३० हजार सिंधी बांधवांकडून सेवा, विविध संतांचे भजन-कीर्तनाने धार्मिक वातावरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : अखंड पाठ साहेब आणि अखंड रामायण वाचनाचे भोग साहेब (समाप्ती) कार्यक्रम वर्सी महोत्सवाच्या तिसऱ्या दिवशी रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी यशस्वीपणे पार पडला. यासाठी देशभरातून भाविक आले होते तर शहरातील संपूर्ण सिंधी बांधवांनी तीर्थप्रसादाचा लाभ घेतला. सुमारे ३० हजार बांधवांनी व्यवसाय बंद करून सेवा केली, त्यात पुरुषांसह महिलांसाठी स्वतंत्र भोजनाची व्यवस्था केली होती. संपूर्ण परिसरात धार्मिक वातावरण निर्माण झाले होते. आलेल्या भाविकांनी अतिशय आनंद व्यक्त केला. पूज्य सेवा मंडळाची नवीन वास्तू पाहून आनंदात भर पडली. कार्यक्रमाला मंत्री गिरीष महाजन, जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा भवरलाल जैन यांचे सुपुत्र…
Author: Sharad Bhalerao
जामनेरातील चैतन्य धामात कन्या पूजनात ३५० कन्यांचा सन्मान साईमत/जामनेर/प्रतिनिधी : मुलींनी दुर्बल न राहता सबल बनावे. स्वतःचे रक्षण स्वतः करावे. आजच्या काळात मुलींनी ‘पराटे’ सोबत ‘कराटे’ आणि ‘बाटी’ सोबत ‘लाठी’ शिकणे आवश्यक असल्याचे प्रभावी मार्गदर्शन प.पू.श्याम चैतन्य महाराज यांनी केले. हिंदू संस्कृतीत नारी पूजनाला विशेष महत्त्व आहे. नवरात्रीत अष्टमीला कन्या पूजन कार्यक्रम पारंपरिक स्वरूपात आयोजित केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर, रविवारी, १२ ऑक्टोबर रोजी गुरुदेव सेवाश्रम येथील चैतन्य धाम येथे परिसरातील ३५० कन्यांचा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमात कन्यांचे पाय स्वच्छ करून पुसून, पूजन केले गेले. त्यानंतर भोजन व दक्षिणा देण्यात आली. यावेळी अनेक कन्या आणि महिलांनी…
आरोग्य संजीवनी वेलनेस सेंटरच्या उपक्रमाला महिलांचा प्रतिसाद साईमत/जळगाव/प्रतिसाद : चुकीच्या जीवनशैलीमुळे वाढलेले वजन कमी करणे आणि शरीर-मन तंदुरुस्त ठेवणे या उद्देशाने आरोग्य संजीवनी वेलनेस सेंटरतर्फे सोनी नगरात मोफत योगा वर्गाचे उद्घाटन रविवारी सकाळी ६.३० वाजता केले. कार्यक्रमात जागतिक आरोग्य सल्लागार आदिनाथ खेडकर यांनी उपस्थितांना योगाचे महत्त्व समजावून सांगितले. योगामुळे लवचिकता वाढते, ताण कमी होतो, झोप सुधारते आणि एकाग्रता वाढते. नियमित योग केल्याने शारीरिक तंदुरुस्ती, भावनिक संतुलन आणि मानसिक स्पष्टता येते. त्यामुळे एकंदरीत आरोग्य सुधारते, असे जागतिक आरोग्य सल्लागार रेणुका खेडकर यांनी महिलांना प्रशिक्षण देतांना सांगितले.योगा वर्गाचे उद्घाटन होताच पहिल्याच दिवशी ३० महिलांनी सहभाग घेतला. हा वर्ग पहाटे ५.३० ते ६.३०…
आयुक्तांच्या हस्ते ‘आनंद नगरी’ कार्यक्रमाने सप्ताहाचा समारोप साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महानगरपालिका आणि राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानातंर्गंत संत गाडगे महाराज शिक्षण सांस्कृतिक क्रीडा मंडळ संचलित संत गाडगेबाबा शहरी बेघर निवारा केंद्रात १ ते १० ऑक्टोबर २०२५ दरम्यान जागतिक बेघर दिन सप्ताह विविध उपक्रमांद्वारे उत्साहात साजरा करण्यात आला. उपक्रमाचे मार्गदर्शन मनपाचे आयुक्त ज्ञानेश्वर ढेरे, अतिरिक्त उपायुक्त निर्मला गायकवाड, उपायुक्त धनश्री शिंदे, उपायुक्त पंकज गोसावी, शहराध्ययन व्यवस्थापक गायत्री पाटील तसेच मंडळाचे संचालक प्रशांत गायकवाड यांनी केले. सप्ताहात दररोज विविध उपक्रमांचे आयोजन केले होते. १ ऑक्टोबर रोजी ज्येष्ठ नागरिक दिन साजरा करण्यात आला. २ ऑक्टोबरला गांधी जयंती व लालबहादूर शास्त्री जयंती विशेष कार्यक्रमाने साजरी…
