उत्तरप्रदेश, वृत्तसंस्था । उत्तर प्रदेश पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या अडीच हजार कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हा एफआयआर नोंदवण्यात आला आहे. शुक्रवारी लखनऊमध्ये समाजवादी पार्टीच्या व्हर्च्युअल रॅलीमध्ये शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते, त्यामुळेच हा एफआयआर नोंदवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी भाजपा नेते स्वामी प्रसाद मौर्य, धरम सिंह सैनी यांच्यासह अनेक नेत्यांनी सपामध्ये प्रवेश केला. या प्रसंगी आयोजित एका कार्यक्रमात अखिलेश यादव यांच्यासह अनेक बडे नेते उपस्थित होते. या प्रसंगी ‘व्हर्च्युअल रॅली’मध्ये सहभागी होण्यासाठी शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांनी गर्दी केल्याने, लखनऊ पोलिसांनी समाजवादी पक्षाच्या नेत्यांविरोधात एफआयआर नोंदवला आहे. या रॅलीला सपा प्रमुख अखिलेश यादव आणि भाजपाचे माजी नेते स्वामी…
Author: saimat team
जळगाव, प्रतिनिधी । कांचननगर परिसरातील १२ वर्षीय बालकाने राहत्या घरात गळफास घेवून शुक्रवारी सकाळी १०.३० वाजता आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. मकरसंक्रात सारख्या सणासुदीच्या दिवशी ही घटना घडली. याबाबत कळताच नातेवाईकांनी आक्रोश केला. यश रमेश राजपूत (वय १२, रा. कांचननगर) असे मृत बालकाचे नाव आहे. रमेश सुकलाल राजपूत हे पत्नी, मुलगा आणि मुलीसह कांचननगर राहतात रमेश राजपूत हे शुक्रवारी सकाळी ७ वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीत कामाला गेले. त्यांची पत्नीही सकाळी स्वयंपाक करून घरकामासाठी बाहेर गेल्या. मुलगा यश आणि मुलगी सोनी हे दोघेच घरी होते. यश राजपूत हा घराच्या वरच्या खोलीत सकाळी १० वाजेच्या सुमारास गेला. त्याने दोरीने गळफास घेवून आत्महत्या…
जळगाव – गिरणा नदीला अतिक्रमण, प्रदूषण आणि शोषणापासून वाचविणे साठी तसेच गिरणा नदीवर तयार होणारे प्रस्तावित सात बलून बंधाऱ्यांच्या मंजुरीसाठी खासदार उन्मेशदादा पाटील यांनी आयोजीत केलेल्या गिरणा पुनरुज्जीवन अभियानाअंतर्गत नदी परिक्रमेचा तिसरा टप्प्यास येत्या १५ जानेवारी शनिवार पासून सुरू होत असून ३८० किलोमीटर गिरणा परिक्रमेचा तिसऱ्या टप्प्यात खासदार उन्मेश दादा पाटील हे दहिगाव संत, डोकलखेडा, वरसाडे, माहेजी, कुरंगी, दुसखेडा बहुळेश्वर संगम, परधाडे गणपती मंदिर असा २४ किमी पायी चालत केला गिरणा काठाचा प्रवास करणार असुन ठिकठिकाणी गावकऱ्यांकडून उत्स्फूर्त स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली असुन सर्वपक्षिय लोकचळवळ ठरत असलेल्या नदी परिक्रमेत सहभागी व्हावे.असे आवाहन अमोल शिंदे पाचोरा यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना…
अलिबाग, वृत्तसंस्था । रायगड जिल्ह्यातील काँग्रेस कार्यकर्ता आणि प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर याच्यासह त्याच्या दोन साथीदारांना अलिबाग पोलिसांनी अटक केली आहे. बदनामी करण्याच्या हेतूने बनावट फेसबुक अकाऊंटवरुन महिलेला अश्लील व्हिडिओ आणि मेसेज पाठवल्याप्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दरम्यान, तक्रारदार महिलाही उमेश ठाकूर यांच्या कटात सहभागी असल्याचे उघड झाले आहे. आपल्या अवैध रेती व्यवसायाबाबत तक्रारी करणाऱ्याचा काटा काढण्यासाठी त्याची बदनामी करण्याच्या हेतूने त्याच्या नावाने बनावट फेसबुक अकाऊंट उघडले. या फेक सोशल अकाऊंटवरुन महिलेला अश्लील व्हिडिओ आणि मेसेजेस पाठविण्यात येत होते. याप्रकरणी प्रदेश युवक काँग्रेसचा सरचिटणीस ॲड. उमेश ठाकूर सह शुभम गुंजाळ आणि मनिषा चोरडेकर या तिघांनाही अटक…
जामनेर, प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथे आज सकाळी नऊ ते दहा च्या दरम्यान चार ते पाच प्रवासी का बसवले या कारणावरून दोन गटात बाचाबाची होऊन तूबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. सविस्तर माहिती अशी की आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास जळगाव हुन संभाजीनगर कडे जाणारी लक्झरी क्रमांक mh 12 FZ 8007 पहूर बस स्टँड वर आले असता पहूर बस स्टँड वर उभी असलेली ओमनी क्रमांकmh 06 ab 1127 या अवैध प्रवासी वाहतूक होत बसलेले चार ते पाच प्रवासी खाली उतरून लक्झरी बस कडे बसले असता या कारणावरून दोन गटात गैर कायदा मंडळी जमुन कोरांना कायद्याचा भंग करून वाहतुकीचा…
