नमस्कार मंडळी ???????? ????आज आपण मकर संक्रांतीचे महत्व जाणून घेऊ या ????या वर्षी 14 जानेवारी ला दुपारी 2 वाजुन 28 मिनिटांनी सूर्य नारायण मकर राशीत प्रवेश करीत आहे ????सूर्य त्याचा पुत्र शनी ???????? च्या घरी म्हणजे मकर राशीत प्रवेश करीत आहे… या ठिकाणी सूर्याचा मुक्काम 1 महिना असतो त्यामुळे शनीला फार आनंद होतो ????काही ज्योतिषांचे असे म्हणणे आहे की शनी आणि सूर्य हे शत्रू आहे पण हे सपशेल खोटे आहे, कारण पिता पुत्रा मध्ये मतभेद असू शकतात पण शत्रुत्व नसते ????शनी विषयी पुढच्या लेखात आपण सविस्तर पणे चर्चा करू.. आता फक्त मकर संक्रांती चे महत्व काय त्या विषयी चर्चा…
Author: saimat team
मुंबई: करोना रुग्णांची संख्या नियंत्रणात राहिल्यास फेब्रुवारी महिन्यात राज्यातील करोना निर्बंध शिथील केले जातील, अशी शक्यता आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वर्तविली आहे. सध्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात विशेषत: मराठवाडा आणि विदर्भात रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे राज्यातील शाळा आणखी १५ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली. जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुंबईसह राज्यात करोनाचा उद्रेक पाहायला मिळाला होता. परंतु, गेल्या-दोन तीन दिवसांमध्ये रुग्णसंख्येत फारशी वाढ झालेली नाही. ही परिस्थिती कायम राहिल्यास येत्या काही दिवसांमध्ये राज्यातील निर्बंध पुन्हा शिथील होऊ शकतात, असे संकेत राजेश टोपे यांच्या वक्तव्यातून मिळत आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य सरकारने सध्या महाराष्ट्रात दिवसा जमावबंदी आणि रात्रीची…
चोपडा प्रतिनिधी :- येथील पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक सीआर चौधरी हे होते. सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान त्यांच्या कार्यावर प्रमुख वक्ते सी आर चौधरी यांनी प्रकाश टाकला. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. जीवनाची दिशा व गती बदलण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या ,भोसले यांची सून, राजमाता जिजाऊ…
एकीकडे आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पक्ष मजबुतीसाठी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) राज्यभरात दौरे करत आहेत. मात्र दुसरीकडे पक्षाला गळती लागल्याचे चित्र दिसत आहे. काही दिवसांपूर्वी पुण्यातील मनसेच्या नेत्या रुपाली पाटील (Rupali Patil) यांनी पक्षाला रामराम करत राष्ट्रवादीत (NCP) प्रवेश केला. आता विदर्भातही मनसेला मोठा धक्का बसणार आहे . मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले (Atul Wandile) राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याची माहिती आहे. विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा म्हणून अतुल वांदिले ओळखले जातात. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत ते मुंबईमध्ये राष्ट्रवादी पक्ष कार्यालयात 40 पदाधिकाऱ्यासोबत वांदिले राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधणार आहेत. वांदिले यांच्या पक्षप्रवेशाने विदर्भात…
मुक्ताईनगर, प्रतिनिधी । घरामध्ये बनावट विदेशी दारू तयार करणाऱ्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तालुक्यातील कुर्हा येथील एक त्याच्या घराच्या गच्चीवर विनापरवाना बनावट विदेशी दारू तयार करत असून शासनाचा कर बुडवत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली असता यावर कारवाई करत कुऱ्हा येथील तरूणाला अटक करण्यात आली आहे. याबाबत मुक्ताईनगर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुक्ताईनगर तालुक्यातील कुऱ्हा येथील एक तरूण विनापरवाना बनावट विदेशी दारू त्याच्या राहत्या घरावरील गच्चीवर तयार करून विक्री करून शासनाचा मोठ्या प्रमाणावर कर बुडवत असल्याची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या…
