जळगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील पाचोरा येथील पुनगाव रोड जवळ असलेल्या मोकळया जागेवर रविवारच्या सायंकाळच्या सुमारास दुचाकीचा कट लागल्यावरून एकाचा खून करण्यात आल्याची घटना घडली. याप्रकरणी पाचोरा पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे शहरातील गुन्हेगारीने तोंडवर काढले असून शहरातील पुनगाव रोड स्थित बुऱ्हाणी शाळेसमोरील मोकळ्या जागेत रविवारी संध्याकाळी दुचाकीचा कट लागल्यावरून दोन गटात वाद झाला. वादाचे पुनर्वशन हाणामारी होऊन एका तरुणाचा खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. रविवारी बुऱ्हानी शाळेच्या समोरील मोकळ्या जागी ६.४५ वाजेच्या सुमारास तरुणांच्या दोन गटात दुचाकीचा कट लागल्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. वादाचे पर्यवसान हाणामारीत होऊन लाठ्या काठ्या, चॉपर, फायटरचा वापर करत तुफान राडा झाला. यात…
Author: saimat team
जळगांव, प्रतिनिधी । येथील रहिवाशी सुरेश गबा सोनवणे वय ७१ यांचे अल्पशा आजाराने दि. ३१ सोमवार रोजी निधन झाले. त्याच्या पच्यात बायको, दोन मुले, सुना, मुली, नातवंडं असा परिवार होता. ते शैलेंद्र सोनवणे यांचे वडील होते.
जळगाव, प्रतिनिधी । अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई बिग्रेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदी उज्वला जयंत पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आज दि ३० जानेवारी २०२२ रोजी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघ व बहिणाई ब्रिगेडच्या झालेल्या संयुक्त बैठकीत सर्वानुमते डोंबिवली येथील सामाजिक कार्यकर्त्या ऍडव्हॉकेट सौ. उज्वला जयंत पाटिल यांची बहिणाई ब्रिगेडच्या ठाणे जिल्हाध्यक्ष पदि नियुक्ती करण्यात आली . अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे प्रदेश अध्यक्ष श्री. प्रदीपभाऊ भोळे व बहिणाई ब्रिगेडच्या प्रदेश उपाध्यक्षा सौ. हर्षाताई बोरोले यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र देण्यात आले . याप्रसंगी अखिल भारतीय लेवा पाटीदार युवक महासंघाचे जिल्हा कार्याध्यक्ष अमोल कोल्हे ,…
जळगाव, प्रतिनिधी । गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधीतीर्थ येथे प्रार्थना सभेतून महात्मा गांधीजींना भावांजली अर्पण करण्यात आली. गांधीतीर्थच्या प्रार्थनास्थळावर झालेल्या प्रार्थना सभेच्या सुरवातीला गांधी रिसर्च फाऊंडेशनचे संचालक अशोक जैन, गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या रिसर्च डीन प्रो. गीता धरमपाल, जैन इरिगेशनचे वरिष्ठ सहकारी डी. एन. कुलकर्णी यांच्याहस्ते महात्मा गांधीजींच्या पुतळ्याला पुष्पार्पण करून अभिवादन करण्यात आले. यानंतर दोन मिनिट मौन पाळून श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. सर्वधर्म प्रार्थना, एकादश व्रत आणि शांती मंत्राद्वारे गांधीजींचे स्मरण करण्यात आले. अनुभूती निवासी शाळेतील निखील क्षिरसागर व भूषण गुरव यांनी महात्मा गांधीजींना प्रिय असलेली ‘राम का गुनगान…,’ ‘वैष्णव जन तो तेने कहिऐ…’ ही भजनं…
नवी दिल्ली, वृत्तसंस्था । आंतरराष्ट्रीय मौल्यवान धातूच्या किंमती आणि रुपयाच्या घसरणीमध्ये सुधारणा होत असताना १० ग्रॅम २२ कॅरेट सोन्याची किंमत आज ४५,००० रुपये आहे. मागील ट्रेडमध्ये ह्या मौल्यवान धातूची किंमत ४५,१५० रुपये प्रति १० ग्रॅमवरवर बंद झाली होती. गुड रिटर्न्स या वेबसाइटनुसार चांदी ६१,१०० रुपये प्रति किलोने विकली जात आहे. उत्पादन शुल्क, राज्य कर आणि मेकिंग शुल्कामुळे सोन्याच्या दागिन्यांच्या किंमती भारतभर बदलतात. काय आहे आजचा भाव? गुड रिटर्न्स वेबसाईटनुसार मुंबईमध्ये २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४५,००० रुपये आहे. २४ कॅरेट सोन्याचा दर वाढला आहे. मुंबईत २४ कॅरेट सोन्याची किंमत ४९,००० प्रति १० ग्रॅम आहे. पुण्यात प्रति १० ग्रॅम…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी एबीपी माझा वृत्तवाहिनीने पत्रकार कृष्णा अविनाश केंडे यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद अभ्यासक्रमासाठी पीएचडी पदवी बहाल केली आहे. कृष्णा केंडे यांनी एमजीएम वृत्तपत्रविद्या आणि जनसंवाद महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.रेखा शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ‘वृत्तवाहिन्यांचा समाज जीवनावर होणारा परिणाम: मराठी वृत्तवाहिन्यांचा विशेष अभ्यास’ या विषयावर संशोधन केले आहे. या संशोधनातून त्यांनी वृत्तवाहिन्यांच्या प्रेक्षकांशी निगडित अनेक बाबींचा उलगडा केला आहे. त्यात असे दिसून आले की, सुमारे 61 टक्के प्रेक्षक हे दिवसातून 2 तास वृत्तवाहिनी बघतात. तर, वृत्तवाहिन्यांवरील 75 टक्के बातम्या विश्वासार्ह असतात. 25 टक्के बातम्या अविश्वसनीय असण्याची एकांगीपणा, राजकीय दबाव, प्रेक्षकांची अज्ञानता तसेच आचारसंहितेचा अभाव ही कारणे आहेत.…