वर्धा, वृत्तसंस्था । महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे हे आता नव्याने राज्यात दौरा करत आहेत. त्याचवेळी त्यांना एक एक धक्का बसत आहे. पुणे दौऱ्यावर असताना मनसेच्या महिला नेत्याने राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधले. आता विदर्भातही मनसेला गळती लागण्याची चिन्हे आहेत. मनसेचे प्रदेश उपाध्यक्षच आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. त्यामुळे विदर्भात मनसेला मोठा झटका मानला जात आहे. विदर्भातील मनसेचे प्रदेश उपाध्यक्ष अतुल वांदिले राष्ट्रवादीच्या वाटेवर आहेत. ते राष्ट्रवादीचे घड्याळ हातात बांधणार आहेत. अतुल वांदिले हा विदर्भातील ओबीसीचा मोठा चेहरा आहे.ते आज राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे. या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशध्यक्ष जयंत पाटील उपस्थित राहणार…
जळगाव, प्रतिनिधी । राजमाता जिजाऊंचा ४२४ वा जयंती सोहळा आज जळगाव शहरात मराठा सेवा संघातर्फे उत्साहात पार पडला. यावेळी मराठा सेवा संघाचे महानगराध्यक्ष व शाखा अभियंता श्री. हिरामणराव चव्हाण यांच्या हस्ते राजमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी आपले मनोगत व्यक्त करतांना चव्हाण म्हणाले की, जिजाऊंनी आपल्या मनात तयार असलेली हिंदवी स्वराज्याची संकल्पना प्रत्यक्षात साकार करण्यासाठी छत्रपती शिवरायांना ज्ञान, चारित्र्य, चातुर्य, संघटन व पराक्रमासह सत्त्वगुणांचे बाळकडू दिले माता केवळ मायाळू नसून शक्ती असू शकते याचं सर्वात मोठं उदाहरण जिजाबाईचं असू शकतात. राजमाता जिजाऊ यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करून स्वराज्य निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज घडवले. स्वराज्य…
मुंबई : प्रतिनिधी I पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज करोना परिस्थिचा आढावा घेण्यासाठी देशातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यासोबत बैठक बोलवली असली तरी या बैठकीला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपस्थित राहणार नाहीत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंऐवजी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने दिलीय मात्र या निर्णयामधील कारणाबद्दल कोणताही खुलासा मुख्यमंत्री कार्यालयाकडून करण्यात आलेला नाही. आरोग्यमंत्री राहणार उपस्थित पंतप्रधान मोदी आज दुपारी साडेचारच्या सुमारास सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. राज्यांमधील लसीकरण वाढवण्यासाठी आणखी लससाठी मिळावा आणि इतर औषधांबाबत यावेळी राज्यांकडून मागणी केली जाण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून केंद्र सरकार सुद्धा लसीकरणासंदर्भातील काही निर्देश देणार असल्याची तसेच निर्बंधांबद्दल…
जळगाव, प्रतिनिधी I मकर संक्रांत या सणानिमित्त पतंग महोत्सवाचे आयोजन केले जाते. शिवाय पतंगशौकीन देखील पतंग उडवित असतात. जिल्हा प्रशासनाने नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी केली असून या संदर्भात मनपाने नायलॉन मांजाची विक्री होऊ नये म्हणून पथक निर्माण केले आहे. या पथकाने दोन तीन दिवसापासून शहरात फिरून नायलॉन मांजाची विक्री तर होत नाही ना? याबाबतची तपासणीही केली. मात्र या पथकाला हुलकावणी देऊन शहरातील काही भागात नायलॉन मांजाची छुप्या मार्गाने सर्रास विक्री केली जात असल्याच्या तक्रारी जनतेतून येत आहेत. विशेषत: जोशीपेठेतील पतंग गल्लीत पतंगांबरोबरच नायलॉन मांजाची विक्री छुप्या पध्दतीने केली जात असल्याचे विश्वसनीय गोटातील वृत्त आहे.
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होण्यास काही दिवस उरलेले असताना, याच दरम्यान संसद भवनातील शेकडो कर्मचाऱ्यांना कोरोनाचा फटका बसला आहे.त्यामुळे अर्थसंकल्पीय अधिवेशन वेळेत पूर्ण करणे मोठे आव्हान ठरू शकते. तिसऱ्या लाटेत गेल्या एका महिन्यात संसद भवनातील 718 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे, त्यापैकी बहुतेकांना गेल्या दोन आठवड्यांत संसर्ग झाला आहे. 9 जानेवारीपर्यंत सुमारे 400 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती, मात्र कालपर्यंत हा आकडा 700 च्या पुढे गेला आहे.गेल्या तीन दिवसांत या आकडेवारीत तब्बल 43 टक्क्यांनी वाढ झाली आहे. एका वृतसंस्थेच्या वृत्तानुसार, बाधितांंपैकी सुमारे 200 कर्मचारी राज्यसभेतील आहेत.उर्वरित लोकसभेसह अन्य विभागांशी संबंधित असल्याचे सांगितले जाते.लोकसभा आणि राज्यसभेने त्यांच्या…