मेहरूण परिसरातील घटना ; जखमी भावावर जळगावात उपचार साईमत/जळगाव/प्रतिनिधी : “बहिणीला काही होऊ नये” अशा भावनेने क्षणाचाही विचार न करता आपल्या चुलत बहिणीचा जीव वाचविण्यासाठी जीवाची बाजी लावणाऱ्या अजय सोनवणे ह्या तरुणाने आपल्या दोन्ही हातांचा त्याग केला आहे. जळगाव शहरातील मेहरूण परिसरात घडलेली हृदयद्रावक घटना ऐकून परिसरातील नागरिक भावूक झाले आहेत. प्राप्त माहितीनुसार, गेल्या २१ सप्टेंबर रोजी अजय सोनवणे आपल्या कुटुंबासोबत घरात होता. त्याची केवळ सात वर्षांची चुलत बहीण घराच्या छतावर गोधडी सुकविण्यासाठी गेली होती. गोधडी टाकताना तिचा हातावरून जाणाऱ्या उच्चदाबाच्या विजेच्या तारांजवळ गेला. ही बाब लक्षात येताच अजयने क्षणाचाही विलंब न करता तिचा जीव वाचविण्यासाठी धाव घेतली. त्याने लोखंडी…
शासन निकष न लावता तातडीने मदत जाहीर करा, अन्यथा मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकु देणार नसल्याचा इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : महाराष्ट्रासह जळगाव जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे पिक, पशुधन आणि शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. शासनाने अशा गंभीर परिस्थितीकडे दुर्लक्ष करत केवळ निकष लावून मदत देण्याचे नाटक सुरू केले असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या झालेल्या नुकसानाची तीव्र दखल घेत संपूर्ण जळगाव जिल्हा ‘ओला दुष्काळग्रस्त’ घोषित करावा, अशी मागणी करण्यात आली. अन्यथा कोणत्याही मंत्र्यांना जिल्ह्यात फिरकु देणार नाही, असा तीव्र इशारा महाविकास आघाडीने दिला आहे. आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात १० ऑक्टोबर रोजी दुपारच्या सुमारास भेट देऊन “संपूर्ण जळगाव जिल्हा ओला दुष्काळग्रस्त…
व्यासपीठावर विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी सरळ परिचय, पालकांसाठी सुलभ संधी साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा चर्मकार विकास संघाच्यावतीने समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी तृतीय आंतर राज्यस्तरीय वधू-वर परिचय मेळावा आयोजित केला आहे. हा मेळावा रविवारी, २ नोव्हेंबर २०२५ रोजी सकाळी १० वाजता सरदार वल्लभभाई पटेल सभागृह (लेवा भवन) येथे होणार आहे. मेळाव्याचे प्रमुख पाहुणे म्हणून मंत्री ना.संजय सावकारे, खा.श्रीमती स्मिताताई वाघ, आ.राजुमामा भोळे, आ.प्रा. चंद्रकांत सोनवणे, माजी महापौर विष्णू भंगाळे उपस्थित राहतील. यावेळी विवाहेच्छुक उपवर-वधू, तसेच पालकांनी आपल्या पाल्यांचे रंगीत छायाचित्रांसह सविस्तर परिचयपत्र पाठविण्याची अंतिम मुदत बुधवारी, २० ऑक्टोबर आहे. मेळाव्यासाठी नियुक्त केलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये (कंसात मो.क्र.) प्रदेश सदस्य संजय वानखेडे (८६२५९६५२४१), राज्य संघटक डॉ. संजय…
