ते झाले. महिला पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. बोरी बारमाही करणाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या दिशेने हे पुढचे पाऊल असल्याने समाधान व्यक्त झाले. बोरी बारमाही करण्यासाठी बोरकुंडचे प्रथम लोकनियुक्त सरपंच बाळासाहेब भदाणे व सदस्या शालिनी भदाणे यांचे अविरत प्रयत्न आहेत. यासाठी त्यांच्याजवळ महत्त्वाकांक्षी ॲक्शन प्लान आहे. ठिकठिकाणी होणाऱ्या साठवण बंधाऱ्यांमुळे बोरीचे बारमाहीचे स्वप्न साकारताना दिसत आहे. मांडळपासून ते बोरकुंड-रतनपुरा- दोंदवाड गावादरम्यान…
साईमत, दोंडाईचा । प्रतिनिधी शहरातील सर्वच परिसरात नळांना सारख्याच दाबाचा पाणीपुरवठा व्हावा, यासाठी नवीन फिल्टर पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे. आता त्याद्वारे १३ हजार घरांना मोफत अत्याधुनिक नळ कनेक्शन मिळणार आहे. त्याची सुरवात माजी मंत्री आमदार जयकुमार रावल यांच्या हस्ते झाली. यावेळी दोंडाईचा-वरवाडे नगर पालिकेचे मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, माजी आरोग्य सभापती कल्पना नगराळे, भाजप शहराध्यक्ष प्रवीण महाजन, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, रवी उपाध्ये, नगरसेवक विजय मराठे, रवींद्र उपाध्ये, खलील बागवान, कृष्णा नगराळे, जितेंद्र गिरासे, निखिल जाधव, छोटू मराठे, जितू गिरासे, नरेंद्र गिरासे, नरेंद्र कोळी, भरत ठाकूर, चिरंजीवी चौधरी, ईश्वर धनगर, कांतिलाल मोहिते, रघुनाथ बैसाणे, देवा पाटील, राजू धनगर, संदीप धनगर,…
साईमत, धुळे । प्रतिनिधी महानगरपालिकेला विविध कामांसाठी कामगार पुरविणाऱ्या ‘आस्था’ संस्थेच्या आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी महापौर प्रतिभा चौधरी यांनी केलेल्या तक्रारीवर आता विभागीय आयुक्त कार्यालयाने याप्रकरणी आवश्यक कार्यवाही/चौकशी करावी, असे पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे. त्यामुळे आता या प्रकरणाकडे लक्ष लागून आहे. महापौरांची तक्रार अशी, धुळे महानगरपालिका हद्दीतील नागरिकांना आरोग्य, पाणीपुरवठा तसेच इतर कामासाठी मनुष्यबळ (कामगार) पुरविण्याचे काम ‘आस्था’ स्वयंरोजगार संस्थेला २०१९ मध्ये देण्यात आले. त्यानुसार एकूण २६३ कर्मचाऱ्यांचा मोबदला मनपातर्फे आस्था संस्थेला वेळोवेळी देण्यात आला. दरम्यान, नागरिकांच्या सोयी-सुविधांसाठी शासनाकडून प्राप्त निधीचा योग्य वापर होत आहे अथवा कसे याबाबत महापौर श्रीमती चौधरी यांनी चौकशी केली. प्रशासनाशी पत्रव्यवहार केला. कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यात…
साईमत, धुळे । प्रतिनिधी गोवर रुबेला आजाराच्या उच्चाटनासाठी केंद्र सरकारने विशेष मिशन इंद्रधनुष्य ५.० कार्यक्रम राबविण्याचे निश्चित केले आहे. तीन फेऱ्यात होणाऱ्या मोहिमेचा सोमवारी, ७ ऑगस्ट रोजी प्रारंभ झाला आहे. मोहिमेत लसीकरणापासून वंचित व अर्धवट लसीकरण झालेल्या बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. धुळे महानगरपालिका क्षेत्राचा विचार करता तब्बल एक हजार ४७१ लाभार्थी लसीकरणापासून वंचित अथवा त्यांचे अर्धवट लसीकरण असल्याचे समोर आले आहे. त्यातील बहुतांश लाभार्थी अल्पसंख्याक भागातील असल्याचे सांगितले जाते. या लाभार्थ्यांचे लसीकरण करून घेण्याचे आव्हान महानगरपालिकेच्या यंत्रणेपुढे आहे. शून्य ते पाच वर्षे वयोगटाच्या बालकांसह गर्भवती मातांचे विविध आजारांपासून संरक्षण व्हावे यासाठी त्यांना विविध लशी दिल्या जातात. खासगी तसेच शासकीय…
साईमत, नवापूर, प्रतिनिधी तालुक्यातील खांडबारा गावातील आठवडे बाजारात चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून दहशत कायम आहे. त्यामुळे चोरटे आठवडे बाजारात पोलिसांना खुले आव्हान देत असल्याचे दिसून येत आहे. खांडबारा येथे आठवडे बाजारात चोरीच्या घटनांना आळा घालण्यात स्थानिक पोलीस अपयशी ठरल्यामुळे चोरटे सक्रिय झाले आहेत. वारंवार आठवडे बाजारात चोऱ्यांच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कधी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र तर कधी चेन चोरट्यांकडून लंपास केले जात आहे. मागील काही महिन्यांपासून मोबाईल चोरटे तसेच काही महिलाही चोरी करत असल्याचे समोर आले आहे. तसेच नवापूर शहरात मोटरसायकल चोरीचे सत्र सुरु आहे. शहरातील विविध भागात मोटरसायकल चोरीला गेल्या आहेत. खांडबारा येथील पटेल किराणा दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये एका चोरट्याने…
