Author: Sharad Bhalerao

छावा मराठा युवा महासंघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  मालेगाव तालुक्यातील डोंगराळे येथील चिमुकलीवर झालेल्या अमानवी अत्याचार आणि निर्घृण हत्येच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरले आहे. याप्रकरणी समाजात तीव्र संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर छावा मराठा युवा महासंघ उत्तर महाराष्ट्र विभागातर्फे जळगाव जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पीडितेला न्याय मिळावा आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर पावले उचलावीत, अशी जोरदार मागणी संघटनेने प्रशासनाकडे केली आहे. निवेदनात नमूद केल्यानुसार, ग्रामीण भागातील बालसुरक्षेचा गंभीर प्रश्न या घटनेमुळे समोर आला आहे. अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी प्रशासनाने ठोस उपाययोजना करणे आवश्यक…

Read More

बिल वाढल्याची तक्रार, मनसेचा महावितरणला इशारा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  गेल्या दोन महिन्यांपासून वीज महावितरण विभागाकडून मीटर रिडिंग घेण्याच्या तारखेत अचानक बदल केल्यामुळे जळगाव शहरातील नागरिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. यापूर्वी दर महिन्याच्या २५ तारखेला घेतले जाणारे रिडिंग आता २२ तारखेलाच घेतले जात आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता झालेल्या अशा बदलामुळे हजारो ग्राहकांचे बिल अनाठायी वाढून येत आहे. विशेषतः ऑनलाईन रीडिंग सबमिट करणाऱ्या ५० टक्क्यांपेक्षा जास्त ग्राहकांमध्ये प्रचंड गोंधळ निर्माण झाला आहे. ग्राहकहिताच्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे त्वरित व सकारात्मक दखल न घेतल्यास आंदोलनात्मक पवित्रा घ्यावा लागेल, असा इशारा मनसेने दिला आहे. तक्रारींचा गांभीर्याने मागोवा घेत जळगाव शहर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे मंगळवारी, १८ नोव्हेंबर…

Read More

१९ प्रभागात २ आर्किटेक्ट, ४ इंजिनियर प्रभागनिहाय जबाबदारी घेणार साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   माजी आमदार ॲड. जयप्रकाश बाविस्कर यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या ‘जळगाव प्रथम’ उपक्रमाला विविध क्षेत्रातील नागरिकांसह मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. ॲड. बाविस्कर यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी आर्किटेक्ट आणि इंजिनिअर यांचे संघटित प्रयत्न आवश्यक असल्याचे प्रास्ताविकात सांगितले. शहराला राहण्यायोग्य बनवणे ही आजची अत्यावश्यक गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यानंतर महाराष्ट्राच्या विकासाची ब्ल्यू प्रिंट उपस्थितांना दाखविण्यात आली. जळगाव शहराचा विकास आराखडा बनविण्यासाठी १९ प्रभागात २ आर्किटेक्ट, ४ इंजिनियर प्रभागनिहाय जबाबदारी घेणार, असे सर्वानुमते ठरविण्यात आले. मु.जे.महाविद्यालयाच्या सभागृहात आयोजित बैठकीत विविध क्षेत्रातील तज्ज्ञांनी ठोस सूचना मांडल्या. त्यात क्रेडाईचे ज्येष्ठ पदाधिकारी इंजिनियर अनिश शहा…

Read More

घराघरात संविधान जागृतीसाठी संमेलनाचे बहुआयामी नियोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   संविधानाचे मूल्य प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचवून घराघरात जागृती निर्माण करण्याचे कार्य संविधान सन्मान संमेलन प्रभावीपणे पार पाडणार आहे. त्यामुळे संमेलन देशासाठी ‘आयडॉल’ ठरेल, असे मत संमेलनाचे मुख्य संयोजक मुकुंद सपकाळे यांनी आढावा बैठकीत व्यक्त केले. ज्येष्ठ साहित्यिक जयसिंग वाघ यांनी स्मरणिका व अतिथी नियोजनाची माहिती देत आवश्यक मार्गदर्शन केले. बैठकीत प्रा. डॉ. सत्यजित साळवे यांनी संमेलनाचा प्रचार वाड्या–वस्त्यांपर्यंत कसा पोहोचवायचा त्याचे नियोजन मांडले. बैठकीत संमेलन स्थळ, शहरातील स्वागत कमानी, प्रचार व्यवस्थापन याबाबत प्रा. किसन हिरोळे, जगदीश सपकाळे, ॲड. आकाश सपकाळे, गोकुळ पोहेकर, अनिल मेढे, विवेक सैंदाणे, पितांबर अहिरे, भारती रंधे, पुष्पा साळवे,…