२५ सहकाऱ्यांसमवेत ४०० सभासदांच्या उपस्थितीत ठराव मंजूर साईमत/जामनेर/प्रतिनिधी : जळगाव जिल्हा निवृत्त सेवा संघाच्या जामनेर शाखेचे तालुकाध्यक्ष पंढरीनाथ नारायण (पं.ना.) पाटील यांनी आजारपणासह वयामुळे आपल्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. संस्थेची दोन कोटींची वास्तू असून शिलकी रक्कम आहे. गेल्या ३१ ऑगस्ट रोजी झालेल्या कार्यकारिणीच्या त्रैमासिक सभेत मावळते अध्यक्ष पं.ना.पाटील यांनी वीस वर्षांपासून कार्यरत अध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन तो सभेत मंजूर करून घेतला. त्यामुळे त्यांच्या जागी प्रल्हाद भोजू (प्र.भो.) चौधरी यांचे अध्यक्षपदासाठी नाव घोषित करून ठराव मंजूर करून घेतला. ५ ऑक्टोबर रोजीच्या सर्वसाधारण वार्षिक सभेत पुणे म.पे.असोसिएशनच्या नाशिक विभागाचे जिल्हाध्यक्ष तथा उपाध्यक्ष सदाशिव नारायण सोनवणे यांची सभाध्यक्षपदी निवड केली. त्यांच्या २५ सहकाऱ्यांसमवेत…
लिटरसी, न्यूमरसीसह गणित, विज्ञान, संगणक विषयांवर विद्यार्थ्यांचे सादरीकरण साईमत/जळगाव/प्रतिनिधी : शहरातील प्रेमनगरातील ६ ते ८ ऑक्टोबर २०२५ कालावधीत ॲक्टिव्हिटी प्रेझेंटेशन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यात विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांसमोर उत्साहपूर्वक आणि आत्मविश्वासाने शैक्षणिक सादरीकरण केले. इयत्ता नर्सरी ते के.जी. वन गटातील विद्यार्थ्यांनी लिटरसी व न्यूमरसी विषयांवर सादरीकरण केले तर इयत्ता पहिली ते आठवीच्या गटातील विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञान आणि संगणक विषयांवर प्रेझेंटेशन सादर केले. अशा उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्षाच्या सुरुवातीपासून मिळवलेल्या ज्ञान आणि कौशल्यांचे प्रभावी प्रदर्शन पालकांसमोर केले. पालकांनी विद्यार्थ्यांसह शिक्षकांचे कौतुक करून त्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमाला शाळेचे मुख्याध्यापक मनोज शिरोळे उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांचे आणि शिक्षकांचे उत्तम कामगिरीबद्दल कौतुक केले. तसेच…
माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची नाशिकला बदली साईमत/जळगाव/प्रतिनिधी : जळगाव जिल्हाधिकारी पदावर नियुक्ती झालेल्या रोहन घुगे (भाप्रसे) यांनी गुरुवारी, ९ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी पदभार स्वीकारला. यापूर्वी ते जिल्हा परिषद ठाणे येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या नेतृत्वाखाली ठाणे जिल्हा परिषदेला डिजिटल प्रशासन, शिक्षण, आरोग्य व ग्रामीण विकास या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळाले आहे. ‘कार्यालयीन मूल्यमापन – १०० दिवसांचा कृती कार्यक्रम’ अंतर्गत राज्यात प्रथम क्रमांक प्राप्त झाला आहे. दरम्यान, माजी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची बदली नाशिक येथे झाली आहे. त्यांच्या जागी शासन आदेशान्वये रोहन घुगे यांची नियुक्ती केली आहे. पदभार स्वीकारताना अपर जिल्हाधिकारी श्रीमंत हारकर, निवासी उपजिल्हाधिकारी वैशाली चव्हाण…