मुंबई प्रतिनिधी आगामी महानगरपालिका निवडणूक आता थोनडावर आली असून केंद्रीय सामजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी केला वक्तव्य. महापालिका निवडणुकीत शिवसेना , राष्ट्रवादी,आणि कॉंग्रेस हे स्वबळावर निवडणूक लढवणार आहे आणि भाजप आणि आरपीआय शिवसेनाला पराभूत करू , असे विधान आठवले याने केले . राज्यातील ठाकरे सरकारने घेतलेल्या अजब गजब निर्णयावर किरण दुकानात विणे विक्री साठी दिलेली परवानगी या वर चांगलेच वातावरण तापले आहे.किरण दुकानात आला दारूचा माल,आता लोकांचे होणार हाल …अशा काव्यमय शब्दात त्यांनी ठाकरे सरकारवर निशाना साधला.आठवले यांनी या निर्णयावरून सत्ताधाऱ्याविरोधात आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे . एकंदरीत भाजपने ठाकरे सरकारच्या या निर्णयाला विरोध केला आहे. राज्यपाल नियुक्त १२…
जळगाव, (प्रतिनिधी) – गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे उद्या दि. 30 जानेवारी रोजी महात्मा गांधीजींच्या 74 व्या पुण्यतिथिनिमित्त गांधी तीर्थ मधे निमंत्रितांसाठी प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच गांधी रिसर्च फाउण्डेशनतर्फे दुपारी 3 वाजता रिमेंबरींग गांधी या विशेष ऑनलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे महात्मा गांधींचे कृतज्ञता पूर्वक स्मरण “रिमेंबरींग बापू” या ऑनलाईन होणाऱ्या कार्यक्रमात प्रमुख अतिथी म्हणून आंतरराष्ट्रीय अड मॅन आणि स्पेस डिझाइनर उदय पारकर आंतरराष्ट्रीय चित्रकार वासुदेव कामत उपस्थित राहणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून गांधी रिसर्च फाऊंडेशनचे चेअरमन डॉ. अनिल काकोडकर, तर विशेष उपस्थिती म्हणून संचालक अशोक जैन राहतील. जीवनातील साधेपणा यावर उदय पारकर तर आज गांधीजींची प्रासंगिकता या विषयावर वासुदेव कामत मार्गदर्शन करणार आहेत. गांधी रिसर्च फाऊंडेशनतर्फे जनमानसात सर्जनशील दृष्टिकोणातून कला निर्माण करणे आणि महात्मा गांधींच्या विचारांवर आधारित चिरंतन समाज अंमलात…
ठाणे, वृत्तसंस्था । टीईटी परीक्षा घोटाळ्याप्रकरणी कृषी विभागातील अधिकारी सुशील खोडवेकर यांना अटक करण्यात आली आहे. खोडवेकर यांना ठाण्यातून अटक करण्यात आली असून त्यांना कोर्टात हजर करण्यात येत आहे. खोडवेकर हे या पूर्वी शिक्षण विभागात कार्यरत होते. शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) घोटाळा प्रकरण उघडकीस आल्यानंतर एकाहून एक खळबळजनक गोष्टी समोर येत आहेत. टीईटीमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींना पैसे घेऊन पास केलं असल्याचं कालच समोर आलं. पैसे घेऊन टीईटी परीक्षार्थींना पात्र ठरविल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झालं आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने २०१९-२० मध्ये घेतलेल्या शिक्षक पात्रता परीक्षेमध्ये अपात्र ठरलेल्या तब्बल ७ हजार ८०० परीक्षार्थींकडून पैसे घेऊन…
विजय चौधरी-सोयगाव प्रतिनिधी प्रेरणा मिळण्यासाठी आपल्याला कुठे शोधायला जावे लागत नाही ,आपल्याला आसपासही अशा काही व्यक्ती असतात त्या आपल्याला एखाद्या ध्येयाप्रत घेऊन जाण्यास मदत करत असतात त्या वाटेत येणारया सर्व अडचणींवर मात करतात आणि पुढे जातात अशी माणसं आज आपल्याला मोजकीच दिसून येतात यांना सहजासहजी देवपण आलेले नसते यांनी अनेक काटेरी प्रवास करून टाकीचे घाव सोसलेले असतात कठीण परिस्थितीत कोणत्याही पाश्वभूमीशिवाय नसतांना अभूतपूर्व यश संपादन करत आपापल्या क्षेत्रात आदर्श निर्माण करतात धैयनिष्ठा,प्रामाणिक पणा व सामाजिक बांधिलकी जपत यशस्वी होतात आशा दुर्मिळ व्यक्तिमत्त्वापैकी एक यश यशस्वी व्यक्तिमत्व म्हणजे कर्तव्यदक्ष खाकी वर्दीतील “आपला माणूस” सुदाम शिरसाठ साहेब होय त्यामुळे आज तरुणांचे…