Read More

मायमाती फाउंडेशनचा ‘वाचन–गप्पांचा’ अभिनव उपक्रम साईमत/जळगाव/प्रतिनिधी :   तालुक्यातील ममुराबादजवळील धामणगावातील कै. बाबडू सुपडू सपकाळे माध्यमिक विद्यालयात ‘बालदिन’ नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. मायमाती फाउंडेशन संचलित ‘गंमत जोडशब्दांची रिडिंग अँड लर्निंग सेंटर’ तर्फे कट्ट्यावरच्या गप्पा पुस्तक मेळावा “पुस्तकातून ज्ञान घेऊन, गप्पांमधून व्यक्त होऊ” असा अनोखा उपक्रम राबविण्यात आला. विद्यालयाच्या आवारात इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी जिवंत पुस्तकालय उभे करण्यात आले. तब्बल दहा विषयाधारित कॉर्नर सजवून विद्यार्थ्यांना विविध साहित्य जगताचा प्रवास घडविण्यात आला. गोष्टी, चित्र पुस्तके, कविता, माहितीपूर्ण साहित्य, कुल्की मासिक, गरवारे बालभवनची पुस्तके यांसह ज्योत्स्ना प्रकाशन आणि प्रथम बुक्स यांच्या दर्जेदार साहित्याचा समावेश होता. उपक्रमात प्रभावती पाटील यांनी उपस्थित सर्व…

Read More

बालरंगभूमी परिषदेतर्फे २८, २९ नोव्हेंबरला आयोजन साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  राज्यातील बालकांपर्यंत मराठी संस्कृती आणि परंपरांची महती पोहचावी. त्यांनी लोककलांचा अभ्यास करुन ही परंपरा पुढे जोपासावी अशा उद्देशाने बालरंगभूमी परिषदेतर्फे दरवर्षी ‘जल्लोष लोककलेचा’ उपक्रमाचे आयोजन करण्यात येते. यंदा शहरात येत्या २८ व २९ नोव्हेंबर रोजी बालरंगभूमी परिषदेच्या जळगाव शाखेतर्फे ला.ना. सार्वजनिक विद्यालयाच्या भैय्यासाहेब गंधे सभागृहात महोत्सवाचे आयोजन केले आहे. राज्यातील बालकलावंतांच्या सर्वांगिण कलात्मक विकासासाठी सातत्याने नावीन्यपूर्ण उपक्रम राबविणाऱ्या बालरंगभूमी परिषदेतर्फे महाराष्ट्राची कला व परंपरा जपतांना बालमनावर संस्कार करण्याच्या अनुषंगाने ‘जल्लोष लोककलेचा’ महोत्सवाचे आयोजन केले आहे. लोककलांचा प्रगल्भ वारसा लाभलेल्या महाराष्ट्रात लोककलांना उर्जितावस्था प्राप्त व्हावी व लोककलांचे केवळ मनोरंजनात्मक स्वरुप न राहता या…

