Author: Sharad Bhalerao

एकात्मता, संस्कारासह समाजहिताचा संदेश देणारा ठरला मेळावा साईमत/जळगाव/प्रतिनिधी : चर्मकार विकास संघातर्फे राज्य व परराज्यातील वधू-वरांच्या प्रथम पसंतीचा तृतीय वधू-वर व पालक परिचय मेळावा जळगावातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्केटजवळील सरदार वल्लभभाई पटेल सभागृहात रविवारी, २ नोव्हेंबर रोजी उत्साहासह भावनिक वातावरणात पार पडला. मेळाव्यास समाजबांधवांचा अभूतपूर्व प्रतिसाद लाभला. मेळाव्यात ५३५ वधू-वरांनी परिचय करुन दिला. एकात्मता, संस्कारासह समाजहिताचा संदेश देणारा मेळावा भावनिक वातावरणात पार पडला. समाजातील सर्व थरातील बांधवांचा सहभाग पाहता, हा मेळावा चर्मकार समाजाच्या ऐक्य, प्रगती आणि नव्या दिशेचा सुंदर आरंभ ठरला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी संजय सावकारे होते. मेळाव्याला प्रमुख पाहुणे म्हणून आ.राजू मामा भोळे, संस्थापक प्रदेशाध्यक्ष संजय खामकर, माजी महापौर तथा…

Read More

श्रीराम मंदिर संस्थानतर्फे पारंपरिक रथोत्सव भक्तिभावात ; २० क्विंटल फुलांनी सजला मंदिरासह रथमार्ग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  सुवर्णनगरीचे ग्रामदैवत असणाऱ्या श्रीराम मंदिर संस्थानतर्फे कार्तिक प्रबोधिनी एकादशीनिमित्त रविवारी, २ नोव्हेंबर रोजी पारंपरिक श्रीराम रथोत्सव मोठ्या उत्साहासह भक्तिभावाने पार पडला. १५३ वर्षांची अखंड परंपरा असलेला उत्सव यंदा विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. दुपारी १२ वाजून ३५ मिनिटांनी ‘जय श्रीराम’च्या घोषात, शंखनाद आणि चौघड्यांच्या गजरात रथ हलला आणि क्षणात संपूर्ण सुवर्णनगरी प्रभू श्रीरामाच्या जयघोषात दुमदुमून गेली. यंदाच्या रथोत्सवासाठी श्रीराम मंदिराची आणि रथाची सजावट फुलांनी केली होती. त्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतले. तब्बल तीन क्विंटल झेंडू, एक टन शेवंती आणि गुलाब फुलं तर रथासाठी दोन क्विंटल फुलांचा…

Read More

योगदानाचे स्मरण करून राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना मिळाला उजाळा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   लोहपुरुष भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त जळगाव कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी लेवा भवनातील सरदार पटेल यांच्या अर्धकृती पुतळ्यास माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी सरदार पटेल यांच्या कार्याचा व देशाच्या एकीकरणातील त्यांच्या योगदानाचे स्मरण करून त्यांच्या राष्ट्रीय एकात्मतेच्या विचारांना उजाळा देण्यात आला. कार्यक्रमास फाउंडेशनचे सचिव राहुल नेतलेकर, योगेश बागडे, उमेश माछरेकर, संदीप गारुंगे, पंकज गागडे, राहुल दहियेकर यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते, समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देणारा हा उपक्रम समाजातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास कंजरभाट समाज युवा फाउंडेशनतर्फे व्यक्त करण्यात…

Read More

आकाशवाणी चौक, इच्छादेवी, अजिंठा चौफुली परिसरातील ‘अस्वच्छते’कडे वेधले लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील आकाशवाणी चौक, इच्छादेवी सर्कल आणि अजिंठा चौफुली सर्कल अशा प्रमुख परिसरात मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे आणि जंगली झाडे वाढल्यामुळे परिसर अतिशय अस्वच्छ आणि विद्रूप झाला आहे. याठिकाणाची दुरवस्था लक्षात घेऊन जळगाव महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहरतर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (नही) यांना निवेदन देत तातडीने साफसफाई करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, मनसेच्या इशाऱ्यामुळे याकडे संबंधित प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देऊन तातडीने साफसफाईचे काम करावे, अशी नागरिकांनीही अपेक्षा व्यक्त केली आहे. निवेदनात नमूद केले आहे की, शहरातील आकाशवाणी चौक हा प्रमुख आणि गर्दीचा भाग आहे. या मार्गावरून जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी, उद्योजक आणि…

Read More

मंदिरात ट्रस्टतर्फे उत्सवासाठी तयारीला वेग साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   शहरातील निवृत्ती नगरातील केरळी महिला ट्रस्टच्या अयप्पा स्वामी मंदिरात कार्तिक पौर्णिमा उत्सवाचा शुभारंभ शुक्रवार, ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ वाजता होणार आहे. उत्सवासाठी मंदिरात जोरात तयारी सुरू आहे. भाविकांना मंदिर दर्शनासाठी ४ नोव्हेंबर रात्री ९.३७ पासून ते ०७ नोव्हेंबर सकाळी ६.५२ वाजेपर्यंत प्रवेश मिळणार आहे. उत्तर महाराष्ट्रातील हे एकमेव अयप्पा स्वामी मंदिर आहे. येथे प्राणप्रतिष्ठा पूर्णपणे शास्त्रोक्त पद्धतीने केली आहे. प्रत्येकवर्षी कार्तिक पौर्णिमेचा शुभमुहूर्त केरळमधील गुरूजींच्या मार्गदर्शनाखाली निश्चित केला जातो, ही मंदिराची खास परंपरा आहे. यावर्षी पौर्णिमा व कृतिका नक्षत्राचा योग आहे. पौर्णिमा ४ नोव्हेंबर रोजी रात्री ९.३७ पासून ते ५ नोव्हेंबर…