साईमत, धुळे, प्रतिनिधी पती-पत्नीच्या किरकोळ वादाचे रूपांतर होऊन पतीकडून पत्नीची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीला अटक केली आहे. ही घटना धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यातील मोहिदा येथे घडली. नंदा पावरा व बाळू पावरा हे दांपत्य याठिकाणी वास्तव्यास आहे. आपल्या शेतातील घरात हे दाम्पत्य रहायचे. या दोघांमध्ये रात्री वाद झाला. या वादावेळी पती बाळू याने दारुच्या नशेत पत्नी नंदा हिच्या डोक्यात लाकडी दांडके मारले. यावेळी जबर मारहाण झाल्याने पत्नी नंदा (वय ३०) हिचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. कोतवाल म्हणून काम करत असलेला मारेकरी पती…
साईमत, धुळे, प्रतिनिधी महानगरपालिकेचा प्रमुख आर्थिक स्त्रोत असलेल्या मालमत्ता कर व पाणीपट्टीपोटी धुळे महानगरपालिकेला यावर्षी तब्बल १२८ कोटी रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. महानगरपालिकेच्या उत्पन्नाचा हा आकडा सुखावणारा असला तरी चालू मागणी अर्थात दरवर्षी मिळू शकणारे उत्पन्न ३६.६९ कोटी रुपये आहे. अर्थात सध्या दिसत असलेल्या १२८ कोटी रुपयांच्या उत्पन्नात थकबाकीचे प्रमाण तब्बल ९१ कोटी रुपये आहे. वर्षाकाठी यातून काही कोटी रुपये वसुली होते. उर्वरित आकडा पुन्हा थकबाकीत जातो. त्यामुळे महानगरपालिकेपुढे खरी समस्या थकबाकी वसुलीचीच आहे. विशेषतः ‘ड’ वर्ग महानगरपालिकांचा प्रमुख आर्थिक स्त्रोत मालमत्ता कर, पाणीपट्टी यावरच अवलंबून आहे. इतर विविध कामे केंद्र, राज्य शासनाच्या योजनांमधून होतात. अर्थात यात महानगरपालिकेलाही थोडाफार हिस्सा…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी चोपडा आणि अमळनेर येथील कोळी लोकांना एसटीचे दाखले मिळाले पाहिजेत, यासाठी बुधवारी, ९ ऑगस्ट रोजी आदिवासी व क्रांती दिवस असल्याने त्याचदिवशी सकाळी ११ वाजेपासून चोपडा येथील प्रांत व तहसील कार्यालयासमोर आदिवासी कोळी जमातीतर्फे शांतता कायदा व सुव्यवस्था राखुन तीव्र अन्नत्याग सत्याग्रह, धरणे आंदोलन, ठिय्या आंदोलन, रास्तारोको आंदोलन, लाक्षणिक उपोषण करण्यात येऊन शालेय विद्यार्थ्यांचा मोर्चाही काढण्यात येणार आहे. याप्रसंगी तालुक्यातील शेकडों विद्यार्थी, महिला मंडळ, वयोवृद्ध मंडळी तसेच जिल्ह्यातील आदिवासी कोळी समाज संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते सहभागी होणार आहेत. अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकारी, जळगाव जिल्हा पोलीस अधिकारी तसेच प्रांताधिकारी, तहसीलदार, चोपडा पोलीस अधिकारी यांना देण्यात आले आहे. अमळनेर आणि…
साईमत, चोपडा : प्रतिनिधी दिवंगत कविवर्य ना.धों.महानोर यांना श्रद्धांजलीपर ‘आभाळाचं दान अर्थात पाऊसगान’ या पावसाच्या संकलित कवितांचा कार्यक्रम विवेकानंद विद्यालयात आयोजित केला होता. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून विलास पाटील, खेडीभोकरीकर (सेवानिवृत्त मुख्याध्यापक, जय श्री दादाजी हायस्कूल, तांदळवाडी) उपस्थित होते. सुरुवातीला कवी महानोरांच्या रेखाचित्राचे पूजन करण्यात येऊन त्यांचा जीवन परिचय उपशिक्षिका माधुरी हळपे यांनी केला. यावेळी रानकवी स्व.ना. धों.महानोर यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर विद्यालयातील विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात पावसाच्या संकलित कविता आणि काही विद्यार्थ्यांनी स्वरचित कवितांचे अतिशय सुंदर गायन व अभिवाचन सादर केले. कविता सादर करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये प्रांजल सानप, नक्षत्रा सोनवणे, आर्यदीप पाटील, मनाली पाटील, जान्हवी चौधरी, प्रियंका भोई, आरोही पाटील,…