जळगाव, प्रतिनिधी। जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात आज जिजाऊ स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात आले. दि. १२ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालयात साजरी करण्यात आली. जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांना अभिवादन कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शालिनी सोनवणे यांनी जिजाऊंच्या कार्य कर्तृत्वाचा आढावा घेऊन व स्वामी विवेकानंदासारखे शांत संयमी आणि तेजस्वी राहता आले पाहिजे, तसेच महानगराध्यक्ष मंगला पाटील यांनी महिलांना सभासद नोंदणी कशी करावी. संघटन जास्तीत जास्त वाढवले पाहिजे. विकास मराठे यांनी सभासद नोंदणी फॉर्म कसा भरावा याची माहिती दिली. सर्व कार्यकारणीतील महिलांची सभासद नोंदणी करुन घेण्यात आली व काही महिलांना पदे वाटप करण्यात आली. यावेळी कार्याध्यक्ष प्रा. शालिनी…
जळगाव, प्रतिनिधी । शिरसोली येथील हेमंतकुमार (राजुभाऊ) चौधरी यांची कन्या कु. किरण हेमंतकुमार चौधरी हिने बीई मॅकेनिकल इंजिनीयरिंग जीआरई परीक्षेत ३५० गुण मिळवून तिची एम. एस (मास्टर ऑफ सायन्स) साठी इटली येथील जगप्रसिद्ध विद्यापीठ “जेनोवा” येथे निवड झाली. यानिमित्त तिचा सत्कार व अभिनंदनाचा कार्यक्रम शिरसोली येथे आयोजित करण्यात आला होता. यानिमित्त आप्तेष्ठ, नातेवाईक, परिसरातील ज्येष्ठ नागरिक व गावकऱ्यांनी कु. किरण चा सत्कार केला व तिला भावी उच्च शिक्षणासाठी शुभेच्छा दिल्या. कु. किरण ची उच्च शिक्षणासाठी इटली येथे निवड झाली. ही आपल्या सर्वांसाठी अभिमानाची बाब असल्याचे मत सत्कार करतेवेळी मराठा – कुणबी समाजभूषण पुरस्कार प्राप्त ,गौरी उद्योग समूह, वावडदाचे चेअरमन तथा…
चोपडा प्रतिनिधी । येथील पंकज प्राथमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती उत्साहाने साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक एम व्ही पाटील होते तर प्रमुख वक्ते म्हणून इतिहास अभ्यासक सीआर चौधरी हे होते. सर्व प्रथम राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. दरम्यान त्यांच्या कार्यावर प्रमुख वक्ते सी आर चौधरी यांनी प्रकाश टाकला. ते आपल्या मनोगतात म्हणाले की, स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व मानवजातीला प्रेरक असे आहेत. जीवनाची दिशा व गती बदलण्यासाठी स्वामी विवेकानंद यांचे विचार नक्कीच उपयुक्त ठरतील. स्वराज्याचे स्वप्न साकार करणाऱ्या स्वाभिमानी जाधव यांची कन्या ,भोसले यांची सून, राजमाता जिजाऊ…
जामनेर, प्रतिनिधी । तालुक्यातील शेंगोळा येथे ग्रामपंचायत हॉलमध्ये स्वामी विवेकानंद व जिजाऊ माता यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. सरपंच मिनाबाई रताळ यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. याप्रसंगी उपसरपंच संदीप सावळे, ग्रामपंचायत सदस्य सरला बेलेकर, हसीना तडवी, प्रतिभा गावंडे, माजी सरपंच दिलीप रताळ, समाधान गावंडे, वजीर तडवी संजय दाभाडे, समाधान मोकासरे, मोहन बेलेकर, देवगिर गोसावी ग्रामपंचायत कर्मचारी अमोल जोशी, नितीन बुदे, प्रमोद दौंड आदींसह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चाळीसगाव ः प्रतिनिधी I येथील विश्व मानव रुहाणी केंद्र येथे 4 महिन्यांपूर्वी आमदार मंगेश चव्हाण यांनी केंद्रातील भाविकांच्या मागणीच्या अनुषंगाने विश्व मानव रुहाणी केंद्र येथील आवारात पेंव्हर ब्लॉकच्या कामाचे भूमिपूजन केले होते, आमदार स्थानिक विकास निधीतून चारच महिन्यात सदर काम पूर्ण झाले व 9 जानेवारी रोजी विश्व मानव रुहाणी केंद्र चाळीसगावच्या 18 व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून सदर लोकार्पणाचा कार्यक्रम घेण्यात आला. आमदार मंगेश चव्हाण व मान्यवरांच्या हस्ते नारळ फोडून व फीत कापून सदर पेव्हर ब्लॉकचे उद्घाटन करण्यात आले. सदर कार्यक्रमास उपस्थित राज्य निगारण कमिटी अध्यक्ष गणेश धनगर सर यांनी मनोगतातुन आमदारांचे आभार मानले, खरच आपण फक्त आमदार नसून समाजाचे सेवक…