Read More

जी. एच. रायसोनी महाविद्यालयात सरदार पटेलांना अभिवादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  येथील जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनियरिंग अँड मॅनेजमेंट महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना विभागातर्फे शुक्रवारी, ३१ ऑक्टोबर रोजी ‘राष्ट्रीय एकता दिन’ साजरा करण्यात आला. यानिमित्त सरदार वल्लभभाई पटेल जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावर्षीचा कार्यक्रम “सरदार @१५०-एकता मार्च (एक भारत, आत्मनिर्भर भारत)” या थीमनुसार आयोजित केला होता. कार्यक्रमाचे उद्घाटन जी. एच. रायसोनी इन्स्टिट्यूटच्या संचालिका प्रा. डॉ. प्रिती अग्रवाल यांच्या हस्ते सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आले. राष्ट्रीय एकता दिन हा केवळ एक औपचारिक दिवस नसून आपल्या देशातील विविधतेतून एकता जपण्याचा संकल्प पुन्हा दृढ करण्याचा दिवस असल्याचे अध्यक्षस्थानावरून मार्गदर्शन…

Read More

२.४६ कोटींचा निधी मंजूर ; तरीही ठेकेदार बेपत्ता, सा.बां.वि.चे दुर्लक्ष साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  शहरातील पिंप्राळा भागातील सोनीनगर ते ओमकार पार्कदरम्यान सुरू असलेले सिमेंट काँक्रिट रस्त्याचे काम अर्धवट सोडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. २.४६ कोटींचा निधी मंजूर असूनही ठेकेदाराने काम थांबवले आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने देखरेखीत दुर्लक्ष केल्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून रस्ता रखडला आहे. याठिकाणी अपघातांच्या घटना वाढल्या असल्याने रखडलेला रस्ता नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत आहे. पिंप्राळा भागातील सोनीनगरजवळील पुलापासून पुढे रस्ता न उरल्याने खड्ड्यांमुळे दुचाकीस्वार पडून जखमी होत आहेत. कामाचा ठेकेदार अनेक दिवसांपासून बेपत्ता असल्याने परिसरातील रहिवासी संभ्रमात आहेत. निधीअभावी काम थांबवले असल्याचा ठेकेदाराचा दावा असला तरी निविदेत काम पूर्ण झाल्यानंतरच देयक…

Read More

जळगावात रंगणार प्राथमिक फेरी ; विजेत्यांसाठी १ लाख ११ हजारांचे पहिले पारितोषिक साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  राज्यातील रंगभूमीवरील तरुणाईच्या कलागुणांना वाव देण्यासाठी जी. एच. रायसोनी स्पोर्ट्स अँड कल्चरल फाउंडेशनतर्फे “जी. एच. रायसोनी करंडक” राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. स्पर्धेची प्राथमिक फेरी जळगाव येथे तर अंतिम फेरी नागपूर येथे पार पडणार आहे. स्वायत्त जी. एच. रायसोनी कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंट, जळगाव येथे प्राथमिक फेरीचे आयोजन केले आहे. त्यात अव्वल ठरणाऱ्या तीन एकांकिकांना अंतिम फेरीसाठी प्रवेश दिला जाणार आहे. अंतिम फेरी १ ते ४ फेब्रुवारी २०२६ दरम्यान नागपूर येथे रंगणार आहे. विजेत्यांसाठी आकर्षक बक्षिसांची तरतूद केली आहे. प्रथम क्रमांक १ लाख…

Read More

जि.प.च्या सीईओ मीनल करनवाल यांची माहिती, उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण महिलांना स्थिर बाजारपेठ साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील महिला बचत गटांनी आत्मनिर्भरतेचा प्रेरणादायी नमुना सादर केला आहे. जिल्हा पातळीवर भरविण्यात आलेल्या दिवाळी मेळाव्यात महिलांनी तब्बल एक कोटी १८ लाख रुपयांची उलाढाल केली असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी दिली. मेळाव्यात जिल्ह्यातील २०० हून अधिक स्टॉल्स उभारण्यात आले होते. महिलांनी स्वतः बनवलेले दिवाळी फराळ, हस्तकला वस्तू, सजावटी साहित्य, फुलांची आरास, गृहोपयोगी साहित्य आणि स्थानिक कृषी उत्पादनांपासून तयार केलेल्या वस्तू विक्रीस ठेवण्यात आल्या. नागरिकांनी अशा उत्पादनांना उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जळगाव शहरातील जी.एस. मैदानावरील प्रदर्शन, तसेच नशिराबाद परिसरात…

Read More

“मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात : ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांचे प्रतिपादन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  सातशे वर्षांची परंपरा असलेल्या मराठीचा केवळ अभिजात भाषा म्हणून ढोल न वाजवता असे मराठीपण महाराष्ट्राचे वैभव आहे. ते आपण जपले पाहिजे, असे प्रतिपादन ज्येष्ठ कवी अशोक नायगावकर यांनी केले. आरोग्यदीप किडनी फाउंडेशन, इंडियन मेडिकल असोसिएशन, जळगाव शाखा आणि व. वा. जिल्हा वाचनालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “मिश्किली आणि कविता” कार्यक्रमात ते बोलत होते. प्रारंभी दीप प्रज्ज्वलन व नायगावकर यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी दिवाळीनिमित्त ‘दाद आणि टिळक’ या कविता प्रारंभी सादर केल्या. महिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करणारी माय आणि नोकरी व कौटुंबिक अशा दुहेरी जबाबदाऱ्या सांभाळणाऱ्या महिलांविषयी सादर…

Read More