मुंबई, वृत्तसंस्था । ‘या महाराष्ट्रात दुकानांवर मराठीतच पाट्या असाव्यात ह्यासाठी खरंतर आंदोलन करावं लागूच नये, परंतु २००८, २००९ साली पाट्या मराठीतच असाव्यात म्हणून महाराष्ट्र सैनिकांनी महाराष्ट्र जागवला. आंदोलनं केली. शेकडोंनी केसेस अंगावर घेतल्या आणि शिक्षा भोगल्या. सरकारने आता हा निर्णय घेतला तेव्हा त्याचे श्रेय फक्त आणि फक्त माझ्या महाराष्ट्र सैनिकांचे आहे. त्या सर्वांचे मन:पूर्वक अभिनंदन, बाकी कुणीही हे श्रेय लाटण्याचा आचरटपणा करु नये, त्यावर अधिकार आहे फक्त महाराष्ट्र सैनिकाचाच’, असं राज ठाकरे यांनी सांगितलं. महाराष्ट्र सरकारचं अभिनंदन, सरकारला मी इतकंच सांगेन की आता कच खाऊ नका, ह्याची अंमलबजावणी नीट करा. ह्यात आणखी एक भानगड सरकारनं करुन ठेवली आहे की, मराठी भाषेशिवाय…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । नेहरू युवा केंद्रातर्फे स्वामी विवेकानंद जंयती व राजमाता जिजाऊच्या जन्मोत्सवानिमित्त बालगंधर्व खुले नाट्यगृहात युवा संवाद अभियान राबविण्यात आले. या अभियानाचा शुभारंभ रंगकर्मी रमेश भोळे यांच्या हस्ते स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आले. कोरोना काळातही संकटाचा सामना करीत सांस्कृतिक क्षेत्रातील नाट्य, नृत्य संगित क्षेत्रातील युवा कलावंत आपली कला जतन व संवर्धन करण्याच कार्य अविरतपणे करीत आहे. देशाचे ऐक्य व सार्वभौमत्व जर टिकवायचे असेल तर आपली कला जिवंत ठेवणे गरजेचे आहे. हे कार्य प्रत्येक युवा कलावंताने करायला हवे, असे विचार रगंकर्मी रमेश भोळे यांनीव्यक्त केले. या वेळी खान्देश लोककलावंत विकास परिषदेचे अध्यक्ष विनोद ढगे, राष्ट्रवादी…
चाळीसगाव(प्रतिनिधी)- कन्नड घाटात हैद्राबाद येथील स्टाईलस ने भरलेली आयसर गाडी पलटी झाली होती प्रचंड प्रमाणात गाडीचे नुकसान झाल्याने ट्रान्सपोर्टचे मालक शाहिद अली यांनी कन्नड घाटाजवळ असलेले राज ढाबाचे मालक बिस्मिल्ला शेख उर्फ छोटू पहेलवान यांच्याशी संपर्क साधला अपघात झालेला आयशर इन्शुरन्स क्लेम साठी गाडी धाब्यावर लावून घ्या छोटू पहेलवान व ट्रान्सपोर्ट मालक यांच्यात अपघात झालेल्या आयशरची खरेदी विक्री संमतीने करण्यात आली राज धाब्यावर इन्शुरन्स अधिकारी गेले असता त्यांना राज ढाबा येथे अपघात झालेली आयशर जागेवर न दिसल्याने त्यांनी गाडी मालक राजू भाई करंगीया रा.बडोदा गुजरात यांना इन्शुरन्स अधिकारी यांनी कळविले त्यावरून चाळीसगाव ग्रामीण पोलिस स्टेशनमध्ये गाडी मालक यांनी गाडी चोरीस…
पाचोरा : जळगाव दिनांक 12 : सभासदांसाठी विविध योजना राबविणाऱ्या जळगाव जनता सहकारी बँकेच्या वतीने दरवर्षी अतिशय माहितीपूर्ण अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित दिनदर्शिकेचे वितरण करण्यात येते. यावर्षी बँकेच्या वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या अनुषंगाने सन २०२२ च्या दिनदर्शिकेत देशाच्या इतिहासातील विविध घटना दिनदर्शिकेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सन २०२२ च्या या दिनदर्शिकेत सार्वभौम राष्ट्राची पायाभरणी, एकराष्ट्र-एकजन-संस्थांनांचे विलीनीकरण, जन आंदोलने, सहकार चळवळ आणि बँकांचा विकास, विज्ञान आणि तंत्रज्ञान, सर्वशिक्षा अभियान, आत्मनिर्भर भारत, राष्ट्रीय सुरक्षा, वैभव संपन्न सिनेसृष्टी, तंत्रज्ञ पानाने समृध्द संस्था, साहित्य कला आणि संस्कृती, भारताची क्रीडा शक्ती या आपल्या देशाच्या विविध क्षेत्रांच्या माहितीचा समावेश दिनदर्शिकेत करण्यात आला…