Read More

आकाशवाणी चौकातील सर्कलसह परिसरात पसरली अस्वच्छता साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  गेल्या अनेक दिवसांपासून आकाशवाणी चौकातील सर्कलमध्ये मोठ्या प्रमाणात गवत उगवलेले असून परिसरात कचरा साचत असल्याबाबत प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरद पवार गट) तर्फे प्रतीकात्मक आंदोलन करण्यात आले. सर्कल मोडकळीस आलेले असताना आणि परिसराची नियमित स्वच्छता न ठेवता झालेल्या निष्काळजीपणाबद्दल आंदोलनकर्त्यांनी जळगाव महानगरपालिका तसेच नॅशनल हायवे ॲथॉरिटीच्या अधिकाऱ्यांचा निषेध व्यक्त केला. आंदोलनात सर्कलमध्ये उगवलेल्या गवतावर पंपाच्या सहाय्याने तणनाशक रसायनाची फवारणी करण्यात आली. त्याचबरोबर परिसरातील साचलेला कचरा गोळा करून एका बाजूला हलवण्यात आला. त्यानंतर कार्यकर्त्यांनी परिसराची साफसफाई नेहमीप्रमाणे ठेवण्यात यावी आणि भविष्यात गवताची वाढ रोखण्यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात याव्यात, अशी…

Read More

जिल्हाधिकारी कार्यालयात सौर ऊर्जेवर आधारित शाश्वत विकास उपक्रमांवर चर्चा साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  जिल्ह्यातील सौर ऊर्जेवर आधारित उपक्रमांना चालना देण्यासाठी बुधवारी, १२ नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात ‘सौर ऊर्जा व वीज व्यवस्थापन’ विषयावर सविस्तर बैठक पार पडली. यावेळी महावितरणचे सहव्यवस्थापकीय संचालक दिलीप जगदाळे (कोकण प्रादेशिक विभाग, कल्याण) यांनी जळगाव जिल्ह्याचा दौरा करून जिल्हाधिकारी रोहन घुगे यांच्याशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. बैठकीत सौर ऊर्जा वापर, ऊर्जा स्वावलंबन आणि पर्यावरणपूरक विकास यासंबंधी विविध योजनांचा आढावा घेतला. बैठकीला जळगाव महावितरणचे मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता उपस्थित होते. बैठकीतील प्रमुख मुद्यांमध्ये ‘PM Suryaghar मोफत वीज योजना’-शहरी आणि ग्रामीण भागातील घरांमध्ये सौर पॅनल स्थापनेद्वारे घरगुती वीज खर्च कमी करणे आणि…

Read More

स्वावलंबनाच्या स्वप्नांवर पाणी, हजारो युवकांचे आर्थिक नुकसान साईमत/जळगाव/प्रतिनिधी :  राज्यातील आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री अर्थसहाय्य योजना, प्रधानमंत्री अर्थसहाय्य योजना आणि इतर शासकीय अर्थसहाय्य योजनांतील बेरोजगार तरुणांची प्रकरणे थांबविण्यात आली आहेत. त्यामुळे हजारो युवकांचे आर्थिक नुकसान होत आहे. त्यांच्या स्वावलंबनाच्या स्वप्नांवर पाणी फिरत आहे. त्यामुळे आचारसंहिता बेरोजगारांचा कोणताही हक्क हिरावू शकत नाही, अशा आशयाचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. निवेदन देतेवेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, उपमहानगर अध्यक्ष राजेंद्र निकम, वाहतूक सेनेचे रज्जाक सय्यद, प्रसिद्धी प्रमुख सतीश सैंदाणे, दीपक राठोड, प्रदीप पाटील तसेच महिला सेनेच्या अनिता कापुरे, लक्ष्मी भील आदी उपस्थित होत्या. निवेदनात म्हटले आहे की, या…

Read More

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात उधाण साईमत/चाळीसगाव/प्रतिनिधी :   छत्रपती संभाजीनगर येथील देवगिरी नागरी सहकारी बँक लिमिटेडच्या चाळीसगाव शाखेची तब्बल ५ कोटी ३३ लाख ८५ हजार ३५६ रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांच्यासह चार जणांविरुद्ध चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. ऐन निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर गुन्हा दाखल झाल्याने राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आले आहे. उमंग व्हाईट गोल्ड प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या नावाने घेतलेले औद्योगिक कर्ज न भरल्याने ते एनपीए झाले होते. बँकेकडून संधी देऊनही परतफेड न केल्याने बँकेने कार्यवाही सुरू केली. मात्र, या दरम्यान बँकेकडे गहाण ठेवलेली मशिनरी कंपनीच्या संचालकांनी संगनमताने विकल्याचा…

Read More