पाचोरा(वार्ताहर) पाचोरा उपविभागीय अधिकारी यांच्यासाठी हक्काचा निवारा असावा या भावनेतून व आ.किशोर अप्पा पाटील यांच्या पाठपुराव्या मूळे तथा तत्कालीन प्रांताधिकारी राजेंद्र कचरे यांच्या कार्यकाळात सूरु झालेल्या प्रांताधिकारी निवासाच्या प्रवासाची फलनिष्पत्ती झाली असून सुमारे ५९ लक्ष रुपये खर्चाचे भडगाव रोड वरील शासकीय विश्राम गृहाच्या परिसरात होणाऱ्या शासकीय निवास्थानाचे भूमिपूजन बुधवारी सकाळी ११ वाजता आमदार किशोर अप्पा पाटील यांचे हस्ते संपन्न झाले.यावेळी प्रांताधिकारी डॉ विक्रम बांदल ,माजी नगराध्यक्ष संजय गोहिल, बांधकाम विभागाचे अभियंता उपअभियंता शेलार ,ज्युनियर अभियंता काजवे यांची उपस्थिती होती.यावेळी खुशाल जोशी यांनी विधिवत पूजा करत कार्यक्रम संपन्न केला. शासकीय अधिकारी कर्तव्यावर असतांना त्यांना घरी आल्यावर हक्काचे निवासस्थान असावे अशी अनेक…
जामनेर(प्रतिनीधी):- येथील ज्ञानगंगा माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद जयंती काल दि.१२ रोजी साजरी करण्यात आली.यावेळी ऑनलाईन झूम मिटिंग द्वारे विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेेचे पूजन प्राचार्य राजेंद्र सोनवणे व उपशिक्षक विजय कोळी यांनी केले. त्यानंतर सर्वांनी प्रतिमेस अभिवादन केले.सदर प्रसंगी ऑनलाईन पद्धतीने इ.९वी ची विद्यार्थ्यांनी कु .वैष्णवी बेलदार हिने राजमाता जिजाऊ यांची वेशभूषा धारण करून जिजाऊ वंदना गायली. प्रास्तविक शाळेचे उपशिक्षक विनय खोंडे सर यांनी केले. विद्यालयातील सर्व शिक्षक बंधू – भगिनी व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
चाळीसगाव–(वार्ताहर) येथील रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्थेच्या वतीने दिनांक 12 जानेवारी रोजी स्वामी विवेकानंद यांची जयंती सोहळा विविध अध्यात्मिक उपक्रमांनी संपन्न झाला. स्वामी विवेकानंद यांची जयंती सर्वत्र युवा दिन म्हणून साजरी करण्यात येते. त्याच अनुषंगाने 12 जानेवारी बुधवारी रामकृष्ण विवेकानंद सेवा संस्था घाट रोड येथे स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पूजन सेवानिवृत्त मुख्याध्यापक एल. डी. पाटील सर यांच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी सकाळी सेवा संस्थेच्या ध्यान मंदिरा मध्ये अध्यात्मिक पूजापाठ करण्यात आला. कार्यक्रम प्रसंगी स्वामी विवेकानंद यांच्या जीवनातील काही प्रसंग प्रशांत साळी यांनी उपस्थितांना कथन केले. त्याचबरोबर सेवा संस्थेच्या माध्यमातून शालेय विद्यार्थी- विद्यार्थिनी, युवक – युवती व इतर नागरिकांसाठी राबविण्यात येणाऱ्या विविध…
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते छगन भुजबळांना निर्दोष मुक्तता करण्याच्या निर्णयाला सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आव्हान दिले आहे. याबाबत त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. करोनामुळे उच्च न्यायालयात तातडीच्या याचिकेंवरच सुनावणी होत असल्याने या याचिकेवर सुनावणीसाठी महिन्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र सदन घोटाळा प्रकरणी ९ सप्टेंबरला छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागा (एसीबी)ने न्यायालयाकडे दोषमुक्त करण्यासाठी भुजबळांनी अर्ज दाखल केला होता. छगन भुजबळ यांच्यासोबत त्यांचा पुतण्या समीर भुजबळ यांनीही अर्ज दाखल केला होता. माझ्यावर करण्यात आलले आरोप निराधार…
भारताच्या बॅडमिंटन (Indian Badminton) क्षेत्राला कोरोनाने जबरदस्त हादरा दिला आहे आणि इंडियन ओपन स्पर्धेत खेळणारे तब्बल सात भारतीय बॅडमिंटनपटू कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेले आहेत. त्यात किदांबी श्रीकांत व अश्विनी पोनप्पा सारख्या आघाडीच्या खेळाडूंचा समावेश आहे. या खेळाडूंनी मंगळवारी RT-PCR चाचणी केली होती आणि तिचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचा प्राप्त झाला आहे अशी माहिती भारतीय बॅडमिंटन महासंघाने दिली आहे. बाधा झालेली आढळून आलेल्या खेळाडूंमध्ये अश्विनी पोनप्पा, रितिका ठाकरे, त्रिसा जॉली, मिथुन मंजुनाथ, सिमरन सिंघीआणि खुशी गुप्ता यांचा समावेश आहे. या सर्व खेळाडूंनी आता इंडिया ओपन स्पर्धेतून माघार घेतलेली आहे. या खेळाडूंचे दुहेरीतील साथीदार असलेल्या खेळाडूंनीही इंडिया ओपन मधून माघार घेतलेली आहे.…